लेखसंग्रह

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळ आणि ‘चास’चा किल्लेवाडा

Category:

 

मी दिव्यांचा संग्रह करायला सुरुवात केल्याला आता ५० वर्षे पूर्ण होतील. या निमित्ताने सध्या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दीपमाळांचा शोध घेत आहे. पुण्याच्या राजगुरुनगरजवळ चासकमान येथील सोमेश्वर मंदिरातील २५६ दिव्यांची दीपमाळ ही अत्यंत देखणी दीपमाळ आहे. ही संपूर्ण दीपमाळ, चारही बाजूच्या भिंतीतील कोनाडे आणि गावातील नदीकाठावरील शेकडो कोनाडे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांनी उजळलेले पाहायला प्रत्यक्ष सोमेश्वर नक्कीच अवतरत असेल ! या दीपमाळेसह आणखी काही वैभवशाली इतिहासाच्या श्रीमंत खुणा पाहायला मिळाल्या.

लेखसंग्रह

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

Category:

 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून “चला पुन्हा ‘समते’ च्या पेटवू मशाली!” म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.

लेखसंग्रह

महर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू

Category:

 

महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या.

लेखसंग्रह

नववर्ष दिवस छे.. छे.. हा तर हिंदू विकृती दिवस

Category:

 

हिंदू धर्मावर केलीली टीका माझ्या मित्रांना आवडणार नाही पण क्रिश्चन नववर्षाची “वाट” आपल्या हिंदू लोकांनीच लावली आहे.आत्ताचा हिंदू समाज धड ना हिंदू धड ना क्रिश्चन असा बेगडी झाला आहे.कुणी हि विकृती आपल्या समाजात घुसवली हे कळत नाही.डी.जे चा धिंगाणा ,बेफाम दारू पिणे ,रस्त्यावर गोंधळ,आणि अनिर्बंध वागणूक हि आजच्या नव हिंदू संस्कृती ची ओळख झाली आहे.

लेखसंग्रह

जुन्या मराठी पंगतीतील नैवेद्य आणि चित्राहुती मागील विज्ञान ! 

Category:

 

पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.

लेखसंग्रह

शिवराय हे निधर्मी राज्यकर्ते होते !

Category:

 

अफजलखानाच्या वधानंतर त्याच्या कुटुंबाची काळजी स्वतः शिवरायांनी घेतली आणि राजगडावर व प्रतापगडावर अफजलखानाची कबर स्वराज्याच्या खर्चाने बांधली. शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता. मानवतावादी होता.

लेखसंग्रह

लोकपाल’ फक्त आंदोलनापुरतेच ?

Category:

 

23 मार्च 2018 पासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा लोकपाल आंदोलन सुरु करत आहेत..त्यानुषंगाने लोकपाल संदर्भातील ‘राजकारणाचा’ उहापोह..

लेखसंग्रह

बालभारतीचा इतिहास पुस्तक आणि फिल्मच्या रूपात

Category:

 

राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.