No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, देवणी, अहमदपूर व मुरूड या ठिकाणी छोटे-मोठे उद्योग चालतात. उदगीर येथील दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना प्रसिद्ध आहे.

No Picture
शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले.

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्हा

Category:

 

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्‍यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

या जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. कुणबी, माळी, बंजारा, आंध, गोंड, परधान, आणि कोलाम या काही प्रमुख जमाती या जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. येथे मराठी बरोबरच बंजारी, कोलामी इत्यादी बोलीभाषाही बोलल्या जातात.

No Picture
शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

यवतमाळ महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३,५८४ चौ.कि.मी. आहे जे महाराष्ट्राच्या ४.४ % इतके आहे, तर लोकसंख्या २७,७५,४५७ (सन २०११ च्या जनगणनेनुसार) आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.