लेखसंग्रह

दिवाळी आणि रांगोळी…

Category:

 

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली .

लेखसंग्रह

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

Category:

 

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य.

लेखसंग्रह

मौज टांग्याची

Category:

 

अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो.

लेखसंग्रह

ऐकणे ही कला आहे

Category:

 

“कुणाला दोन शब्द शहाणपणाचे,उपदेशाचे सांगायला कोणी गेले की, ” तू ते सांगू नको.मला सगळं माहीतच आहे;” असे जास्तीत जास्त अशिक्षित, अनपढ, गवार, मुर्ख व बिनडोक लोकं म्हणतात. याचे कारण त्यांची क्ष्रवणशक्ती, ग्रहणशक्ती विकसित झालेली नसते. काही सुशिक्षीत, क्ष्रिंमत, अधिकारी, कर्मचारी व व्यवसायी लोकं ऐकून घेण्याच्या, मनस्थितीत नसतात.विशेषत: त्यांच्या उणीवांवर,दोष-दुर्गुणांवर बोट ठेवलेले खपवून घेत नाही.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग दोन

Category:

 

कामाच्या गर्दीत अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे एखादे काम किंवा पदार्थ पूर्ण झाल्यावर आपण हात धुतो. लगेच पुढचं काम वाट पाहात असतं अशावेळेस दोन्ही ओले हात पायाच्या दोन्ही बाजूंकडे साडीला, गाऊनला किंवा ड्रेसला पुसले जातात. कधी ते हात हळदीने पिवळसर झालेले असतात किंवा धुतलेले असले तरी त्यावर तेला-तूपाचा अंश असतो.

लेखसंग्रह

आपलं स्वयंपाकघर.. भाग एक

Category:

 

स्वयंपाक घर म्हटल्यावर खरं तर ते आरशाप्रमाणे स्वच्छ आणि चकचकीत असायला हवं कारण कुटुंबाचं आरोग्य सांभाळण्याचं महत्त्वाचे काम स्वयंपाकघरातच होत असते. प्रत्येक पदार्थाची निर्मिती इथूनच होत असते. तेव्हा सर्व घराबरोबर स्वयंपाक घराची आणि ओट्याची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे.

लेखसंग्रह

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : कर्मवीर भाऊराव पाटील

Category:

 

कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.

लेखसंग्रह

गुलामांचं बेट

Category:

 

‘सेंट हेलेना’ हे दक्षिण अटलांटिक महासागरातलं, आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूरवर वसलेलं, ब्रिटिश अधिपत्याखालचं एक छोटंसं बेट आहे. सुमारे १२० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या बेटाचं, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासूनचं अंतर सुमारे दोन हजार किलोमीटर इतकं आहे. नेपोलिअन बोनापार्ट या फ्रेंच राज्यकर्त्याचं नाव जोडलं गेल्यानं, हे बेट सुपरिचित झालं.

लेखसंग्रह

स्कंद षष्ठी

Category:

 

स्कंदाने त्यांना अभय दिले ऋषि, इंद्रादिनी त्याला इंद्रपद स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा स्कंदाने नम्रपणे त्याला नकार दिला. इंद्राने सेनापती पद स्विकारण्यास सांगितले तेव्हा स्कंद नम्रपणे म्हणाला – दानवांच्या नाशासाठी, देवांच्या कार्यसिद्धीसाठी, गोब्राह्मण यांचे हितासाठी मी हे सेनापती पद स्विकारतो. तेव्हापासून हा देवांचा सेनापती झाला. वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कथांमुळे याचे उत्सवाचे महिने सुद्धा निरनिराळे येतात.