सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.
कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.
जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.
शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.
सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.
कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.
जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.
शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.