अग्रलेखांचा दबदबा
लेखसंग्रह

अग्रलेखांचा दबदबा

Category:

 

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.

आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.

वर्षा ऋतुचर्या
लेखसंग्रह

वर्षा ऋतुचर्या

Category:

 

अंगाची लाही लाही करणाऱ्या वैशाखाच्या रणरणत्या उन्हात सर्वजण पावसाळयाची आतुरतेने वाट पाहत असतात. आगमनाविषयी अनिश्चितता असली तरी जूनच्या सुरुवातीला आपल्याकडे धडकणारा पाऊस येताना आल्हाद, गारवा घेऊन येतो. मात्र हा गारवा, ओलावा येताना अनेक आजारही घेऊन येतो. जरा एक दोन सरी पडल्या नाही की लगेच जवळच्या पर्यटन स्थळी जाऊन भिजायचं, भजी, वडापाव सारख्या पदार्थावर ताव मारायचा, असा जणू काय सध्या ट्रेंड झालेला दिसतो.

चहाची गाथा
लेखसंग्रह

चहाची गाथा

Category:

 

चहा हे उल्हसित करणारे नैसर्गिक पेय आहे. चहामध्ये कॅलरी नसल्यामुळे तुमची सुंदरता टिकवण्यासाठी आणि तुम्हाला फिट राखण्यासाठी चहा हे परफेक्ट पेय आहे. आपल्याकडे बहुतांश (सुमारे ९०%) लोक पितात त्याप्रमाणे म्हणजेच दूध मिश्रित चहा दिवसातून चार कप घेतल्यास आपल्याला सुमारे १७% कॅल्शिअम, ५% झिंक, २२% बी जीवनसत्व, ५% फॉलिक अॅसिड मिळते.

निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व
लेखसंग्रह

निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

Category:

 

रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळ काढायलाच हवा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत याबद्दल

पावसाळ्याचे सोबती
आरोग्य

पावसाळ्याचे सोबती

Category:

 

आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. यात आलं, सुंठ आहेत. आणि गवती चहा हे पदार्थ महत्वाचे आहेत.

डॉ. अर्पिता काजरेकर यांचा लेख 

लेखसंग्रह

रूट कॅनल एक माहिती 

Category:

 

जगभरातील सगळ्यात जास्त म्हणजे ९० टक्के लोकांना पायोरिया हा आजार होत असतो. पायोरिया हा आजार शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे, हिरड्या खराब होणे, दातांची स्वच्छता न राहणे या कारणांमुळे होतो. किडलेला दातांसाठी रूट कॅन वरदान ठरत आहे. कारण त्यामुळे दात वाचला जातो.