सखे तुझं वागणं हे बरं नव्हे,
हे मी आता मनाशीच म्हणतो.
शब्द उरले नाहीत बोलायला,
मौनाचीच आता भाषांतरे.
तू गेलीस तेव्हा रडलो नाही मी,
फक्त श्वास थोडा थांबला होता.
कळलं नाही कोणत्या क्षणी,
आपला संवाद शेवटचा झाला होता.
आठवणींचा आवाज फार मोठा असतो,
तो शांततेतच अधिक बोचतो.
तुझं नाव न उच्चारताही,
रोज तुझ्यासाठी झुरतो.
मी वाट पाहत नाही आता,
फक्त तुझी अनुपस्थिती सवय झाली आहे.
विरह म्हणजे रडणं नव्हे,
तो आत आत विरघळत जाणं आहे.
सखे,
जर कधी माझं अस्तित्व आठवलं,
तर शोधू नकोस मला शब्दांत.
मी त्या शांततेत आहे,
जिथे तू न बोलता निघून गेलीस.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212