मनाला कुठे समजतं,
तू जवळ आहेस की लांब,
तुझ्या आठवणींच्या सरी बरसल्या की,
भावनांना मिळतो नवा रंग.
तुझं नाव ओठांवर आलं की,
हृदय अलगद हसतं,
तुझ्या प्रत्येक स्मिताच्या आठवणीने,
मन पुन्हा प्रेमात हरवतं.
अंतर कितीही असो आपल्या मध्ये,
नातं मात्र कधी तुटत नाही,
तुझी हलकीशी चाहूल जरी लागली,
मन रोमँटिक झाल्याशिवाय राहत नाही.
तू नसतानाही तूच असतेस,
माझ्या प्रत्येक श्वासात,
म्हणूनच तुझी आठवण आली की,
प्रेम फुलतं नकळत मनात.
तुझ्या आठवणींच्या त्या गोड सावलीत,
मन रोज स्वतःला विसरतं,
आणि तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने,
माझं जग पुन्हा नव्याने बहरतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मनाला कुठे समजतं,
तू जवळ आहेस की लांब,
तुझ्या आठवणींच्या सरी बरसल्या की,
भावनांना मिळतो नवा रंग.
तुझं नाव ओठांवर आलं की,
हृदय अलगद हसतं,
तुझ्या प्रत्येक स्मिताच्या आठवणीने,
मन पुन्हा प्रेमात हरवतं.
अंतर कितीही असो आपल्या मध्ये,
नातं मात्र कधी तुटत नाही,
तुझी हलकीशी चाहूल जरी लागली,
मन रोमँटिक झाल्याशिवाय राहत नाही.
तू नसतानाही तूच असतेस,
माझ्या प्रत्येक श्वासात,
म्हणूनच तुझी आठवण आली की,
प्रेम फुलतं नकळत मनात.
तुझ्या आठवणींच्या त्या गोड सावलीत,
मन रोज स्वतःला विसरतं,
आणि तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने,
माझं जग पुन्हा नव्याने बहरतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Post Views: 3