शहरे आणि गावे

सिंधूदुर्ग जिल्हा

Category:

 

नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम म्हणजे …सिंधुदुर्ग जिल्हा! अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे.

शहरे आणि गावे

सोलापूर – इतिहास

Category:

 

इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून सोलापूर जिल्ह्याने अनेक राजवटींचा उदय आणि र्‍हास पाहिला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्यावर राज्य करुन गेल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.

शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती

Category:

 

डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर- यांचा जन्म मालवण येथे झाला. ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणारे संस्कृतचे पहिले भारतीय प्राध्यापक होते.१८९५ ते १८९७ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.१९११ साली दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना ‘सर’हा किताब देण्यात आला. पुण्यात यांच्या नावाने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सुरू करण्यात आली.

शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.

शहरे आणि गावे

सोलापूर – उद्योग व्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुर्डूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. पूर्वीच्या काळी येथील हातमाग कापड उद्योग प्रसिद्ध आहे. सध्या येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्सना भारतभर मागणी आहे. काही यंत्रमागधारक यांची परदेशी निर्यातही करतात. कापडी वॉल हँगिंग्ज हे देखील येथील वैशिष्ट्य आहे.

शहरे आणि गावे

सातारा जिल्हा

Category:

 

सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असे सांगणार्‍या समर्थ रामदासांचा सहवास या जिल्हयाला लाभला.

शहरे आणि गावे

यवतमाळ जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्‍यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे

शहरे आणि गावे

वर्धा जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

धुळे-कोलकाता (राष्ट्रीय महामार्ग क्र.६) व वाराणसी-कन्याकुमारी (राष्ट्रीय महामार्ग क्र.७) हे राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जातात. मध्य रेल्वेचे मुंबई-कोलकाता व चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक दक्षिण-उत्तर लोहमार्ग) हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या दोन्ही लोहमार्गांवरील वर्धा हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे

शहरे आणि गावे

सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावर व सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली.

शहरे आणि गावे

लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा रस्त्यावरील विराट हनुमानाची मूर्ती व पार्श्र्वनाथ मंदिर या सारखी धार्मिक ठिकाणे प्रसिद्ध आहेत.