शहरे आणि गावे

उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

२० व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले.१९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण भारतासोबत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे भाग्य  निजामाच्या राजवटीमुळे या जिल्ह्याला मिळाले नाही ,परंतु १९४८ मध्ये हा जिल्हा स्वतंत्र भारताचा हिस्सा बनला.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्हा

Category:

 

चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत.  चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

विदर्भातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच अमरावती जिल्हा कृषीप्रधान असून लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्रावर अन्नधान्याची लागवड केली जाते. ज्वारी हे जिल्ह्यातील एक प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

संत गुलाबराव महाराज – प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील माधान या गावी जुलै, १८८१ मध्ये झाला.  रचली. वेदांत, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांत – हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्‍याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो. अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.

शहरे आणि गावे

अकोला जिल्हा

Category:

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.