निशब्द उत्तर

एक दिवस असा येतो,
की मन रडतं... पण डोळे रडत नाहीत.
ओठांवर हजारो शब्द असतात,
पण ते उच्चारण्याची इच्छाच उरत नाही.

कारण अनुभव शिकवून जातो...
प्रत्येक गैरसमज दूर करता येत नाही,
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कधीच कळत नाही.

खूप समजावून पाहिलं,
खूप वेळा स्वतःलाच चुकीचं ठरवलं,
फक्त नातं टिकावं म्हणून
स्वतःचं मन हजारदा मोडलं.

पण एक क्षण असा येतो,
जेव्हा मन थकून म्हणतं
"आता पुरे...
ज्यांना माझं मौनही समजत नाही,
त्यांना माझे शब्द तरी काय समजणार?"

मग राग संपतो,
अपेक्षा विरघळून जातात,
आणि उरते फक्त एक शांत स्मितरेषा,
जी खूप काही सहन करूनही
कुणालाच दोष देत नाही.

आजही मनात प्रेम आहे,
आदर आहे, आठवणी आहेत.
पण मागे वळून हाक मारण्याची
सवय मात्र कायमची सुटली आहे.

कारण आता समजलंय...

जिथे आपल्या भावनांची किंमत राहत नाही,
तिथे शब्दांचाही अर्थ उरत नाही.
म्हणून काही नाती सोडून द्यावी लागतात...
आणि काही माणसं
फक्त आठवणीतच ठेवावी लागतात.

•ॲड. कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो.: ९०११८४१२१२



एक दिवस असा येतो,
की मन रडतं… पण डोळे रडत नाहीत.
ओठांवर हजारो शब्द असतात,
पण ते उच्चारण्याची इच्छाच उरत नाही.

कारण अनुभव शिकवून जातो…
प्रत्येक गैरसमज दूर करता येत नाही,
प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि प्रत्येकाला आपल्या मनाची किंमत कधीच कळत नाही.

खूप समजावून पाहिलं,
खूप वेळा स्वतःलाच चुकीचं ठरवलं,
फक्त नातं टिकावं म्हणून
स्वतःचं मन हजारदा मोडलं.

पण एक क्षण असा येतो,
जेव्हा मन थकून म्हणतं
“आता पुरे…
ज्यांना माझं मौनही समजत नाही,
त्यांना माझे शब्द तरी काय समजणार?”

मग राग संपतो,
अपेक्षा विरघळून जातात,
आणि उरते फक्त एक शांत स्मितरेषा,
जी खूप काही सहन करूनही
कुणालाच दोष देत नाही.

आजही मनात प्रेम आहे,
आदर आहे, आठवणी आहेत.
पण मागे वळून हाक मारण्याची
सवय मात्र कायमची सुटली आहे.

कारण आता समजलंय…

जिथे आपल्या भावनांची किंमत राहत नाही,
तिथे शब्दांचाही अर्थ उरत नाही.
म्हणून काही नाती सोडून द्यावी लागतात…
आणि काही माणसं
फक्त आठवणीतच ठेवावी लागतात.

•ॲड. कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो.: ९०११८४१२१२

Author