आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.
याची खालील दोन महत्वाची कारणे-
तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !
दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….
आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….