चढत्या रात्री द्रव सोनेरी ।
चषकांमधली नशा बिलंदर ।
मंद सानुली ज्योत सांगते ।
हे नच अपुले नवसंवत्सर ।।
थाट चालतो माठ जिवांचा ।
किनाऱ्यावरी गर्दी कलंदर ।
पश्चिमेकडे झुकता झुकता ।
दिशादिशांतील वाढे अंतर ।।
उगा कशाला सदा वाहता ।
दास्यवृत्तीची मढी खांद्यावर ।
रूढी तोडुनी गढी गाडता ।
अभिमानाने फुलेल अंबर ।।
ब्रह्मध्वज हा तुमचा अमुचा ।
चैत्र पाऊली येई निरंतर ।
सरता तम , हे उजाडेल मग ।
सूर्य उद्याचा असेल सुंदर ।।
–रचना : डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
———–
३१ डिसेंबरपूर्वी सर्वांना ही कविता पाठवायला हवी , असं मला वाटतं .तुम्हाला …?