स्वातंत्र्य सैनिक, विद्वान राजकारणी, कणखर प्रशासक आणि समाजजीवनाचे सांस्कृतिक भान असलेले बहुभाषी एन.के.पी. साळवे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीतील एक खंदा पुरस्कर्ता नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव या चळवळीला यापुढेही होत राहील. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेले एन.के.पी. साळवे तारुण्यातच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
एक निष्णात चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून जशी त्यांची ओळख होती तशीच उत्कृष्ट वक्ता म्हणूनही. धर्माने ख्रिश्चन असलेल्या साळवे यांचे हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. त्यामुळेच कोणत्याही सभेतील त्यांचे भाषण हा वक्तृत्वाचा उत्तम वस्तुपाठच असे. उर्दू शेरोशायरीच्या पखरणीशिवाय त्यांचे भाषण संपत नसे.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि चार्टर्ड अकांऊन्टट असल्यामुळे बऱ्याच औद्योगिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. व्यक्तिगत मतभेदापलीकडे दृष्टी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी व पुढे खाण व पोलाद खात्याचे राज्यमंत्री आणि सांसदीय कामकाज मंत्री होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एन्रॉनचा वीज प्रकल्पामुळे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारकिर्द अधिक गाजली. त्यांच्याच काळात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रवेशव्दार मुक्त झाले. संसदेत करप्रणाली, घटना, सार्वजनिक लेखा या विषयावरील त्यांची भाषणे विशेष गाजली.
नवव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्याचा महसूल विभागणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्रातही एन.के.पी. साळवे या नावाला एक वेगळे वलय होते. १९४३ ला अखिल भारतीय पंच समितीवर त्यांची निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे १० वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भात क्रिकेटला चांगले दिवस आणले. भारतीय नियामक मंडळाचे ते ४ वर्ष, तर आशियाई क्रिकेट कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. १९८७ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या रिलायन्स विश्वकप सामन्याच्या वेळी भारत-पाक व्यवस्थापन समितीचेही ते अध्यक्ष होते. नागपुरातील सी.पी. क्लब, गोंडवाना क्लबसह मुंबई, दिल्लीतील क्रिकेट विश्वाशीही त्यांचा जवळून संबंध होता.
स्वातंत्र्य सैनिक, विद्वान राजकारणी, कणखर प्रशासक आणि समाजजीवनाचे सांस्कृतिक भान असलेले बहुभाषी एन.के.पी. साळवे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीतील एक खंदा पुरस्कर्ता नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव या चळवळीला यापुढेही होत राहील. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेले एन.के.पी. साळवे तारुण्यातच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
एक निष्णात चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून जशी त्यांची ओळख होती तशीच उत्कृष्ट वक्ता म्हणूनही. धर्माने ख्रिश्चन असलेल्या साळवे यांचे हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. त्यामुळेच कोणत्याही सभेतील त्यांचे भाषण हा वक्तृत्वाचा उत्तम वस्तुपाठच असे. उर्दू शेरोशायरीच्या पखरणीशिवाय त्यांचे भाषण संपत नसे.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि चार्टर्ड अकांऊन्टट असल्यामुळे बऱ्याच औद्योगिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. व्यक्तिगत मतभेदापलीकडे दृष्टी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी व पुढे खाण व पोलाद खात्याचे राज्यमंत्री आणि सांसदीय कामकाज मंत्री होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एन्रॉनचा वीज प्रकल्पामुळे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारकिर्द अधिक गाजली. त्यांच्याच काळात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रवेशव्दार मुक्त झाले. संसदेत करप्रणाली, घटना, सार्वजनिक लेखा या विषयावरील त्यांची भाषणे विशेष गाजली.
नवव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्याचा महसूल विभागणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्रातही एन.के.पी. साळवे या नावाला एक वेगळे वलय होते. १९४३ ला अखिल भारतीय पंच समितीवर त्यांची निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे १० वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भात क्रिकेटला चांगले दिवस आणले. भारतीय नियामक मंडळाचे ते ४ वर्ष, तर आशियाई क्रिकेट कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. १९८७ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या रिलायन्स विश्वकप सामन्याच्या वेळी भारत-पाक व्यवस्थापन समितीचेही ते अध्यक्ष होते. नागपुरातील सी.पी. क्लब, गोंडवाना क्लबसह मुंबई, दिल्लीतील क्रिकेट विश्वाशीही त्यांचा जवळून संबंध होता.