डी. बी. कर्णिक हे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. त्यांनी या वृत्तपत्राला लोकाभिमुख व वाचकप्रिय बनविण्यात मोलाचा वाटा उचलला.
महाराष्ट्रात तब्बल चार प्रकाशनगृहे उभी करून ग्रामीण व शहरी साहित्यचळवळींमध्ये, प्रगल्भ साकव बांधण्याचा पराक्रम त्यांनी लीलया पेलला होता. उत्तम पत्रकारिता, व आपल्या व्यवस्थापकीय कौशल्यांमूळे ते संवेदनशील वाचकांना आपल्या वृत्तपत्रातून बौध्दिक खाद्य पुरविण्यात नेहमी यशस्वी ठरले.
पत्रकारितेमध्ये अतुलनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना रत्नदर्पण हा पत्रकारितेमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीकरिता देण्यात येणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला.