(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तृप्तलो आता

    मालवुनी टाक रे, दीप तू आता
    मन शांत जाहले, तृप्तलो आता..

    उजळल्या अंतरी, नाना गतस्मृती
    थकलो स्मृतींचे, भार पेलता पेलता..

    कोवळी मध्यान्न, गेली सांजाळूनी
    सांजेसवे लपली, यामिनीच आता..

    निवता लोचने, हुरहुर स्पंदनांना
    चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा..

    मालवुनी टाक रे, दीप तू आता..
    मन शांत जाहले, तृप्तलो आता..

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२३९

    १८/९/ २०२२

  • मीच एक सर्वज्ञ

    जगीचा, साराच छद्मीपणा
    सुज्ञजन, सारे ओळखून आहे

    सत्यता! विकृत मनांमनांची
    साऱ्यांनाच, तशी ज्ञात आहे

    काही, आत्मप्रौढी मिरविणारे
    स्वतःला मी सर्वज्ञ मानत आहे

    ते झाले जरी, थोडे आत्ममुख
    स्वओळख त्यांची होणार आहे

    जो शहाणा त्याचा बैल रिकामा
    माणसा ही जगाची रहाटी आहे

    मी,पणाचा आव कुणा नसावा
    गर्वाचे घर नेहमीच खाली आहे

    नम्रता, कृतज्ञता सदा वंदनीय
    मीत्व! सर्वथाच निंदनिय आहे

    करू नये सान, थोर इथे तुलना
    सरणी सर्वां सारखा न्याय आहे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ३७.

    ६ - २ - २०२२.

  • ये विचारू पावसाला

    https://youtu.be/oOvXBVb5DAQ

  • ईश अस्तित्वाची ओढ

    उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
    चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।

    किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
    गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।

    सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
    पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।

    पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
    शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।

    निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
    उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • उमलणारी फुले

    चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या

    फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या

    निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं

    स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं

    चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची

    प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची

    आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें

    मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे

    सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी

    जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी

    हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी

    क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी

    नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी
    फुलले क्षण भाव विभोर मनात काही
    कसली चाहूल मनात काहूर का उठती
    मीच मला शोधते हरवले अंतरी गुज काही
    भाव कल्लोळ अंतरात मन ओढ कशाची
    न कळत लोचनात आपोआप दाटे पाणी
    मोगऱ्याचा घमघमाट अंतरात वेढून जाई
    हसले लाजून कुणी ते लाजणे हृदयस्थ होई
    स्पर्श मोहक खुणावतो निःशब्द काही
    वेळूच्या बनी मुरली मोहक वाजे मोहवुनी
    रंगाचे रंग खुलले भवताली रंगुन काही
    शुभ्र धवल रंग खुलून जाई पिसाऱ्यातुनी
    मनास काय हवे ते अलवार भाव टिपती
    हृदयात मिटे हृदयस्थ शब्द भाव मिटती
    स्त्रीच्या लाजेतही खुलतो गजरा सुकेशी
    हास्य अलगद मुखी विलसते मग गाली
    कोमल मधुर भाव अंतरात यावे उमलुनी
    बहरात चांदणे न्हावे आकाश चांदण्यांनी
    -- स्वाती ठोंबरे.
  • पूजा भाव

    पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी
    प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी

    पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले
    मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले

    पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली
    नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली

    वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी
    खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी

    मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो
    ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो

    आनंदाचा मार्ग मिळाला देई खरे समाधान
    पूजा विधीतील भावाला असे महत्वाचे स्थान

    डॉ भगवान नागापूरकर
    9004079850
    bknagapurkar@gmail.com

  • कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल.

  • नाती- गोती कसली

    नाती- गोती कसली,?
    करती कशी रक्तबंबाळ,
    जीव'च नाही, आत्माही,
    होती सारेच घायाळ,--!!!

    कुठले मित्र,कसले सखे,
    कशाशी खातात मित्रत्व,
    स्वार्थ भांडणे वाद ,---
    एवढीच जगण्याची तत्वं,--!!!

    कसली नीती कशाची मत्ता,
    एक दुसऱ्याचा गिरवी कित्ता, खरेपणाची बूंजच नसता, असत्याचीच इथे सर्व सत्ता,--!!!

    माझी पोळी, तुझेच तूप,
    नव्हे, तुझी पोळी तुझेच तूप,
    झाले माझेच ते,तू कितीही खप,
    तू खोटा, बाप खोटा,जरा जप,--!!

    कोणता भाऊ कोण बहीण-?
    कोण भार्या,कोण विहीण,
    नणंद, जावा, भावजया,
    हरेक भासे विषारी नागीण,--!!!

    कसले घर अन् कसले घरपण,
    परस्परांवर तुटून पडती,
    विसरुन आपुले पुरते बालपण,
    विसरुन सगळी नाती,--!!!

    आखाडाच तो घर कसले,
    करुन टाकती त्याचे रणांगण,
    पैसा जोडी, पैसा तोडी,
    सत्तालोलूप मानव खोडी,
    कामना, लालसा, ईर्ष्या
    घालती माणुसकीला बेडी,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • मन:शांती

    जगायचे अजुनही राहिले किती
    जगुनही जगती या कळले नाही
    आठविती सारे क्षण ते भोगलेले
    आसक्ती, लालसा संपली नाही
    हव्यास, जीवनी असावा किती
    याचाच अंदाज बांधता येत नाही
    समाधानी वृत्ती सदा मनी असावी
    त्यावीण दुजी जगती सुखदा नाही
    सुखदुःख, आनंद, दान भाळीचे
    भोगण्याविण दुसरा पर्याय नाही
    जे जे लाभले ते ते दान भगवंताचे
    त्याच्या कृपेविण जीवा सद्गती नाही
    हसत खेळत जगुनी जीवा जगवावे
    संघर्षात कदापिही मन:शांती नाही
    ठेविले अनंते, तैसेची जगी रहावे
    याविण दूजा, जीवनाचा अर्थ नाही
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १२८.
    ५ - ५ - २०२२.