(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चुकांवर चुका

    आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? . विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा .

      January 16, 2024


  • मद्याला स्पर्श ना अद्याप केला करू मी काय गझलेच्या नशेला

    प्रदीप निफाडकरांची गझल

      April 17, 2010


  • जागतिक पोलिओ दिन

    जगातून पोलिओच्या उच्चाटनात जोनस सॉल्क यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलिओची पहिली लस शोधून काढली होती.

      October 24, 2021


  • मजुरीनं मारलं

    यावर्षी बळीराजाला,
    सोयाबिननं तारलं !
    पण जगाच्या पोशिंद्याले,
    मजुरीनं मारलं !!१
    ...
    हजार रुपय एकरानं,
    मागील वर्षी सोंगलं !
    दोन हजार एकरानं,
    मजुर यंदा बोंबलं !!२
    ...
    मळणीवाला म्हणतो मला,
    दोनशे रुपये पोतं !
    मी म्हटलं त्याचा काय,
    आता जीव घेतं !!३
    ...
    आलं आभाळ, झाकण्यासाठी,
    ताडपत्री नेतो !
    दोन हजारानं इथे त्याचा,
    खिसा कापला जातो !!४
    ...
    एवढ सार करुन सोयाबीन,
    बाजारात नेतो !
    ओलं आहे म्हणून भाव,
    सोळाशाचा येतो !! ५
    ...
    घरी आल्यावर सारा हिशेब,
    चुकता करुन देतो !
    हाती नाही राह्यलं काही,
    म्हणून रोगर घेवून घेतो !!६
    ...
    यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
    वाली कोणी व्हा रे !
    नका देवू दुजे काही,
    हिंमत तरी द्या रे !! ७
    ...
    असाचं जर बळीराजा,
    जहेर पिऊन मेला !
    आपलाही पुढे समजा,
    खेळ खलास झाला !!८
    ...
    सरकारच्या दरबारी,
    आवाज उठला पाहिजे !
    त्याच्यासाठी प्रतिनिधी,
    आमचा झटला पाहिजे !!९
    ...
    जय किसान जय जवान,
    आठवा आता नारा !
    दोघांसाठी खरचं आता,
    काहितरी करा !!१०
    ...

    फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
    प्रेषक - विनय साटम

      October 28, 2016


  • दीपोत्सव

    आली मांगल्याची दीपदिवाळी
    सुखसौख्याला सजवित आली
    उत्सवांचा राजा, सण दिवाळी
    दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली...

    स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
    जणु वसुंधराच तारांगण जाहली
    दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
    अमंगळ सारित मांगल्या आली...

    सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
    अंगणी संस्कारांची सडारांगोळी
    तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
    दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली...

    वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
    बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
    पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
    चैतन्या! सजवित मढ़वित आली...

    वि.ग.सातपुते.( भावकवी )

    ( 976654908 )

    रचना क्र. २७०

    २४/१०/२०२२

      October 30, 2022


  • चैतन्य

    ****
    बरस बरसला घन
    रिमझिमल्या धारा

    चंद्र नभीचा भिजला
    सुस्नात झाली वसुंधरा

    धुंद सुगंध मृदगंधला
    सभोवती दरवळणारा

    श्वासात श्रावण श्रावण
    पवन तो झुळझुळणारा

    जीवास चाहुल तृप्तिची
    सुखावितो विंझणवारा

    सृष्टित साक्ष चैतन्याची
    साक्षात स्वर्ग भुलविणारा
    *******

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २९७

    १९/११/२०२२

      November 24, 2022


  • आला पंचमीचा सनं……

    आला पंचमीचा सन,घेऊन माहेरचा सांगावा
    बैलं जोडुनं डमनीलं,आला घ्याया भाउराया.

    वाट माहेराची सये,कटता कटेनं लवकर,
    मन व्हतया पाखरू,धुंडे माहेरचं आंगणं.

    डमनी भाऊरायाचीबाई,नाद घुंगराचा छुनछुनं,
    मन होई कासाविस,पाह्या माहेरचं गणगोतं.

    माहेरात सखीबाई,दारी मिजाज उंबराची,
    आठवे लहानपणचा झोका,मन लहानुनं जाई.

    आला पंचमीचा सनं,झोका झाडालं बांधला,
    वरसाची नवलाई,खेळं हौशीचा मांडला

    सासुरवाशीन मी गं सये,सुखं माहेरचा झोका,
    झोका खेळी वार्‍यासंग,ईसरे संसारीची चिंता.

    चला जाऊ वारूळालं,नागराजालं पुजुया,
    दुध,लाह्या, काकडी गं,नागराजालं वाहुया.

    पंचमीचा सन बाई,तवा चुलीशी भांडला
    कान्हुटे नं लाह्या बाई,निवद देवालं दावलां.

    सन पंचमिचा बाई,देई सुखालं आवतनं,
    माहेरवाशीण सयाबाई,पुनः जगती लहानपणं!

    © गोडाती बबनराव काळे

    9405807079

      August 21, 2023


  • गर्भगिरीतील नाथपंथ

    2-front-300नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.

    हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.

    गर्भगिरीतील नाथपंथ
    लेखक
    : टी. एन. परदेशी
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : २५०/- रुपये
    पाने : २०८

      October 18, 2016


  • पसायदान

    आतां विश्वात्मकें देवें । येणे वागयज्ञें तोषावें ।
    तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
    जे खळांची व्यंकटी सांडो ।
    तया सत्कर्मी रति वाढो ।
    भूतां परस्परें जडो । मैत्र जीवाचें ।।
    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
    जो जें बांडील तो तें लाहो । प्राणिजात ।।
    वर्षते सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
    अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।
    चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।
    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
    चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन ।
    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
    किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
    भजिजो आदिपुरुखीं । अखण्डित ।।
    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
    दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।।
    येथ म्हणे विश्वेश्वरावो । हां, होईल दान पसावो ।
    येणें बरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।

      June 11, 2026


  • मुंग्या

    मानवाने पाहिले की
    त्याच्या चारी बाजूंना
    मुंग्या पसरलेल्या होत्या,
    मुंग्याच मुंग्या.
    मानवाने कुतूहलानें पाहिले,
    आश्चर्याने पाहिले. १

    कांहीं वेळानंतर
    मुंग्या मानवाला चावू लागल्या.
    मानव बिथरला.
    त्याने मुंग्यांच्या वारुळाला
    लाथा मारल्या, धक्के मारले.
    जमिनीला भेगा पडल्या.
    मानवाने मुंग्यांवर पाणीच पाणी फेकले,
    इतके पाणी, जसा कांही प्रलयच.
    मुंग्यांचे वारूळ
    मुळापासून हादरून गेले,
    मुंग्या समूळ नष्ट होऊ लागल्या.
    मानव पहात राहिला,
    निर्विकार. २
    *
    या धरणीवर
    आपण माणसेसुद्धा
    पसरलेलो आहोत मुंग्यांसारखेच.
    आपणही
    पृथ्वीला त्रास देतो आहोत,
    तिचे चावे घेतो आहोत,
    वारंवार, पुन्हापुन्हा.
    आपणही
    धरणीला क्रोधित करत आहोत.
    म्हणून तर
    मोठाले धरणीकंप होत आहेत,
    उंचउंच त्सुनामी येत आहेत.

    कुठवर
    धरणीच्या प्रकोपापासून
    माणूस वाचेल ?
    कुठवर ? ३
    *
    जर मुंग्या चावल्या नाहींत,
    मुंग्यांनी जर त्रास दिला नाहीं,
    तर मानव विनाकारण
    त्यांचा विध्वंस करत नाहीं.
    माणसानेसुद्धा
    पृथ्वीला, निसर्गाला, पर्यावरणाला
    त्रास देऊ नये, त्यांचे चावे घेऊ नयेत.
    तरच मानव सुरक्षित राहील.
    जमेल ना हें आपल्याला ?
    जमायलाच हवें ! ४

    (स्वत:च्या हिंदी कवितेचें मुक्त भाषांतर)

    - सुभाष स. नाईक
    M- 9869002126

      April 23, 2016