लीला भोसले

भोसले, लीला

लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.

भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.



भोसले, लीला

लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.

भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.

Author