‘तू नसतीस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती. तू नसतीस तर जुळल्या नसत्या गीतांच्या या मंजुळ पंक्ती.’ गायक व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी ‘वहिनीच्या बांगडय़ा’ या चित्रपटासाठी स्वत: स्वरबद्ध करून गायलेल्या या गीताच्या ओळी त्यांच्या सहधर्मचारिणीला तंतोतंत लागू पडाव्या, एवढी खंबीर आणि प्रदीर्घ साथ ललिताबाईंनी त्यांना दिली.
‘प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते,’ या वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्याची सार्थता ललिताबाईंचं आयुष्य ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच पटू शकेल. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ललिताबाईंनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा सुधीर फडके या वलयांकित व्यक्तिमत्त्वाला पन्नासहून अधिक वर्षे साथसोबत करणारी ‘गृहिणी-सखी-सचिव’ काळाच्या पडद्याआड गेली. सुधीर फडके यांची पत्नी किंवा आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई, एवढीच त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या आरंभीच्या काळात आपल्या भावमधुर आवाजानं मोहिनी घालणाऱ्या पाश्र्वगायिकांमध्ये ललिताबाईंचा समावेश करणं अगत्याचं ठरतं. पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम गाणारे आणि आजीचाही आवाज गोड. त्यांच्याच प्रेरणेनं छोटी ललिता गाणं शिकली. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण सारस्वत मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही’, असा प्रश्न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये होत्या. १९४०च्या दशकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं पाश्र्वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या ‘साजन’मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच ‘नदिया के पार’मधल्या ‘मोरे राजा हो. ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नही सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळय़ात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केलं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’मधली काही गाणीही त्या गायल्या. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची. म्हणूनच गदिमा प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’ त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो,’ असं अभिमानानं सांगणाऱ्या सुधीर फडके यांनी आठ वर्षांपूर्वी निरोप घेतला. तेव्हापासूनच खरे तर त्या खचल्या होत्या. आता ती पणतीही निमाली आहे.
फडके, ललिता
‘तू नसतीस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती. तू नसतीस तर जुळल्या नसत्या गीतांच्या या मंजुळ पंक्ती.’ गायक व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी ‘वहिनीच्या बांगडय़ा’ या चित्रपटासाठी स्वत: स्वरबद्ध करून गायलेल्या या गीताच्या ओळी त्यांच्या सहधर्मचारिणीला तंतोतंत लागू पडाव्या, एवढी खंबीर आणि प्रदीर्घ साथ ललिताबाईंनी त्यांना दिली.
‘प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते,’ या वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्याची सार्थता ललिताबाईंचं आयुष्य ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच पटू शकेल. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ललिताबाईंनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा सुधीर फडके या वलयांकित व्यक्तिमत्त्वाला पन्नासहून अधिक वर्षे साथसोबत करणारी ‘गृहिणी-सखी-सचिव’ काळाच्या पडद्याआड गेली. सुधीर फडके यांची पत्नी किंवा आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई, एवढीच त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या आरंभीच्या काळात आपल्या भावमधुर आवाजानं मोहिनी घालणाऱ्या पाश्र्वगायिकांमध्ये ललिताबाईंचा समावेश करणं अगत्याचं ठरतं. पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम गाणारे आणि आजीचाही आवाज गोड. त्यांच्याच प्रेरणेनं छोटी ललिता गाणं शिकली. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण सारस्वत मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही’, असा प्रश्न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये होत्या. १९४०च्या दशकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं पाश्र्वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या ‘साजन’मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच ‘नदिया के पार’मधल्या ‘मोरे राजा हो. ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नही सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळय़ात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केलं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’मधली काही गाणीही त्या गायल्या. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची. म्हणूनच गदिमा प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’ त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो,’ असं अभिमानानं सांगणाऱ्या सुधीर फडके यांनी आठ वर्षांपूर्वी निरोप घेतला. तेव्हापासूनच खरे तर त्या खचल्या होत्या. आता ती पणतीही निमाली आहे.