महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य :- एक वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, मसूर, चवळी आवडीनुसार), सहा उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे कॉर्नफ्लोअर, फोडणीचे साहित्य, मीठ, साखर, लिंबूरस चवीनुसार, तेल.
सारणाची कृती :- कडधान्ये वाफवून घ्या. फोडणी करून त्यात कांदा परता. त्यामध्ये मीठ, साखर, कडधान्ये घालून परतून घ्या. वाफ आली, की कडधान्ये गॅसवरून खाली उतरवून थोडी ठेचून घ्या. लिंबू पिळा.
पारीची कृती :- उकडलेल्या बटाट्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर व थोडे मीठ घालून मळा आणि गोळा तयार करा. या मिश्रणातून छोटा भाग घेऊन पारी तयार करा. त्यामध्ये उसळ भरा. पारीचे तोंड बंद करून तळहातावर दाबून तिला चपटा गोल आकार द्या. वर तांदळाचे पीठ भुरभुरून तळा व गरमागरम सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
थोडे तूप घालून खवा तांबूस भाजून घ्यावा. खवा गार झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड, खसखस पूड घालून मळून गोळा बनवावा. हे सारण भरून पोळ्या लाटाव्यात. सोपी पद्धत म्हणजे पेढे आणून ते कुस्करून मळून त्याचा गोळा बनवून ते भरुन भरून पोळ्या कराव्यात.
साहित्य : १ आंबा पिकलेला, २ केळी तयार झालेली, ४ वाटय़ा दूध, ४ मोठे चमचे साखर.
कृती : साखर घालून दूध गार करावे. आंब्याचे बारीक तुकडे करून तेही गार करावेत. दुधात केळी कुस्करून नेहमीसारखी शिकरण करावी व त्यात आंब्याचे तुकडे घालावेत. ही तयार शिकरण वाढण्याच्या वेळेपर्यंत फ्रिजमध्येच ठेवावी.
साहित्य -
२०० ग्रॅ. मिल्क पावडर, २०० ग्रॅ. आयसिंग शुगर, २०० ग्रॅम बाजारी खोबरे कीस, सात-आठ वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स व चंदेरी गोळ्या.
कृती -
मिल्क पावडर, आयसिंग शुगर व खोबरे कीस एकत्र करावे. त्यात वेलदोड्याची पूड व रोझ इसेन्स घालावा. त्यात डावभर दूध घालून मळावे. जरूर वाटल्यास आणखी थोडे दूध घालावे. वरील मिश्रणाचे छोटे मोदक (सुपारीएवढे) प्रसादासाठी करावे. मोदकाचे साचे विकत मिळतात त्यातून काढावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी. मोती लावल्याप्रमाणे फार छान दिसते.
-- संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
उत्तर. नाही... यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही.
भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ. लवकरच अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र येईल आणि त्याच बरोबर शरदाचे कडक ऊन ज्याला सर्वसामान्य भाषेत 'अॉक्टोबर हीट' असे म्हणतात तो काळ सुरू होईल. किंबहुना यंदा पाऊस कमी झाल्याने ऊन्हाचा जोर वाढलेला आत्ताच जाणवत आहे. या ऊष्म्याने पित्ताचा प्रकोप होतो. त्यातच वर्षाऋतूत वातही वाढलेला असतो. पावसाळ्यात अग्निही मंद होतो. अशा मंद अग्निसाठीच लंघनरूपी वेगवेगळी व्रते सांगितली आहेत. या व्रतांच्या निमित्ताने चातुर्मासातील देवपूजनाचे फळ मिळतेच, तसेच उपवासाने पोटास आराम मिळून पचनही बिघडत नाही. व्रते नसताना मात्र हवे तसे सण साजरे करा वा जड पक्वान्ने खा असा संदेश मात्र मुळीच नाहीये. उलट या वाढलेल्या वात-पित्ताला काबूत ठेवण्यासाठीच नारळ-खोबरे-तांंदूळ-गहू-साखर-गूळ-साजूक तूप असे आहारातील नेहमीचेच घटक, लाभदायक तरीही पौष्टिक, तृप्तीकारक पदार्थांचे सेवन करावे असे सांगितले आहे. गौरीसाठी घावन-घाटले हेही तांदूळपिठी, गूळ, खोबरे यांचाच संयोग.
मोदकाचे घटक, त्यांचे उकडणे वा तळणे हे संस्कार हे सर्व देशापरत्वे बदलते. किनारपट्टीला उष्णता असते पण हवा दमट असते, तसेच नारळाचा मुबलक वापर असतो - अशावेळी आहारात दुसऱ्या स्नेहाची फार आवश्यक आहे असे नाही आणि म्हणूनच किनारपट्टीपर तळणीचे पदार्थ कमीच व उकडून करायचे पदार्थ जास्त. पीठा, मोदक, कोळकटै हे पदार्थ सागरी किनारपट्टीवरचेच.
याउलट - देशावर - रूक्षता जास्त म्हणून स्नेहाचे प्रमाण आहारात जास्त असावे लागते यासाठीच तळणीचे पदार्थ व जेवणात तेलबियांच्या वापराचे प्रमाणही जास्त. म्हणूनच तळणीचे मोदक व गौरीसाठी पोट भरायला फराळाचे पदार्थ हेही त्याचसाठी.
वर्षभर या ना त्या कारणांनी, निमित्तानी, सणा-समारंभाला वा कोणताही आनंद साजरा करायला गोड पदार्थांचे नियोजन केले जातेच. श्रीखंड, गुलाबजाम, पुरणपोळी याखेरीज पनीर पासून बनविलेले पदार्थ यांची मोठी चलती आहे. भरीसभर व लगेच उपलब्ध, सर्वांना आवडतात म्हणून केक व पेस्ट्रीज्ची नवी नवी दुकानेही उघडत आहेत व बरकतीत चालतच आहेत. या सगळ्यात आपण आपल्या परंपरा त्याजून वा सोयीस्करपणे बाजूला सारून आपलेच नुकसान करत असतो.
तेव्हा नेवैद्य ना मग तो कोणताही गोड पदार्थ असे आपण सोयीचे करून घेतले असले तरीसुद्धा इतर कोणतेही पक्वान्न असताना निदान गणपतीत तरी मोदकांची उणीव भासतेच, कितीही विकतचे मोदक आणले तरी किमान एक दिवसतरी घरी मोदकांचा घाट घातला जातोच आणि तो घालायलाच हवा.. स्वतःसाठी आणि घरातील सर्वांच्या-आमंत्रितांच्या तब्येतीसाठीही.
अशा या मोदकांनी आपले वात-पित्त आटोक्यात आले असतील, रूक्षता-कोरडेपणा, अतिरिक्त उष्णता कमी केली असेल, रसादि सात धातूंचे पोषण करून, शरीरास आवश्यक स्निग्धता, तृप्ती दिली असेल, बळ दिले असेल, पौष्टिक असूनही वजन वाढवले नसेल असा विश्वास मला आहेच. तुम्हांलाही साजूक तुपाची धार मोदकांवरून घेताना व मनापासून त्यांचा आस्वाद घेताना फक्त Calories, fats, proteins, etc. etc. चे आकडे डोळ्यापुढे न दिसता - व कोणतीही बोच वा खंत वा अपराधी न वाटता आपल्या पूर्वजांना आजच्या नित्य-नूतन संशोधनातून विचार बदलणाऱ्या Dieticians पेक्षा जास्त बुद्धि-प्रज्ञा व मानवाची-त्यांच्या येऊ घातलेल्या पिढ्यांची जास्त काळजी होती हा विश्वास वाटून त्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटले तरच हे मोदकपुराण पचले असे म्हणेन मी. आत्तापर्यंतच्या पिढ्यांनी त्या प्रथा-संकेत विश्वासाने आपल्या पिढी पर्यंत पोचवले यासाठी त्या पिढ्यांचे-पूर्वजांचे आभार मानू या.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ - वैद्य तनुजा गोखले
साहित्य : अंडी, साखर, नारळाचे दूध, पांदान पाने ( ही पाने साऊथ ईस्ट एशिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, थायलंड या शहरात मिळतात. )
कृती : अंडी आणि साखर एकत्र करुन घेणे. त्यानंतर नारळाच्या दूधात पांदान पाने घालून गरम करणे जेणेकरुन
दूधात पांदान पानांचा फ्लेवर येईल. त्यांनतर पांदान पाने मिश्रित नारळाचे दूध आणि अंडी व साखर यांचे मिश्रण एकत्र
करुन मंद आचेवर आटवून घेणे. त्यानंतर हे मिश्रण थंड करुन एका बाटलीत भरुन बाटली फ्रिजमध्ये ठेवून द्यावी.
अशा प्रकारे आपला काया जॅम तयार.
काया जॅमचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ट्रेडिशनल काया जॅम ज्याचा रंग पिवळसर असतो. आणि दुसरा पांदान काया जॅम ज्याचा रंग हिरवा असतो.
साहित्य:- २ वाट्या जाड दलिया, २ वाट्या नारळाचा चव, २ चमचे खसखस, २ वाट्या गूळ, जायफळ व वेलदोड्याची पूड, थोडे तूप.
कृती:- दलिया भरपूर पाण्यात भिजत घालावा. नंतर उपसून त्यात ओले खोबरे व २ चमचे भाजलेली खसखस घालावी. हे मिश्रण कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर ते मोठ्या पातेल्यात काढून त्यात गूळ घालून एकत्र शिजवावे. खूप पातळ ठेवू नये. त्यात जायफळ व वेलदोड्याची पूड घालावी. वाढताना थोडे तूप घालावे. मूळ कृतीत दूध, तूप, खवा, साखर, सुकामेवा वगैरे काहीही नसल्याने डाएट करणाऱ्यांना हा पदार्थ फार आवडतो. आवडत असल्यास या खिरीत आपण नंतर थोडे दूध व सुकामेवा घालू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
खजुर आणि चिंच १ तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजत घातल्यामुळे खजुराच्या बिया सहज निघतील. त्यात गूळ मिसळून हातानेच एकत्र कुस्करावे. मग मिक्सरमध्ये थोडे थोडे मिश्रण घालून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट एका गाळण्यातून गाळून घ्यावी लागेल.
दोडका, गोसाळे (गिलके), पडवळ या भाज्या ताटात दिसल्यानंतर कितीही भूक असली तरी पोटात जात नाहीत.
डाएट फराळ
आजच्या डाएट कॉन्शस वातावरणात दिवाळीचे पदार्थ खाणं अनेक तरुणींसाठी यक्षप्रश्न निर्माण करतात, पण ते खाल्ल्याशिवाय दिवाळीची गंमत ती काय! म्हणूनच आपल्या आधुनिक स्वयंपाकघरात आणि ‘डाएट’मध्ये बसणाऱ्या काही कृती.
डाएट फराळाच्या काही कृती
रव्याचा चिवडा
साहित्य : रवा १ वाटी, कणीक १ वाटी, मीठ १ चिमूटभर, तेल ४ चमचे, तिखट, हळद, आमचूर पावडर चवीनुसार, धने, जीरे पावडर अर्धा-अर्धा चमचा, हिंग २ चिमूट.
कृती : हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेणे. सोपेची पावडर करून घ्यावी. नंतर तयार झालेला गोळा किसणीने किसून डीप फ्राय करावा. कुरकुरीत झाल्यानंतर वरील तयार केलेला मसाला व बारीक सोपेची पावडर घालून हलक्या हाताने एकत्र करून खायला दय़ा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बेक्ड चकली
साहित्य : चकलीची भाजणी २ वाटय़ा, तीळ १ चमचा, ओवा १ चमचा, धणे जीरे पावडर १ चमचा, तिखट, मीठ चवीनुसार, लसूण, हिरवी मिरची १-१ चमचा, कोथिंबीर पेस्ट २ चमचे, आमचूर -अर्धा चमचा, तेल – तळायला
कृती : चकलीची भाजणी व मसाले एकत्र करून घेणे. नंतर २ वाटय़ा पाणी उकळत ठेवून त्यात चकलीच्या पिठाची उकड काढून घेणे. उकड काढल्यावर त्यात अर्धा चमचा इनो घालून पुन्हा मळून घेणे. त्याच्या चकल्या पाडून २०० डिग्रीवर १२ ते १५ मिनिटे बेक करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बेक्ड करंज्या
साहित्य:- २ कप मैदा, २ मोठे चमचे पिठी साखर, ५ मोठे चमचे फ्रिजमधील थंड साजूक तूप,एक चिमूट मीठ, २-३ मोठे चमचे फ्रिजमधील थंड पाणी, २ मोठे चमचे पातळ तूप
करंजीच्या सारणासाठी लागणारे साहित्य:- २ कप खवलेला ओला नारळ, ४ मोठे चमचे कंडेन्स्ड मिल्क
२ मोठे चमचे पिठी साखर, ३ मोठे चमचे पिस्त्याची बारीक पूड, १/४ लहान चमचा वेलदोडय़ाची पूड
एक चिमूट केशर.
कृती:- प्रथम सारण करण्यासाठी नारळ, कंडेन्स्ड मिल्क, पिठी साखर, पिस्त्याची भरड, वेलदोडय़ाची पूड आणि केशर काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांडय़ात एकत्र करावे. मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर शिजवावे. नंतर बाहेर काढून एकजीव करावे व पुन्हा तीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. शिजल्यावर सारण एकजीव झाले पाहिजे; फार ओलसर वाटल्यास आणखीन तीस सेकंद शिजवावे. मग गार करण्यास बाजूला ठेवावे. पारी करायला, मदा, तूप, पिठी साखर आणि मीठ एकत्रित मिक्सर मध्ये ठेवून क्षणभर फिरवावे. असे केल्यास मिश्रण पावाच्या चुऱ्यासारखे दिसू लागेल. आता त्यात एक-एक करून २-३ मोठे चमचे अगदी थंडगार पाणी घालून पुन्हा पल्स करावे. मिश्रण जरा एकत्र येऊ लागेल. दिसायला कोरडे दिसले तरी त्यात आणखी पाणी घालू नये. लाटताना पीठ एकत्र येईल. अर्धवट एकत्र आलेले पीठ िक्लग फिल्म किंवा प्लास्टिकमध्ये घट्ट बांधून, थोडे चपटे करून फ्रिजमध्ये २०-२५ मिनिटे ठेवावे. मग त्याचे लिंबाएवढे भाग करून प्रत्येक भाग प्लास्टिकच्या दोन कागदांमध्ये लाटावा. त्याच्या मधोमध दोन लहान चमचे सारण ठेवावे आणि कागदाच्या आधाराने पारी दुमडावी. कडा दाबून, कातण्याने कापावे. अशा सगळ्या करंज्या करून घ्याव्यात. बेकिंग ट्रे वर तूप लावावे किंवा बटर पेपर लावावा. त्यावर करंज्या ठेवाव्यात. ओव्हनमध्ये १७५ डिग्री तापमानावर करंज्या १५-२० मिनिटे भाजाव्यात. मग त्या बाहेर काढून त्यावर वितळलेले तूप लावावे आणि पुन्हा ५-१० मिनिटे करंज्या भाजाव्यात. तयार झाल्यावर त्यांचा रंग गुलाबी होतो आणि करंज्या खुसखुशीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बेक्ड तिखटा-मिठाचे शंकरपाळे
साहित्य: -२ कप मैदा, १ कप कणीक, १/४ कप तेल, १ लहान चमचा भरडलेला ओवा ,१/२ लहान चमचा तिखट, चवी नुसार मीठ, १/४ लहान चमचा बेकिंग पावडर, साधारण १/४ कप थंड पाणी.
कृती:- प्रथम पाण्याव्यतिरिक्त इतर सारे साहित्य एखाद्या मोठय़ा भांडय़ात एकत्र करावे.
मग थोडे-थोडे करत, गार पाणी घालून पीठ एकत्र करावे. फार मळू नये. भिजवलेले पीठ घट्ट असावे. झाकण घालून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे. पिठी किंवा तेल न लावता भिजवलेले पीठ ५ मिलीमीटर जाडी होईल इतके लाटावे. मग त्याचे आवडेल तसे चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारखे आकार कापावेत.
काटय़ाने प्रत्येक तुकडय़ावर भोके पाडावीत. शंकरपाळे बेकिंग ट्रे वर लावलेल्या बटर पेपरवर ठेवावीत.
ओव्हनमध्ये १७५ डिग्रीवर १५-२० मिनिटे, सोनेरी होईपर्यंत भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti