असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलते,
हातात हात नसतो,
पण मनात घट्ट धरलेलं असतं.
असं प्रेम सोपं नसतं,
ज्यात अधिकार नसतो, फक्त प्रतीक्षा असते,
डोळ्यांत स्वप्नं असतात,
पण ओठांवर कबुली नसते.
रोजच्या संध्याकाळीत
तुझ्या आठवणींचा चंद्र उगवतो,
आणि मनाच्या आकाशात
तुझ्याच नावाचा तारा चमकतो.
असं प्रेम म्हणजे
पावसाआधीची गंधीत माती,
स्पर्श न करताही जाणवणारी
एक गूढ, हलकीशी व्याकुळता.
तुझ्या एका हसण्यावर
संपूर्ण दिवस उजळून निघतो,
आणि तुझ्या एका शांततेत
मन हजार प्रश्नांनी भरून जातो.
असं प्रेम सोपं नसतं..
ते मिळवण्यात नसतं,
ते फक्त जपण्यात असतं.
मनाच्या सर्वात खोल कप्प्यात,
नाव न देता,
पण आयुष्यभरासाठी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212