खारेपणा हा अंगी असतां,
कोण खाईल केवळ मीठ,
परि पदार्थाला चव येई,
मिसळत असता तेच नीट ।।१।।
जीवन सारे खडतर ते,
भासते मिठासम मजला,
केवळ जीवन बघता तुम्हीं,
पेलणें अवघड सर्वाला ।।२।।
तेच जीवन सुसह्य होई,
‘आनंदात’ जेंव्हां मिसळते,
हर घडीच्या प्रसंगामध्ये,
समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Author
Post Views: 9