(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • जुळेवाडी तील ज्येष्ठ नागरिक

    जुन्यातील काही माणसे सर्विस मधून रिटायर झालेली दुपारी चार नंतर फिरायला आलेली मला दिसली. त्यातील काही माणसांनी मला ओळखले आणि आठवणी जाग्या झाल्या. आमच्या गावांमधून रेल्वे लाईन जाते पलीकडे बुरुंगवाडी अलीकडे जुळेवाडी व काही अंतरावर हजारवाडी. या गावातील माणसे जुळेवाडी तील प्रत्येक घरटी माणूस ट्राफिक डिपारमेंट इंजिनीरिंग डिपारमेंट. व बुरुंग वाडीतील बहुता श लोक इंजीनियरिंग डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर हजार वाडी येथील घरटी एक दोन माणूस टेलिफोन खात्यामध्ये काम करीत होते.

  • कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

    आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ३५ )

    विजय कोकणातील त्याच्या गावी जाऊन माघारी आला तरी त्याचा पाय काही दुखायला थांबला नव्हता. विजयला आता त्याच्या पायाची खूपच चिंता वाटू लागली होती. कारण अजूनही त्याला पाय खेचत चालावे लागत होते आणि पायऱ्या चढता उतरताना प्रचंड त्रास होत होता. त्याने इंटरनेटवर त्याच्या गुरूंचे त्याचे या महिन्याचे राशी भविष्य पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की येणारा काळ जरी त्याच्यासाठी संघर्षाचा असला तरी यश घेऊन येणारा आहे. त्यामुळे विजय थोडा आनंदातच होता. त्यात तो जो नवीन उद्योग सुरू करण्याच्या विचार करत होता म्हणजे! त्याची छोट्या तत्वावर त्याने सुरुवातही केली होती.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १३

    दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

    मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही खरोखरच कल्पना एक होती कारण प्रत्यक्षात विजय असा कधी कोणासोबत एका छत्रीत भर पावसात शिरल्याचे सध्यातरी त्याला आठवत नव्हते. पण भरपावसात विजय भिजलाय मात्र बऱ्याच जणींसोबत ! छत्री जवळ असतानाही ! विजय लहान असताना त्याला पावसात भिजण्याची प्रचंड आवड होती. पावसाचे पाणी तळहातावर झेलत राहायला तर त्याला आजही आवडते.

  • युगांतर – भाग ४

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवीने हातातला कप बाजूला ठेवला, “ताई काय बोलत्येस तू? कसला आजार? काय सांगत्येस तू हे”, रवीने ताईच्या खांद्यांना हाताने गदगदा हलवून विचारले, त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गूढ भाव निर्माण झाले होते पण ताईने आपलं तोंड घट्ट मिटून घेतलं होतं, नकारार्थी मान हलवून ती सांगायचं टाळायचा प्रयत्न करत होती. “प्लिज ताई बोल ना ग, काय झालं होतं तुला? अण्णा मुंबईला काम आहे सांगून गेले होते ते आठवतंय मला चांगलंच, भयानक पाऊस होता तेव्हा, अगदी श्रावणातील ऐन दिवस, इथल्या पुजाऱ्याने भैरोबाच्या आवरातल्या महादेवाच्या मंदिरात असणे गरजेचेच होते, पण पण…. अण्णांनी अचानक एका संध्याकाळी आईला सांगितलं रात्री मुंबई ला जात असल्याचं.

  • संस्कारांची जपणूक

    रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव.

  • परीसस्पर्श

    स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या अलौकिक कवित्वाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सुद्धा प्रभावित झाल्या. त्यांनी प्रसन्न होऊन अनंत फंदींच्या सन्मानार्थ अलंकार आणि भरजरी पोशाखाची भेट दिली. आणि त्यावेळेस अहिल्याबाई त्यांना म्हणाल्या, “फंदी बुवा ! आपण असामान्य प्रतिभावंत आहात. साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर विलसत आहे. कोणीही प्रभावित होईल असेच आपले कवित्व आहे. परंतु आपली ही काव्यशक्ती तमाशाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनासाठी वापरण्यापेक्षा हरिकीर्तनासाठी उपयोगात आणलीत तर मोठा लौकिक होईल.” अहिल्याबाईंचे हे उद्गार शाहिर अनंत फंदी यांच्या हृदयाला जाऊन भिडले. “यापुढे गाईन ते फक्त हरिकीर्तनासाठीच" अशी भरदरबारात प्रतिज्ञा करून शाहिर अनंत फंदी निघाले. ही प्रतिज्ञा त्यांनी अखेरपर्यंत पाळली. आणि आपल्या प्रतिभेचा उपयोग त्यांनी लोकशिक्षणासाठीच केला. त्यामुळे लोकांना फंदी आठवतात ते त्यांच्या कीर्तनामुळे ! आणि त्यांच्या उपेदशपर फटक्यांमुळे.

    तात्पर्य: कोणत्याही कलावंताला जर श्रेष्ठ व्यक्तीच्या विचारांचा परीसस्पर्श झाला तर त्याच्या कलेचे आयाम बदलतात.

  • इमाम आणि देवदूत

    (इराणची लोककथा)

    शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण
    तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती.

  • सिंह आणि चर्मकार

    फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.