आपल्या बागेतील फुल पाहताच कोणाचेही लक्ष वेधून घेणारी वनस्पती म्हणजे ‘अग्निशिखा’ होय.अग्निशिखा ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.जंगलात शोध घेतला तर ही वनस्पती खूपच विरळ प्रमाणात आढळून येत आहे. जंगलांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे ह्या वनस्पतीचे जमिनीतील कंद नष्ट होतात.पर्यायाने ही प्रजाती दुर्लभ झाली आहे.नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्या परसबागेत स्थान देण्याची आज निकड निर्माण झाली आहे.
हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा............................... ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा
हा सागरी किनारा............................... हा सागरी किनारा
ओला सुगंध वारा................................ ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा
मी कालचीच भोळी............................... तू कालचाच भोळा
मी आज तीच येडी............................... अन् आज तोच येडा
ही भेट येगळी का............................... ही भेट येगळी बा
न्यारीच आज गोडी............................... न्यारीच आज गोडी
का भूल ही पडावी? वळखून घे इशारा................ ना भूल ही जराबी, वळखला मी इशारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा................... मिटल्या मुठीने येतो अंगावरी शहारा
होते अजाणता मी................................ होतास अजाणता तू
ते छेडले तराणे.................................. मी छेडले तराणे
स्विकारल्या सुरांचे................................ मंजुळ मम सुरांचे
आले जुळून गाणे................................ आले जुळून गाणे
हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा.................. हा रोम रोम गाई, गातो निसर्ग सारा
ओल्या मिठीत आहे हा रेशमी निवारा.................. मिटल्या मुठीत आहे हा रेशमी निवारा
बोलू मुकेपणाने.................................. बोलू मुकेपणाने
होकार ओठ देती................................ होकार ओठ देती
नाती तनामनांची................................. नाती तुझी नि माझी
ही एकरूप होती................................. भावाभावांची होती
एकान्त नाचतो हा फुलवूनिया पिसारा................... येथेच नाचतो मी फुलवूनिया पिसारा
ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा.................... डोळ्यांस मिटल्या दिसे एक उंच मनोरा
- जगदीश खेबूडकर............................... - आकाश विहारकर
अरे बाबा काय होत तुला एवढे उपचार केले तू बरा का होत नाही रे बाळा
२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!
आयुमित्र
दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते.
ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे.
मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर ह्यांनी फारच interesting fact सांगितली. मेडिकलच शिक्षण घेणारे ५०% विद्यार्थी सतत तणावात असतात. जे पुढे जाऊन आरोग्यसेवा पुरविणार आहेत. नुसतेच मेडिकल नाही तर कुठल्याही शाखेचेळ्रौ शिक्षण असो. साध्या १वी व १२वीच्या निकालाडानंतर वर्तमान पत्रात आत्महत्याविषयक बातम्या हमखास असतातच. डिप्रेशनल बऱ्याच आजारांच प्रमुख कारण आहे. WHO नुसार २००५ ते २०१५ च्या दरम्यान तब्बल १८%पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिप्रेशनमुळे डायबेटीस, हृदयरोग ह्यासारखे असंसर्गन्य रोग तर होतात पण डिप्रेशनमुळे आत्महत्येच प्रमाणही वाढते आहे.
डिप्रेशन म्हणजे काय?
अधुनिक शास्त्रानुसार १४ दिवसापर्यंत तुम्ही सतत दु:खी असाल, दैनादिन क्रिया करणेही जड झाल असेल. ज्या दैनंदिन क्रिया तुम्ही आनंदाने करत होता त्या करण्यात अजिबात रस वाटत नसेल तर तुम्हाला डिप्रेशन असू शकते.
डिप्रेशनची मूळ लक्षणे काय आहेत.....।...
निरुत्साह, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, पचनक्रिया बिघडलेली असणे, झोप कमी वा खूप झोपावेसे वाटणे, कुठल्याही कामात मन एकाग्र न होणे, स्वतःबद्दल वाईट वाटत राहणे, माझा काहीच उपयोग नाही, मी काही कामाचा नाही अशी भावना निर्माण होणे, निराशा वाढणे आणि स्वतःला संपविण्याची किवा त्रास पोचविण्याचे विचार मनात येणे अशी लक्षणे डिप्रेशन ह्या प्रकारात येतात.
डिप्रेशन कोणाला होऊ शकते?
डिप्रेशन कोणालाही होऊ शकते. तो सार्वभौम आहे. तो भेदभाव करत नाही. गरीब असो श्रीमंत असो. त्याला देश, लिंग, वय ह्याची मर्यादा नाही. परंतु प्रामुख्याने किशोर, तरुण वयातील, प्रसूत माता आणि ६० वर्षाच्या वरील वृध्द लोक ह्यांना डिप्रेशनची शक्यता जास्त असते.
डिप्रेशन कश्यामुळे येते
पुरेसा पैसा नसणे, गरिबी असणे, नौकरी, व्यवसाय न मिळणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, प्रेम संबंध तुटल्याने म्हणजेच ब्रेकअप,दीर्घकालीन आजारपण किंवा कॅन्सर, एड्स सारखे आजार होणे. दारू आणि DRUGS च्या वापरामुळे डिप्रेशन येऊ शकते.
डिप्रेशन ला उपाय काय?
आयुर्वेदात काय उपाय आहेत?
आयुर्वेदाने शरीर आणि मन दोघांच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. सदवृत्त पालन, धारणीय Nवेग, सत्वावजय असे उपाय सांगितले आहेत. मनाचा सत्वगुण वाढवून मानसिक व्याधी दूर वभभकरण्यासाठी आयुर्वेद काम करतो. विस्तृत कधीतरी लिहीनच.
WHO टॉकिंग थेरपी-
सध्या एक चित्र सगळ्यांनी बघितल असेल. घरात सगळे बसलेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण घरात एकमेकांशी आपण बोलत नसतो. सगळे सोबत असून आपण एकटे असतो. कारण जो ढतो त्याच्या whatsapp आणि फेसबुक वर online असतो. पूर्वी जेवायला सोबत, संंध्याकाळी रामरक्षा, प्रार्थना असेल ती सोबत होत असे. आता प्रत्येकाच्या घरी येण्याच्या वेळा वेगळ्या जेवणाच्या वेळा वेगळ्या त्यामुळे घरातलाच संवाद कमी झालाय. मित्रांशीहि संवाद हा प्रत्यक्ष जास्त न होता whatsapp आणि फेसबुक च्या माध्यमातूनच जास्त होतो. आजकाल प्रेमही online होत आणि लग्नही त्यामुळे बोलायलाच नको. एकाच flat स्कीम मध्ये शेजारी जन्म झाला, मरण झाले तरी कळत नाही कारण आमच्यात संवादच नाही.
WHO म्हणतय बोलण वाढवा, संवाद करा डिप्रेशन दूर होईल. आपल्या प्रधानमंत्रिनी सुद्धा हाच संदेश दिला आहे. “Expression of Depression instead of suppression”
आपले मित्र, आईवडील, भाऊ-बहिण ह्यांना आपले शेयरिंग पार्टनर बनवा. मनातील गोंधळ, भीती, दुखः, निर्णय आपल्या विश्वासू लोकांजवळ नक्की बोलून दाखवा. ह्याउलट जो डिप्रेशन मध्ये आहे त्याच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करा त्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत नक्कीच होईल.
आपली “मन कि बात” कराच पण दुसऱ्यांच्या “मन कि बात” पण ऐका म्हणजे डिप्रेशन नक्की कमी होईल.
चला तर करूया मन कि बात आणि डिप्रेशनवर मात ….
–वैद्य भूषण मनोहर देव.
आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी.
मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणार्या पक्षांची ते टीपताना …..
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते. या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.
मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिले. ते गेली शेकडो वर्षे उपयोगी पडले, मार्गदर्शक ठरले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेला आम आदमी पार्टीचा विजय आणि आता दिल्लीच्या सत्तेच्या दिशेने चाललेली त्यांची वाटचाल याबद्दल राजकारणी, समाजकारणी आणि विद्वान मंडळी यांना काय वाटत हा विषय थोडावेळ बाजुला सारून आता समोरच दिसणार्या लोकसभेच्या आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा यांचा विचार करता महाराष्ट्रतील एका सर्वसामान्य मतदाराच्या नजरेतून या निवडणुकीकडे पाहिले असता सर्वसामान्य मतदाराच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार की मी ही महाराष्ट्रात आम आदमी पार्टी सारख्या पर्यायाच्या शोधात नाही ना की आम आदमी पार्टी हाच माझ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल ?
जॉर्ज वॉशिग्टंन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होऊन गेले. हा माणूस अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा होता. मीना गवाणकर यांनी या शास्त्रज्ञाचे “एक होता कार्व्हर” नावाचे एक छोटेखानी सुंदर असे आत्मचरित्र लिहीले आहे. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की हा शास्त्रज्ञ एकदा चर्च बाहेर बसला असतानां त्याच्या तोंडून अत्यंत गोड आवाजात उस्फूर्त असे गीत बाहेर पडले ज्याचा समावेश जगातील उत्कृष्ट गाण्यात होतो. हे कसे घडले असावे? मला असं वाटतं की त्यांच्या आतली अतीउत्कट अशी मानवीय संवेदना गाण्याच्या रूपाने अशी बाहेर आली असावी. अनेक मान्यवर गायक वा गायिका असे मानतात की गाणे दोन प्रकारचे असते एक जे गळ्यातुन येते आणि दुसरे जे हृदयातुन येते. यात जर आवाजाची नैसर्गिक देणगी असेल तर हृदयातुन गळ्याद्वारे बाहेर पडणारे गाणे नि:संशयपणे अप्रतिम होते. गीता घोष रॉय चौधरी उर्फ गीता दत्तचे असेच काहीसे होते.
वयाच्या सोळाव्या वर्षीच गीता रॉयला गायनाची पहिली संधी मिळाली ती कोरस मधील दोन ओळीच्या रूपात. खूप मोठ्या जमिनदाराच्या १० अपत्यापैकी गीता एक होती. त्यात मुलगी असून गाणे शिकते व गाणे गाते हा तसा विरोधाभासच होता. तिचे वडील आपली ईदीलपूरची जिल्हा फरीदपूर (आताचा बांगला देश) मधील सर्व जमिन व इस्टेट मागे ठेवून कलकत्ता व आसामला आले. पूढे मग त्यांनी मुंबईला येऊन दादरला एक फ्लॅट खरेदी केला व तेथेच राहू लागले. त्यावेळी गीता रॉय १२ वर्षांची होती. लहानपणा पासूनच संगीताची ओढ गीताला होती. हनुमान प्रसाद नावाच्या एका संगीतकाराने गीताचा आवाज ऐकला आणि तिला गाणे शिकवण्याची जबाबदारी घेतली. पूढे त्यानीच मग “भक्त प्रल्हाद” नावाच्या चित्रपटात कोरस मधील दोन ओळी गाण्याची संधी दिली. पूढेही काही गाणी मिळाली पण फारसा प्रभाव नाही पडला. मात्र १९४७ मधील ‘दो भाई’या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बित गया’’ या गाण्यातुन तिच्या प्रतिभेची चुणूक मिळाली आणि पार्श्वगायीका म्हणून तिच्या नावावर शिक्का मोर्तब झाले. या नंतर दोनच वर्षांनी ‘महल’ मधल्या “आयेगा आयेगा …आयेगा आनेवाला” म्हणत लता दिदीचे नाव दुमदुमू लागले. याच काळात सचिन देव बर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांच्यातल्या चाणाक्ष संगीतकाराने गीता रॉयच्या नैसर्गिक आवाजातली जादू ओळखली. काय योगायोग बघा याच काळात बंगलोर मधील वसंतकुमार पडूकोण नावाचा एक तरूण कोलकत्ता, पूणे प्रवास करत मुंबईत आला होता. लवकरच या तरूणाशी गीता रॉयची भेट होणार होती आणि तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळणार होते.
१९५१ मध्ये देवानंद बंधूच्या नवकेतन या संस्थेचा चित्रपट “बाजी”चे काम सुरू झाले. चित्रपटाचे सगीतकार एस. डी. बर्मन यांनी गीता रॉय कडून सहा गाणी गाऊन घेतली. चित्रपटाचा दिग्दर्शक होता वसंतकुमार पडूकोण उर्फ गुरू दत्त. गाणी रेकॉर्ड होत असतानां गुरूदत्त गीताच्या आवाजाच्या आणि नंतर हळूहळू तिच्याच प्रेमात पडला. हा चित्रपट प्रदर्शीत झाला आणि यातील ‘तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले’ या गीता रॉयच्या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवली. तिच्या पार्श्वगायनाचे सर्वच दरवाजे उघडे झाले आणि खरेखरच तिची तकदीर बन गयी. दरम्यान गीता रॉय देखिल गुरूदत्तच्या प्रेमात पडली आणि २६ मे १९५३ रोजी दोघांनी विवाह केला. गीता रॉय गीता दत्त झाली. त्यानां तरूण व अरूण ही दोन मुलं आणि निना ही मुलगी झाली. नंतरची चार वर्षे तिचा गळा बहरत गेला. अनेकजण असे मानतात की तिच्यावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता. पण मला ते फारसे पटत नाही. तिने पाश्चात्य सुरावटीची व तशी बाज असलेली गाणी सुंदरच गायली यात दुमत नाही. पण मग खयालों में किसी के इस तरह आया नहीं करते (बावरे नैन), सुनो गजर क्या गाए (बाज़ी)]न ये चाँद होगा, न ये तारे रहेंगे (शर्त),कैसे कोई जिए, जहर है जिन्दगी (बादबान), जाने कहाँ मेरा जिगर गया जी (मिस्टर एंड मिसेस 55), ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है (भाई-भाई), आज सजन मोहे अंग लगा ले (प्यासा), वक्त ने किया क्या हँसीं सितम (कागज के फूल), आन मिलो आन मिलो (देवदास), हम आपकी आंखो मे..रफी सोबत (प्यासा), बाबूजी धीरे चलना (आरपार), ना जाओ संया छुडा के बयाँ (साहब बिबी और गुलाम),मुझे जा न कहो मेरी जान (अनुभव), घुंगट के पट खोल (जोगन) अशी एकापेक्ष एक सरस गाणी गीता दत्तने गायली. यात अस्सल भारतीय मातीची लोक संगीतावर आधारीत अशीही गाणी होती. नंतर गुरूदत्तच्या बहुतेक सर्व चित्रपटाची गाणी ती गात राहिली. मात्र नंतर अचानक या सर्वाला ग्रहण लागले. जीए कुलकुर्णी यांच्या कथेत प्रकर्षाने आढळणारी नियती किंवा प्राक्तन या दोघांच्या आयुष्यात आडवे आले.
१९५७ च्या सुमारास गुरूदत्त आणि गीता दत्त यांच्यात अस्पष्टशी भेग पडली आणि हळूहळू यातील अतंर वाढत गेले. गुरूदत्त यानां वाटायचे की गीताने आपल्याच चित्रपटासाठी गाणी गावीत. पण गीता प्रतिष्ठीत झालेली पार्श्व गायिका होती. बाहेरच्या चित्रपटाच्या ऑफर्स येणे साहजिक होते. गीता दत्तला स्वत:ची अशी एक वेगळी ओळख होती, एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होते. मग स्वत: एक संवेदनशील मन असणाऱ्या गुरूदत्तने हा हट्ट का धरला असेल? संगती लागत नाही. १९७३ मधील हृषिकेश मुखर्जीच्या ‘अभिमान’ मध्ये असेच काहीसे कथानक होते. ज्यात अमिताभ आणि जया भादूरी यांचा उत्कृष्ट अभिनय होता. तर सुरूवातीला या गोष्टीला नकार देणाऱ्या गीताने मग त्याच्या प्रेमापोटी हळूहळू माघार घेतली. पण यामुळे संगीतकारही हळूहळू बाजूला होत गेले. यात भर म्हणून की काय वहिदा रेहमानचा गुरूदत्तच्या आयुष्यात झालेला प्रवेश. या सर्वाचा परिपाक म्हणजे गीता वेगळी राहू लागली. हृदया पासून गाणारी गीता आतल्या आत कोसळू लागली. खरं तर सचिनदा यानां तिच्या आवाजावर खूप विश्वास होता. पूर्वी गाण्याच्या भरपूर रिहर्सल होत असत त्यात गीता दत्त म्हणावी तशी मेहनत घेतानां दिसेना. जर खरोखरच तशी मेहनत घेतली असती तर तिच्या गायकीचे अनेक रंग दिसू शकले असते. याच काळात मग आशाताई आपल्या प्रचंड मेहनतीने वर येत गेल्या. गुरूदत्तवर गीता दत्तने मनापासून प्रेम केले. कदाचित त्यामुळे तिच्या प्रत्येक गाण्यात अंतरिक तळमळ होती, उर्मी होती……. पूढे जेव्हा वहिदा रेहमान गुरूदत्तच्या आयुष्यातुन निघून गेली तेव्हा गुरूदत्त पूरता दारूच्या आहारी गेला. परीणाम १९६४ ला अतीमद्य आणि झोपेच्या गोळ्या सेवनाने गुरूदत्तचे निधन झाले. या दुसऱ्या धक्कयाने मात्र गीता दत्त पार कोलमडून गेली. ती नर्व्हस ब्रेकडाऊनची शिकार झाली. आर्थिक कटकटीचा गुंता अधिक वाढत गेला. त्यासाठी मग काही स्टेज शो पण करावे लागले. १९६७ मध्ये “बधू बारन” नावाच्या एका बंगाली चित्रपटात मूख्य भूमिका केली. पण मन आणि शरीर यांचा मेळ काही केल्या बसत नव्हता. १९७१ मध्ये कनू रॉय या संगीतकारासाठी गीता दत्तने शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट होता बासू भट्टाचार्य यांचा ‘अनुभव’. पूढे गीता दत्तचा आजार वाढतच गेला. गीता दत्त याचं “वक्त ने किया क्या हंसी सितम…” हे गाणे जेव्हा आज कानावर पडते तेव्हा नकळत मनात विचार येतो की खरंच काळाने गुरूदत्त आणि गीता दत्त दोघांवरही अत्याचरच केला. गुरूदत्त गेला तेव्हा तो ३८ वर्षांचा होता तर गीता दत्तने अखेरचा श्वास वयाच्या ४१ व्या वर्षी घेतला…..
-दासू भगत (२० जुलै २०१७)
Copyright © 2025 | Marathisrushti