हरिश्चंद्र बिराजदार

बिराजदार, हरिश्चंद्र

जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.

त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.



बिराजदार, हरिश्चंद्र

जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.

त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

Author