विदर्भाच्या वाचनसंस्कृतीचा आधारस्तंभच राजाभाऊ कुळकर्णी यांच्या निधनाने निखळून पडला आहे. राजाभाऊंचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी झाले आणि त्यापैकी गेली ५५ वर्षे ते विदर्भात होते. १९५५ साली अहमदनगर जिल्ह्य़ातला ‘भा.ल.’ कुळकर्णी नावाचा एक नुकताच मिसरूड फुटलेला युवक शिवचरित्राच्या प्रचारासाठी विदर्भात आला आणि ‘भा.ल.’ ही त्याची ओळख विसरून आणि ‘राजाभाऊ’ हे नवे रूप घेऊन विदर्भाच्या भूमीत स्थिरावला.
या साडेपाच दशकांच्या काळात राजाभाऊंची भूमिका विदर्भाच्या वाचनसंस्कृतीला वेगवेगळ्या मार्गाने विकसित करणारी आणि दिशा देणारी ठरली. ते केवळ पुस्तक विक्रेते नव्हते तर, अक्षरांच्या पाऊलवाटांवर अनेक नामवंतांसोबत नवोदितांनाही चालायला लावणारे मार्गदर्शक होते. पुस्तकविक्रीसोबत ते प्रकाशन व्यवसायात शिरले पण, रूढार्थाने ते केवळ साहित्य प्रकाशकच नव्हते तर, साहित्याच्या वाटा उजळून टाकणारा एक दीप म्हणून या काळात राजाभाऊ वावरले. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवर आणि ते लिहिणाऱ्या लेखकांच्या नावावर नुसती नजर जरी टाकली तरी राजाभाऊंचा साहित्यिक संपर्क आणि आवाका केवढा थक्क करणारा होता, हे सहज लक्षात येते. प्रकाशक म्हणून त्यांचा व्यवहारही वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारा, लेखकाचा सन्मान राखणारा आणि प्रकाशित झालेले अक्षरधन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारा राहिला. वाचक जर खरेच भुकेला असेल तर, पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजाभाऊंनी अशा अनेकांना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य हप्त्याने कसे उपलब्ध करून दिले, याविषयी आजही अतिशय आदराने बोलले जाते. दूरचित्रवाणीचा प्रचार आणि प्रसार भारतात सुरू झाल्यावर शाळकरी मुले पुस्तकांपासून लहान वयातच दुरावत आहेत, हे लक्षात आल्यावर राजाभाऊ कुळकर्णी यांनी साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनस्पध्रेचा सुरू केलेला उपक्रम वैदर्भीय वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपकारक ठरला. राजाभाऊंचे साहित्य प्रसार केंद्र केवळ पुस्तक विक्रीचे दुकान म्हणून नागपूर-विदर्भात परिचित नव्हते तर, साहित्यिक आणि वाचकांचा ते एक अड्डा आहे. ग्रेस आणि सुरेश भट, भास्कर लक्ष्मण भोळे आणि प्रा. वसंत वऱ्हाडपांडे, महेश एलकुंचवार आणि प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अरविंद इनामदार, अशी नावे कोणत्याही जोडीने उच्चारली तरी ती परस्पर विरोधी विचारशैली आणि लेखनाची प्रतीके आहेत, मात्र असे सर्व भिन्न विचार-संस्कृतीचे लेखक, कवी, समीक्षक साहित्य प्रसार केंद्रात आपापल्या विचारांच्या झुली बाजूला ठेवून केवळ साहित्य या एका रंगात न्हाऊन निघाले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. व्यक्तिगत पातळीवर राजाभाऊ अध्यात्मवादी होते आणि त्यांच्या विचारनिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. असे असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर आणि सार्वजनिक जीवनात राजाभाऊंनी ते अध्यात्म आणि त्या संघनिष्ठांना डोके वर काढू दिले नाही. किंबहुना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात या निष्ठा कोणत्याही प्रकारे आड येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच संघाशी नाळ जुळलेल्या राजाभाऊंचा साहित्यिक आणि सार्वजनिक परिवार मात्र सर्वपक्षीय, सर्वरंगीय, सर्वजातीय आणि सर्वधर्मीय असा सर्वसमावेशक राहिला. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदेशाने राजाभाऊ कुळकर्णी विदर्भात आले, रुजले, फुलले आणि वैदर्भीय भावजीवनाचा अविभाज्य घटक झाले त्या बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजाभाऊ कुळकर्णीना हृदयविकाराने गाठावे आणि आयुष्यभर पुस्तकांचा ध्यास घेतलेल्या एखाद्याचा मृत्यू पुस्तक प्रकाशन समारंभात आणि त्याच्या आदर्श व्यक्तीसमोरच व्हावा, हेही एखाद्या साहित्यकृतीतच शोभावे.
कुळकर्णी, राजाभाऊ
विदर्भाच्या वाचनसंस्कृतीचा आधारस्तंभच राजाभाऊ कुळकर्णी यांच्या निधनाने निखळून पडला आहे. राजाभाऊंचे निधन वयाच्या ७६ व्या वर्षी झाले आणि त्यापैकी गेली ५५ वर्षे ते विदर्भात होते. १९५५ साली अहमदनगर जिल्ह्य़ातला ‘भा.ल.’ कुळकर्णी नावाचा एक नुकताच मिसरूड फुटलेला युवक शिवचरित्राच्या प्रचारासाठी विदर्भात आला आणि ‘भा.ल.’ ही त्याची ओळख विसरून आणि ‘राजाभाऊ’ हे नवे रूप घेऊन विदर्भाच्या भूमीत स्थिरावला.
या साडेपाच दशकांच्या काळात राजाभाऊंची भूमिका विदर्भाच्या वाचनसंस्कृतीला वेगवेगळ्या मार्गाने विकसित करणारी आणि दिशा देणारी ठरली. ते केवळ पुस्तक विक्रेते नव्हते तर, अक्षरांच्या पाऊलवाटांवर अनेक नामवंतांसोबत नवोदितांनाही चालायला लावणारे मार्गदर्शक होते. पुस्तकविक्रीसोबत ते प्रकाशन व्यवसायात शिरले पण, रूढार्थाने ते केवळ साहित्य प्रकाशकच नव्हते तर, साहित्याच्या वाटा उजळून टाकणारा एक दीप म्हणून या काळात राजाभाऊ वावरले. त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या यादीवर आणि ते लिहिणाऱ्या लेखकांच्या नावावर नुसती नजर जरी टाकली तरी राजाभाऊंचा साहित्यिक संपर्क आणि आवाका केवढा थक्क करणारा होता, हे सहज लक्षात येते. प्रकाशक म्हणून त्यांचा व्यवहारही वाचनसंस्कृतीला उत्तेजन देणारा, लेखकाचा सन्मान राखणारा आणि प्रकाशित झालेले अक्षरधन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेणारा राहिला. वाचक जर खरेच भुकेला असेल तर, पुस्तके त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी राजाभाऊंनी अशा अनेकांना मराठीतील उत्तमोत्तम साहित्य हप्त्याने कसे उपलब्ध करून दिले, याविषयी आजही अतिशय आदराने बोलले जाते. दूरचित्रवाणीचा प्रचार आणि प्रसार भारतात सुरू झाल्यावर शाळकरी मुले पुस्तकांपासून लहान वयातच दुरावत आहेत, हे लक्षात आल्यावर राजाभाऊ कुळकर्णी यांनी साहित्य प्रसार केंद्राच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी वाचनस्पध्रेचा सुरू केलेला उपक्रम वैदर्भीय वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उपकारक ठरला. राजाभाऊंचे साहित्य प्रसार केंद्र केवळ पुस्तक विक्रीचे दुकान म्हणून नागपूर-विदर्भात परिचित नव्हते तर, साहित्यिक आणि वाचकांचा ते एक अड्डा आहे. ग्रेस आणि सुरेश भट, भास्कर लक्ष्मण भोळे आणि प्रा. वसंत वऱ्हाडपांडे, महेश एलकुंचवार आणि प्रा. राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे आणि अरविंद इनामदार, अशी नावे कोणत्याही जोडीने उच्चारली तरी ती परस्पर विरोधी विचारशैली आणि लेखनाची प्रतीके आहेत, मात्र असे सर्व भिन्न विचार-संस्कृतीचे लेखक, कवी, समीक्षक साहित्य प्रसार केंद्रात आपापल्या विचारांच्या झुली बाजूला ठेवून केवळ साहित्य या एका रंगात न्हाऊन निघाले असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. व्यक्तिगत पातळीवर राजाभाऊ अध्यात्मवादी होते आणि त्यांच्या विचारनिष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. असे असले तरी साहित्याच्या व्यासपीठावर आणि सार्वजनिक जीवनात राजाभाऊंनी ते अध्यात्म आणि त्या संघनिष्ठांना डोके वर काढू दिले नाही. किंबहुना वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात या निष्ठा कोणत्याही प्रकारे आड येणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली. त्यामुळेच संघाशी नाळ जुळलेल्या राजाभाऊंचा साहित्यिक आणि सार्वजनिक परिवार मात्र सर्वपक्षीय, सर्वरंगीय, सर्वजातीय आणि सर्वधर्मीय असा सर्वसमावेशक राहिला. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदेशाने राजाभाऊ कुळकर्णी विदर्भात आले, रुजले, फुलले आणि वैदर्भीय भावजीवनाचा अविभाज्य घटक झाले त्या बाबासाहेब पुरंदरे यांचे भाषण सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात राजाभाऊ कुळकर्णीना हृदयविकाराने गाठावे आणि आयुष्यभर पुस्तकांचा ध्यास घेतलेल्या एखाद्याचा मृत्यू पुस्तक प्रकाशन समारंभात आणि त्याच्या आदर्श व्यक्तीसमोरच व्हावा, हेही एखाद्या साहित्यकृतीतच शोभावे.