लेखसंग्रह

सर्वव्यापी भ्रष्टाचार!

Category:

 

जनतेच्या सर्वाधिक आशा ज्या न्यायसंस्थेवर केंद्रीत असतात तिथेही भ्रष्टाचार चालतो. मागे सर्वोच्च न्यायालयानेच तशी कबूली दिली होती. तस्करीच्या आरोपाखाली अडकलेल्या अविनाश भोसलेला रात्रीतून जामिन कसा मिळू शकतो?

लेखसंग्रह

अराजकाची नांदी

Category:

 

लोकांनी स्वत:च कायदा हातात घेऊन न्याय करण्याच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एका खेड्यात गावकऱ्यांनी दहा चोरांना बदडून जिवानिशी मारल्याची घटना ताजीच आहे. या चोरांच्या उपद्रवाची अनेकदा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी आपल्या पद्धतीने न्याय केला.

लेखसंग्रह

क्रूर अपेक्षा

Category:

 

निमहकीम लोकांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. रोगी मरणार नाही तर काय? कुणी सांगते पॅकेज द्या, कुणी सांगते सबसिडी द्या, कुणी स्प्रिंकलरसाठी अनुदान देण्याचा उपाय सुचवतो, तर कुणी बियाणे मोफत पुरवायला सांगतो आणि सरकारदेखील फारशी शहानिशा न करता हे सगळे उपाय करून पाहते, त्यासाठी कोट्यवधींची उधळण करते.

लेखसंग्रह

कुठे गेले ते सौंदर्य?

Category:

 

कोण होतास तू, काय झालास तू?’ हे चित्रपटगीत एकेकाळी खूप गाजले होते. आजही त्या गीताचे बोल कानाला सुखावून जातात आणि मनाला विचार करायला भाग पाडतात.

लेखसंग्रह

एक चांगली सुरुवात

Category:

 

जगणे हा अपघात आहे, ती एक कला आहे की नुसतेच एक रहाटगाडगे आहे, यावर मतमतांतरे असू शकतात. जन्माला आलोच आहोत तर मरण येईपर्यंत जगणे भाग आहे, या मताचे बरेच लोक असतात आणि त्यांच्या जीवनात अर्थातच सौंदर्यदृष्टीला फारसे महत्त्व नसते; परंतु जगण्याचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. परिस्थिती कशीही असो, जीवनात आनंद निर्माण करण्याची, जीवनात आनंद शोधण्याची त्यांची ऊर्मी कायम असते.

लेखसंग्रह

औषध कंपन्यांचे सरकारी छत्र!

Category:

 

अलीकडील काळात भारतात नव्या नव्या रोगांनी घातलेले थैमान आणि त्या अनुषंगाने औषध निर्मिती कंपन्यांचा वाढलेला बाजार यात कुठेतरी समान काळा धागा गुंतलेला असावा, अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे. भारतात ज्या कंपन्यांची औषधे प्रामुख्याने वापरली जातात त्यापैकी बहुतांश कंपन्या अमेरिकेच्या आहेत. या कंपन्यांची भारतातील एकूण वार्षिक उलाढाल जवळपास 25 हजार कोटींची आहे आणि दिवसेंदिवस ही उलाढाल वाढतच जात आहे.

लेखसंग्रह

नोकर शाहीचा अजगरी विळखा!

Category:

 

देशाच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या एका रूपयातले 85 पैसे आयएएस अधिकारी आणि त्यांच्या खुषमस्कऱ्यांच्या खिशात जातात असा आरोप कुण्या ऐऱ्यागैऱ्याने नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळातील एका जबाबदार मंत्र्याने केला आहे. केंद्रीय पंचायतराज मंत्री मणिशंकर अय्यर यांनी नागपूरात एका कार्यक्रमात बोलताना ठाामीण भागाच्या विकासात नोकरशाही हा मोठा अडसर असल्याचे स्पष्ट शब्दात सुनावले. या कार्यक्रमाला मणिशंकर अय्यर आणि मीराकुमार उपस्थित होते.