(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पावन हो तू आई

    पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।

    संसाराचा खेळ मांडला

    खेळविसी तूं मजला

    थकूनी मी जाई ।।१।।

    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    रात्रंदिनीं ध्यास लागला

    जीव माझा तगमगला

    झोप तर येतच नाही ।।२।।

    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    आळवितो मी तुजला

    विसरुनी देहभानाला

    नयनी तव रुप पाही ।।३।।

    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    देह झिजविला

    दुर सारुनी सुखाला

    कां तप फळा न येई ।।४।।

    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    साद दे हांकेला

    पेटलो आहे हट्टाला

    नसता परत जन्म घेई ।।५।।

    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 1, 2020


  • बाईक

     

      July 21, 2013


  • कन्येस निराश बघून

    कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं

    समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं

    झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी

    चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी

    तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी

    खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी

    उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं

    झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही

    असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी

    धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी

    होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले

    हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले

    प्रयत्न होतील सुखी ठेवण्या, राहून अर्धपोटीं

    आशिर्वाद तरी निश्चित असतील, सदैव तव पाठीं

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 27, 2020


  • जखमा उरातल्या ! (नशायात्रा – भाग ४३)

    मलकापूरला प्रशिक्षण दोन दिवस नीट झाले कारण माझ्याजवळ माझा ब्राऊन शुगर )चा साठा होता , पण तिसऱ्या दिवशी मला टर्की सुरु झाली पण मी अंगावर सगळे त्रास सहन करत होतो दिवसभर , मात्र रात्री जास्त त्रास होऊ लागला मला उलट्या झाल्या ते पाहून सोबतचे काळजीत पडले , कदाचित बाहेरचे खाणे , पाणी सहन झाले नसावे असे त्यांना वाटले , इस्माईल भाईंजवळ डोकेदुखी , सर्दी , ताप वगैरेंच्या गोळ्या होत्या त्यांनी मला डोकेदुखीची गोळी दिली ,व आराम करण्यास सांगितले , अतिशय भयानक होती ती रात्र , माझ्या खोलीतील सगळे झोपले होते आणि मी बिछान्यावर तळमळत होतो , सारखे हात पाय गरम होत होते म्हणून मी बाथरूम मध्ये जाऊन हातपाय थंड पाण्याने धुवत होतो , मध्येच एकदम थंडी वाजे , मग कुडकुडत ब्लँकेट घेत होतो अंगावर , जुलाब आला की संडासला पळत होतो , केव्हा एकदा सकाळ होते असे झाले मला कारण आसपास काहीच जाग नसल्याने वेळ जाता जात नव्हता .

    इतर सर्व सुखाने झोपलेले पाहून अश्या वेळी त्या लोकांचा खूप हेवा वाटतो . स्वतची चीड येते , स्वतच्या असहायपणा टोचत राहतो .सकाळ झाल्यावर त्रास सुरूच होता पण आसपासच्या लोकांशी बोलण्यात तो त्रास फारसा जाणवत नव्हता . त्या दिवशी इस्माईल भाईनी मला लॉजवरच आराम करण्यास सांगितले . सर्व निघून गेल्यावर मी कसातरी बाहेर पडलो आणि मलकापूर मध्ये ब्राऊन शुगर मिळते का याचा शोध घेऊ लागलो , पण तेथे फक्त गांजा आणि दारू मिळू शकत होती , शेवटी मी ऐक गांजाची पुडी घेतली आणि ऐक देशीची निप घेऊन लॉजवर आलो , दारू पिऊन , गांजाची सिगरेट भरली आणि ओढत बसलो या नशेत सुमारे ३ तास बरे गेले , पुन्हा दारू उतरल्यावर जास्तच त्रास सुरु झाला , तसाच पडून राहिलो . पोटात काही नसल्याने खूप अशक्तपणा आला होता . असे दोन दिवस काढले , तिसऱ्या दिवशी मला थोडी हुशारी वाटली . पण आतल्याआत त्रास होतच होता ..

    मलकापूरच्या आसपासची बहुतेक गावे करून झाली होती म्हणून मग , खामगावला जाण्याचे ठरले तेथे उरलेले दोन दिवस राहून मग पुन्हा नाशिकला जाणार होतो . खामगावला आमचे लॉज एका थेटरला लागूनच होते म्हणजे अगदी इतके जवळ की थेटर मध्ये सुरु असलेल्या सिनेमातील संवाद आणि गाणी देखील आम्हाला ऐकू येतील , खामगावला संध्याकाळी लॉज वर आल्यावर आम्ही रूम वर बसलो होतो सुमारे रात्रीचे ९.३० झाले असावेत . माझा त्रास जरा कमी होता तरी मन अतिशय अवस्थ होते , बाजूच्या थेटर मध्ये सिनेमा सुरु झालेला होता , काही संवाद अर्धवट कानावर पडत होते व मग गाणे सुरु झाले ' मेरे नैना सावन भादों फिरभी मेरा मन प्यासा ' ' मेहेबुबा ' सिनेमा लागला होता बाजूला . ते गाणे सुरु झाले तसा मी अधिकच अवस्थ झालो , मन एकदम व्याकुळ झाले .. पाहता पाहता मन भूतकाळात जाऊन पोचले ..

    मी आठवीत होतो तेव्हा ..उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होत्या .दिवसभर नुसती धमाल करायचो आम्ही मित्र ..क्रिकेट, सूरपारंब्या . चोर पोलीस , विष -अमृत , जोडीची शिवाशिवी , हत्तीची सोंड , कबड्डी कितीतरी मैदानी आणि बैठे खेळ खेळण्यात दिवस भुर्रकन संपत असे ..त्याकाळी शिवजयंती , डॉ . आंबेडकर जयंती वगैरे च्या वेळी सुमारे तीन चार दिवस कार्यक्रम असत आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे रस्त्यावर दाखवला जाणारा सिनेमा हा असे . सिनेमा जरी उशिरा सुरु होत असे तरी रात्री ९ लाच आम्ही मित्र बसायला पोती वगैरे घेऊन सिनेमाच्या ठिकाणी जागा धरून बसत असू . रस्त्यावर मध्ये पांढरा पडदा टांगूला जाई , सुमारे २० फुट अंतरावरून प्रोजेक्टर वरून सिनेमा दाखवला जाई पडद्याच्या दोन्ही बाजूला लोक बसत , एका बाजूस स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष अशी व्यवस्था असे , बहुधा तेच तेच सिनेमे दाखवले जात नेहमी . जय संतोषी मां , जंजीर , धर्मकन्या , गंगा जमुना , वगैरे , त्या वयात घरून थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहायला परवानगी मिळत नसे,म्हणून हे रस्त्यावारचे सिनेमे आम्ही सोडत नव्हतो , मध्ये रील तुटले की हल्ला गुल्ला होई , प्रोजेक्टर समोर हात नाचवले जात ..कोणीतरी गर्दीत बेडूक सोडे , मग पळापळ , पुन्हा आयोजकांचे शांततेचे आवाहन ..

    तर त्या दिवशी असाच शिवजयंती निमित्य ' गंगा जमुना ' सिनेमा दाखवला जात होता ..मध्येच रील तुटले आणि ते काही केल्या पुन्हा नीट जोडले जाईना , वारंवार रीळ तुटल्याने शेवटी आजचा सिनेमा रद्द असे जाहीर झाले , आमचा सर्वांचा विरस झाला . सिनेमाला माझे शाळेतील अनुराधा थेटर जवळ राहणारे काही मित्र देखील आले होते ..

    सिनेमा दाखवला जाणार नाही म्हंटल्यावर इतक्या लवकर आम्ही घरी जाणे शक्यच नव्हते , तेव्हा एका दिलीप नावाच्या माझ्या वर्गातील मुलाने म्हंटले चला आपण आमच्या घराजवळ जाऊ तेथे गप्पा ..गाणी म्हणत बसू . झाले आम्ही आठदहा जण सुभाष रोड वरून त्याच्या घराकडे निघालो . समोर ऐक मोठी दोन मजली इमारत मध्ये छोटी गल्ली आणि पलीकडील बैठ्या चाळीत दिलीप राहत असे , उन्हाळ्याचे दिवस असल्याने कोणीच लवकर झोपत नसत तर आम्ही त्या इमारतीच्या खाली पायऱ्यांवर बसून गाण्याच्या भेंड्या खेळू लागलो , आमचे आवाज वाढले होते त्यामूळे आसपासचे आणि इमारतीतील जागे असलेले लोक आमची गम्मत पाहत होते .मला लहान पणापासून गाण्याची आवड होती , व गळाही गोड होता त्यामूळे माझा आवाज लक्षवेधी होता . जरा वेळ भेंड्या खेळून झाल्यावर आता एकेकाला आम्ही गाणे म्हणण्याचा आग्रह करू लागलो , इमारतीच्या वर लावलेल्या ट्यूबलाईटच्या हलक्या प्रकाशात आम्ही सर्व बसलो होतो ..जेव्हा मला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला तेव्हा आधी मी . केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ' हे भक्तीगीत म्हंटले , गाणे संपल्याबरोबर सर्वानी टाळ्या वाजवल्या व मला हिंदी गाणे म्हणायचा आग्रह झाला आता इमारतीतील लोक देखील मुलांची ही गाण्याची मैफिल ऐकायला जमले होते , मी दुसरे गाणे त्यावेळी सगळीकडे गाजत असलेल्या ' महेबुबा ' सिनेमातील म्हणू लागलो ' मेरे नैना ..सावन भादो .." किशोर कुमारने गायिलेल्या अनेक गीतांपैकी हे अतिशय सुंदर गाणे आहे . मी मग्न होऊन गाणे म्हणत होतो ..आवाज टिपेला पोचला होता. त्याच वेळी जाणवले की गर्दीतून कोणीतरी आपल्या कडे रोखून पाहत आहे जरी नीट चेहरा दिसला नाही तरी ती मुलगी सारखी आपल्याकडे पाहते आहे हे जाणवले ..ट्युबलाईट च्या अंधुक प्रकाशात देखील तिचे ते रोखून पाहणे मला स्पष्ट जाणवत होते ...

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

      June 29, 2020


  • मुरब्बी

    लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर
    आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,

    विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार
    पक्वपणा त्याच्यातील, देई आनंदाला धार...२,

    पक्वपणा येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी
    ज्ञान तेव्हां चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,

    विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो
    अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पावूल टाकतो...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 11, 2018


  • मनोगत श्रीगणेशाचे !

    || हरी ॐ ||

    वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान,

    त्याचे नाही कधी चुकले भान!

    या वर्षी येताना मनात शंका नाना,

    आनंदाने स्वागत होईल ना?

    शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण,

    पीक गेले हातचे शेत झाले वैराण!

    माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात,

    आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात!

    वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या,

    नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या!

    पल्लवल्या आशा मराठवाडा-विदर्भकरांच्या,

    आला जीवात जीव थोडा सगळ्यांच्या!

    आनंदाने नाचली माझी पोरं,

    नद्या नाल्यांना आला मोठा पूर!

    दीड दिवसाने आला दिवस पुनर्मिलाप

    काहींचा नदी तलाव समुद्रात

    काही कागदाच्या लागद्यांचे

    घरच्याघरी आरामात!

    पुनर्मिलापा दिवशी समुद्रावर जमले माझे भाऊबंध

    आरतीत कोणाचेच नव्हते लक्ष!

    आता आपले विसर्जन प्रदूषणयुक्त समुद्रात,

    दुसरे ठिकाण नाही लक्षात आले वाटतं?

    सुख दु:खाच्या गप्पागोष्टी जोरात,

    एक म्हणाला मला आकारतांना पीओपी वापरतात !

    किती आग होते माझ्या शरीराची

    एवढे कमी म्हणून रासायनिक रंगाने रंगवतात !

    एक दुसऱ्याला म्हणाला

    त्याला आकारतांना मऊ कागदाचा लगदा

    गोंद व्हायटिंग पावडर

    आणि नैसर्गिक रंगांचा वापर !

    शाडूचा म्हणाला हल्ली मला जास्त मागणी,

    पण माती आता मिळणे कठीण, रंग झाले महाग,

    वजनानेही मी जास्त वजनदार,

    त्यामुळे वाढला कागदाच्या लगद्याचा डिमांड !

    जगदीश पटवर्धन

      August 24, 2017


  • रागाच्या साऱ्या शब्दांवर

    रागाच्या साऱ्या शब्दांवर
    अनुराग ही अबोल झाला
    न कळल्या अबोध वेदना
    दुःखाचा थेंबही पापणीत मिटला
    मनुष्य जन्म लाभला असा
    तरी सार्थक भाव लोपला
    न कळत्या जाणिवांना मग
    कुठे किनारा न मिळाला
    प्रेमच सुंदर अंतिम जीवनी
    तरीही वेदनेचा डोह पेटला
    अनुरागच जीव गुंतवी हृदयात
    मोह मनात मोहक फुलता
    जीवनात प्रश्न अनेक पडती
    न उत्तरे मिळतात कित्येक प्रश्नांना
    न कोडे सुटते आयुष्यात कितिक वेळी
    परी प्रश्नांचा ओघ न कधी अलगद मिटला
    मीच का रे रिंगणात उभी
    फेर गोल सभोवती धरला
    न सहज सुटले रिंगण हे
    स्त्री जन्म हा असाच घुमतो नाच हा
    उभे राहिले प्रश्न अनेक
    कुठे चालले मन माझे आता
    वळणावरील वळण सारे
    कुठे नेतील या वळण वाटा
    थेंब टपोरे अळवावरील हे
    निसटून जातील क्षणात मोती धारा
    उलगडेल का गहन हा खेळ सारा
    आयुष्याचा मेळ कसा मग जुळावा
    -- स्वाती ठोंबरे.

      February 5, 2022


  • गंमत न्यारी

    काळोखातही सृष्टीची ही गंमत न्यारी

      July 12, 2026


  • काटेरी जखमांवर रुतणाऱ्या वेदना

    काटेरी जखमांवर रुतणाऱ्या वेदना
    मनाला हलकेच तडा देऊन गेल्या,
    तेव्हाच तुझ्या मिठीचा ध्यास तनुभर
    मोरपीस अलवार मोहक फिरवून गेला
    व्यकतेत माझ्या दुःखच डोळ्यांत तरळले
    माझ्याच दुःखाचे पड तुझ्या मोहात मिटले,
    दुःख लपवता अधिक ते डोळ्यांत साचले
    नागवे सत्य आनंदाचे हवेत केव्हाच विरघळले
    तुझ्या कक्षेत माझे येणे कधीच नव्हते
    न कुठला अट्टहास न हट्ट काही होते,
    नकळत तुझ्या मोहाचे मनात दव भिजले
    नव्हता ध्यास कुठला नव्हते मनात मोह चांदणे
    परी आलास तू वादळ होऊन अवचित पणे
    माझेच मला न कळले मोहाचे फसवे जाळे,
    गुंतले मोहाच्या नकळत धाग्यात अलगद रे
    अन दुःख अधिक आता अंतरगी वाढले
    का भुलवितो चंद्र चांदण्यांना आकाशी
    चांदणे मधुरम आकाशी असे सजते,
    दिसते समोर मृगजळ फसवे मजला
    परी कासावीस जीव जलात मी फसते
    कसली ही शिक्षा अंतरी अनामिक
    न गुलाब परी काटेरी सल बोचते,
    कितीक सोडवू मी स्वप्न बावरे क्षण ते
    न मनाला काहीच कधी न उमगते
    कितीक काळ जावा असाच वेदनेचा
    तुला न कधीच मिठीतले ते चांदणे कळले,
    उरला आता तुझा निःशब्द राग कटू अबोला
    मी अजूनही शांत स्निग्ध भाव मिठीत मिटले
    -- स्वाती ठोंबरे.

      February 2, 2022


  • प्राण ज्योत

    दिवा होता छोटासा, एक मजकडे ।
    इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे ।।

    तळांत होती योजना, तेल सांठवण्याची ।
    शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची ।।

    छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन ।
    मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी ।।

    देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे ।
    प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे ।।

    केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं ।
    व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ।।

    ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं ।
    तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 18, 2017