अनंत आजगावकर

सानेगुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या जन्मभूमीमध्ये शिक्षणक्षेत्रात काम करण्याचं व्रत स्वीकारलेलं, खादीचा नेहरू शर्ट, खादीचीच पांढरी विजार तसेच खांद्याला खादीचीच पिशवी या वेषातील आणि कोणाच्याही मदतीला सदैव तयार असलेलं हे ऐंशी वर्षांचं 'आजगावकर सर' या नावाचं उत्साही व्यक्तिमत्त्व कोल्हापूर जिल्ह्यात आबालवृद्धांना आदरणीय असंच आहे!

आजगावकर सरांनी आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने १९५८ मध्ये उत्तूर विद्यालयाची स्थापना करून परिसरातल्या २० ते २५ खेड्यांमधल्या अशिक्षित, गरीब लोकांच्या मुलाबाळांसाठी ज्ञानार्जनाचा मार्ग खुला करून दिला. त्यातूनच आता अरविंद विद्यामंदिर, उत्तूर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक वरिष्ठ महाविद्यालय अशी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकाच गावी सुविधा निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिमणे (ता. आजरा), पिंपळगाव आणि बारवे (ता. भुदरगड) आणि करवीर प्रशाला (कोल्हापूर) असा शाखाविस्तारही झाला आहे.

या खेडेगावांमधून आंतरभारतीच्या शाळा सुरू झाल्या नसत्या तर ग्रामीण, मागास, निरक्षर आणि आथिर्कदृष्ट्या विपन्नावस्थेत असणार्‍या बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्याअभावी आपलं आयुष्य बेभरवशाच्या शेतीमध्ये किंवा मुंबईतील रोजगारावर घालवावं लागलं असतं. मुलींना तर घराचा उंबरठाही ओलांडण्याची संधी मिळाली नसती. अत्यंत दारिद्रयाच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले आंतरभारतीचे अनेक माजी विद्यार्थी आज समाजाच्या विविध स्तरांत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

आजगावकर सरांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक पुरस्कार', नूल ग्रामस्थांचा 'साथी पुरस्कार' या पुरस्कारांप्रमाणेच 'फाय फौंडेशन'तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. कोणाकडेही हात न पसरता कष्ट, त्याग, संघर्ष आणि सेवेच्या जोरावर त्यांनी उत्तूर परिसरात उभं केलेलं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य करू पाहणार्‍यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
शिक्षणाचा धंदा करून सम्राट बनण्याची स्पर्धा सुरू असलेल्या सध्याच्या काळात आजगावकर सरांनी आपली ध्येयवादी विचारसरणी अखंड ठेवून खेडेगावांमधून मांडलेला हा ज्ञानयज्ञ अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)




सानेगुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या जन्मभूमीमध्ये शिक्षणक्षेत्रात काम करण्याचं व्रत स्वीकारलेलं, खादीचा नेहरू शर्ट, खादीचीच पांढरी विजार तसेच खांद्याला खादीचीच पिशवी या वेषातील आणि कोणाच्याही मदतीला सदैव तयार असलेलं हे ऐंशी वर्षांचं ‘आजगावकर सर’ या नावाचं उत्साही व्यक्तिमत्त्व कोल्हापूर जिल्ह्यात आबालवृद्धांना आदरणीय असंच आहे!

आजगावकर सरांनी आपल्या काही सहकार्‍यांच्या मदतीने १९५८ मध्ये उत्तूर विद्यालयाची स्थापना करून परिसरातल्या २० ते २५ खेड्यांमधल्या अशिक्षित, गरीब लोकांच्या मुलाबाळांसाठी ज्ञानार्जनाचा मार्ग खुला करून दिला. त्यातूनच आता अरविंद विद्यामंदिर, उत्तूर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. जे. पी. नाईक वरिष्ठ महाविद्यालय अशी बालवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत एकाच गावी सुविधा निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिमणे (ता. आजरा), पिंपळगाव आणि बारवे (ता. भुदरगड) आणि करवीर प्रशाला (कोल्हापूर) असा शाखाविस्तारही झाला आहे.

या खेडेगावांमधून आंतरभारतीच्या शाळा सुरू झाल्या नसत्या तर ग्रामीण, मागास, निरक्षर आणि आथिर्कदृष्ट्या विपन्नावस्थेत असणार्‍या बहुजन समाजातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्याअभावी आपलं आयुष्य बेभरवशाच्या शेतीमध्ये किंवा मुंबईतील रोजगारावर घालवावं लागलं असतं. मुलींना तर घराचा उंबरठाही ओलांडण्याची संधी मिळाली नसती. अत्यंत दारिद्रयाच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले आंतरभारतीचे अनेक माजी विद्यार्थी आज समाजाच्या विविध स्तरांत चांगल्या पदांवर कार्यरत आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

आजगावकर सरांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, नूल ग्रामस्थांचा ‘साथी पुरस्कार’ या पुरस्कारांप्रमाणेच ‘फाय फौंडेशन’तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. कोणाकडेही हात न पसरता कष्ट, त्याग, संघर्ष आणि सेवेच्या जोरावर त्यांनी उत्तूर परिसरात उभं केलेलं शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य करू पाहणार्‍यांना निश्चितच प्रेरणादायी आहे.
शिक्षणाचा धंदा करून सम्राट बनण्याची स्पर्धा सुरू असलेल्या सध्याच्या काळात आजगावकर सरांनी आपली ध्येयवादी विचारसरणी अखंड ठेवून खेडेगावांमधून मांडलेला हा ज्ञानयज्ञ अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Author