लहानपणी वाटायचं,
तो ससा फार गर्विष्ठ होता,
म्हणूनच शर्यतीत झोपला…
पण मोठा झाल्यावर समजलं,
प्रत्येक झोप ही आळशीपणाची नसते.
कधी कधी माणूस थकलेला असतो,
जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने वाकलेला असतो,
सगळ्यांना पुढे जाताना पाहत,
स्वतःला सावरायला
क्षणभर थांबलेला असतो.
जिंकण्याची इच्छा कमी नसते,
फक्त श्वास घ्यायला
एक निवांत क्षण हवा असतो.
जीवनाच्या शर्यतीत
प्रत्येक जण कासवासारखा संथ नसतो,
आणि प्रत्येक ससा बेफिकीरही नसतो.
काही जण हसत धावत असतात,
आतून मात्र हजारो लढाया लढत असतात.
आज समजतं…
त्या सशाने हार झोपेमुळे नाही पत्करली,
तर थकव्याने घेतलेल्या
त्या एका विश्रांतीची किंमत
त्याला पराभवाने चुकवावी लागली.
म्हणून आता
कोणाच्या प्रवासावर हसू येत नाही,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात
एक अशी शर्यत असते,
जिथे धावण्यापेक्षा
स्वतःला सावरणं अधिक महत्त्वाचं असतं.
आणि हो…
जिंकणं सुंदर असतंच,
पण थकलेल्या मनाला
स्वतःची साथ देणं,
हे त्याहूनही सुंदर असतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212