काल-परवाच एक बातमी वाचली होती.. अरूणाचल प्रदेशात रामदेवबाबांनी अरूणाचलमध्ये त्यांचं योग शिबीयेभरविले
होते.. योगाभ्यास घेताना मध्ये मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते… त्यावेळी त्यांनी देशात बोकाळलेला
भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस याबाबात बोलाण्यास सुरूवात केली.. त्यावेळी तिथे कॉंग्रेसचेच अरूणाचलल मधुन निवडून
आलेले एक सदस्य उपस्थित होते.. ते चिडले.. आणि चक्क रामदेव बाबांना म्हणाले ”यु ब्लडी इंडियनस्” (????)
मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात.
माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ दादरमध्ये. मात्र त्यानंतर संपूर्ण बालपणापासून मी ठाण्यातच वाढलो. अजुनही पक्का ठाणेकर आहे. मात्र मी Born and Brought Up in Thane असं म्हणू शकत नाही, पण ठाणं तर माझ्या रक्तातच भिनलंय. अजूनही साठ आणि सत्तरच्या दशकातल्या ठाण्याच्या आठवणी ताज्या असल्यासारख्या डोळ्यासमोर आहेत.
मी माझे गाव ठाणेच मानतो. ठाण्यावर माझे विलक्षण प्रेम आहे, हे ठाण्याबाहेर मी अगदी चार दिवसांसाठी गेलो तरी मला जाणवतं. बाहेरगावाहून आल्यावर ठाणे स्टेशनात पाऊल टाकताच मला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं.
माझं बालपण ठाण्याच्या आंबेडकर रोडजवळच्या मनोरपाडा भागात गेलं. पहिली शाळा दिघेबाईंची शिशु-ज्ञान मंदिर. त्यावेळी मित्रमंडळी सगळी मनोरपाडा आणि उथळसर भागातली. चवथीनंतर मो. ह विद्यालयात शिक्षण झालं. आमच्या दहावीच्या एसएससी बॅचची आम्ही मित्रमंडळी अजुनही चार-सहा महिन्यातून एकदा भेटतोच.
खरंतर हा विषय निघायला कारण एवढंच की गेले काही दिवस ठाण्यात एक मोठं स्थित्यंतर होताना दिसतंय. आमच्या ठाण्यातल्या जुन्या स्टेशन रोडचा चेहरामोहराच बदलून टाकला जातोय. सगळी अतिक्रमणं तोडून टाकत हा रस्ता मोठा केला जातोय. अर्थात हा बदल आवश्यकच आहे. जुन्या स्टेशन रोडवरुन अक्षरश: चालायला जागा मिळत नव्हती. हा रस्ता गर्दीत गुदमरुन जात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावरुन एक फेरफटका मारला आणि लक्षात आलं की या रस्त्यावरच्या काही पाऊलखूणा आता लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत. काही वर्षापूर्वी टी.चंद्रशेखर या धडाडीच्या महापालिका आयुक्तांनी ठाण्याचा चेहरामोहरा बदलून टाकला होता, त्यांची आठवण आली.
मनात विचार आला की हे बदलत असलेलं ठाणं निदान आपण जेवढं जुन्या स्वरुपात बघितलंय तेवढं तरी लिहून ठेवावं. जुन्या आठवणींना उजाळा देताना कधीतरी ही पानं वाचली जातील. मराठीसृष्टीच्या “नोस्टाल्जिया” या भागात अशाच जुन्या आठवणींचा खजिना भरुन ठेवलाय. त्यात या ठाण्याच्या जुन्या आठवणींची भर घालावी.
एक लक्षात आलं की या सगळ्याच गोष्टी काही एकाच लेखात लिहिणं शक्य नाही त्यामुळे मग एक लेखमाला लिहावी असा विचार केला. आत्तातरी पंधराएक विषय डोक्यात आहेत. यामध्ये ठाण्याचे टांगे, आता हरवलेली आईस फॅक्टरी, कल्पना केंद्र, मोहवी मधली नाटकं आणि रांगोळिची प्रदर्शनं, बी.जे. हायस्कूल या आणि अशाच बर्याच ठिकाणांच्या आठवणी येणार आहेत.
आपल्याही आठवणीतल्या ठाण्यातल्या जागा, वास्तू वगैरेंची महिती लिहायची असेल तर नि:संकोचपणे पाठवा, तुमच्या नाव, पत्ता आणि फोटोसहित.
तेव्हा पुढच्या भागात बघूया बदललेल्या ठाण्याच्या आठवणी.
-- निनाद अरविंद प्रधान
मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले.
आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,
मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे...
भैरवीला, आप्पा ठाकूरांच्या सुप्रसिद्ध गजलेच्या ओळी दस्तुरखुद्द आप्पांच्याच करारी वाणीतून, कानावर पडताच श्रोतृवृंदातून जोशपूर्ण टाळ्यांचा एकच गजर होत ‘गुंतलेले पाश’ हा लालित्याने नटलेला कार्यक्रम संपन्न झाला आणि प्रेक्षकांमधून आज भरून पावलो अशी लखलखित प्रतिक्रिया उमटली.
दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘बांधण जनप्रतिष्ठान’ आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ’ वाशी आयोजित, ज्येष्ठ गजलकार श्रीयुत आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश’ हा मराठी गजलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात मोठ्या दिमाखात सादर झाला.
गुंतलेले पाश थोडे सैलसे करणार आहे,
आणि काही रंग गहिरे त्यात मी भरणार आहे...
या संमोहित करणाऱ्या गजलेने कार्यक्रमाची नांदी झाली. येथून पुढे कवयत्री शिल्पा देशपांडे या आकर्षक युवतीने तितक्याच मनभावनं निवेदनाद्वारे गजलचे, आप्पांच्या भावविश्वाचे, मानवी जीवनातील द्वैत-अद्वैताचे, सुख दु:खाचे, कधी बोचणारे तर कधी लोभस आलिंगनासम भासणारे शब्दकळ्यांच्या सुगंधित आभूषणाने अलंकृत अदाकारीने नटलेल्या समयोचित निवेदनाद्वारे गजलविश्वाचे रेशीमबंध अलगद उलगडत नेले.
आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे,
आणिक त्याच्या मोहापायी वृद्धत्वाला झेलत आहे...
सांजवेळी, उन्हाच्या उतरणीच्या शांत पर्वाला, लांबलेल्या सावल्या जसजशा धूसर होत जातात, परंतु कुठेतरी तळ्यामध्ये पाण्यात पिकलेले पान पडते आणि चकचकणारे तरंग उमटत जातात, तशाच!
ते तरंग का प्रवाहित होत असतील बरे? याच आशयाच्या पुढच्या ओळींमध्ये आप्पा म्हणतात...
बालपणीची स्वप्ने माझ्या मागे मागे धावत होती,
आणि आता मी मावळताना स्वप्नामागे धावत आहे...
उलिग्नतेतून लगेचच श्रोत्यांना सावरत, दर्दी प्रेक्षकांसाठी प्रेमभरल्या विद्रोहाची पुढची गजल पेश होते...
तुझे ऋतू...
सरळपणाने राहावयाचे तुझ्यात कुठे इमान होते
मी जन्माचा फकीर आणिक तुझे इरादे महान होते...
या विरक्तीने आप्पा मनमानातल्या प्रेयसीला आव्हानात्मक साद घालतात.
आप्पांचा पत्नीवियोग सर्व सुजाण श्रोत्यांनी अनुभवाला तो प्रौढत्व आलं त्याचं काय, या पुढील सादरीकरणात...
आपल्या सुविद्य पत्नीप्रती कृतज्ञतेने व्यक्त होताना ते म्हणतात...
तिच्या सावलीत सदा बहरलो कधीच गलबललो नाही
वादळ वारे होते, तरीही थरथरलो नाही...
आठवांच्या कळवळ्याने भावविवश होत, आपल्या सुसंस्कृत पत्नीकडून अलौकिक विवेकाची शिकवण मिळाल्याचे ते आवर्जून नमूद करतात,
संस्काराने हळूहळू मग विवेक मजला तिने दिला
म्हणून तर मी अतिमोहाने कधीच भरकटलो नाही...
हृदयातून प्रसवलेल्या या ओळीतील आत्मिक रुदनाने, आप्पांसह सर्व सभा गलबलून गेली, अन् श्रोत्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या.
दु:खालापाचे अश्रु-मोती असेच घरंगळत राहतात.. पुढील गजलेत...
कफन बांधुनी फिरतो आहे,
तरी जगावे म्हणतो आहे...
प्रेक्षकांचा कंठ गहिवरतो, आवंढा गिळताना कष्टी होतात. परंतु आप्पा नवचैतन्याचे मर्म मांडताना वाळूचे घर बांधण्याचा सल्ला देतात.
दिवस उद्याचा घेत उशाला,
स्वप्ने पुढची बघतो आहे...
हळूहळू गजल आणि श्रोत्यांची गुंतलेल्या पाशांची वीण अधिकाधिक घट्ट होत जाते.
आपल्या ओघवत्या निवेदन शैलीने श्रोता आणि गजलकार आप्पा यांच्यामधील सुरेख दुवा साधण्याचे आणि उत्तरोत्तर कार्यक्रम खुलवित नेण्याचे कसब आत्मसात केलेल्या निवेदिका शिल्पाने मग मोर्चा वळविला तो आप्पांच्या कवितेकडे...
इतर काही जागतिक दिनांप्रमाणे
जागतिक महिला दिनही साजरा करतील, हे तुझ्यासाठी
आणि दुसऱ्याच दिवशी
यांच्या नजर तुझ्या देहाच्या
आकृतिबंधावर स्थिरावतील...
अशा परखड भाष्याने प्रेक्षक दिग्मूढ होऊन गेले. निवेदिका शिल्पाने पुढील गज़लेच्या प्रास्ताविकेत म्हटले...
माझ्याच माणसाशी मज बोलता न आले,
त्यांच्या उरात माझे घर बांधता न आले...
आप्पांनी या गज़लेच्या मतला पेश करताना म्हटले..
तसा विश्वास कोणाचा कुठे होताच माझ्यावर,
नको ते यायचे कानी जराशी पाठ फिरल्यावर...
आप्पांच्या या एकापेक्षा एक सरस रचनांच्या आस्वादात सर्वांगाने डुंबत असलेल्या श्रोत्यांना आश्चर्याचा धक्का दिला तो शिल्पाने.
आता आप्पा विठ्ठलालाच धारेवर धरणार आहेत आणि काही आदेशवजा सूचना करणार आहेत. प्रेक्षकही कान टवकारून बसले, तर आप्पा बोलते झाले...
तूर्तास विठ्ठलाने आता असे करावे
सोडून वीट मागे थोडे पुढे सरावे...
बांधून ठेवलेले सोडून हात दोन्ही
आता खुशाल देवा कामात गुंतवावे...
पुढे, समाजातील दंभावर आसूड ओढताना आप्पा विठ्ठलाला साकडे घालतात.
दारातल्या तुझ्या तू हटवून दांभिकांना
संपूर्ण पंढरीचा वारस मला करावे.
ही गजल सादर होतानाच प्रेक्षकांची कधी हसून मुरकुंडी वळली तर कधी आप्पांनी, भक्त पुंडलिकाने विठ्ठलाला जसे वीटेवर ताटकळत उभे राहण्याचे फर्मान सोडले होते तत्सम आता वेळ आली आहे विठ्ठलाने वीट मागे सोडून थोडे पुढे सरतानाच कटीवरील हात सोडून कार्यप्रणव होण्याचे निर्देश दिलेत ते केवळ त्यांच्या गजलेप्रती असलेल्या प्रतिभासंप्पन्न निस्सीम भक्तीमुळे आणि चोखंदळ रसिकवत्सल भावनेने.
भक्तवत्सल विठ्ठलाच्या प्रेमापोटीच साक्षात ईश्वराला म्हणजेच पंढरीच्या विठूरायाला जनोद्धाराची कास धरण्याचे बाळकडू पाजतानाच आख्ख्या पंढरीचा वारस आपल्यालाच करावे अशी सूचना आप्पा करू शकले ते गजलप्रान्तातील त्यांच्या एकमेवाद्वितीय चारित्र्यसंप्पन्न संतशिरोमणी प्रतिमेमुळेच.
या प्रसंगी, सूर निरागस हो... या गाण्यावर सहजहस्ते श्रीगणरायाचे सुंदर चित्र रेखाटणारे चित्रकार श्री. प्रकाश पाटील यांचा सत्कार ‘बांधण प्रतिष्ठान’तर्फे गज़लप्रेमी विश्वस्त श्री. नाना लोडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच आप्पांच्या आग्रहास्तव नुकत्याच नवी मुंबई अभिमान पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीयुत ललित पाठक आणि सुभाष कुलकर्णी यांचा सत्कार माया ठाकूर यांचे मानसपुत्र आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त, श्री. संदीप माळवी, यांचे शुभ हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन श्री. दिलीप जांभळे यांनी केले. या प्रसंगी सर्वश्री सर्जेराव कुईगडे, महादेव देवळे, पल्लवी देशपांडे, विजय दाते, भूषण मालवणकर, वसंत साळी, डॉ. राम पंडित, प्रमोद कर्नाड, संदीप माळवी, डॉ. अशोक पाटील, नाना लोडम, सुभाष कुळकर्णी, ललित पाठक, अशोक भगत, प्रा. वर्षा भोसले आणि विद्या तांबवे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गुणग्राहक रसिक श्रोते उपस्थित होते.
लेखक - श्री घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपीचे वाढते प्रकार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काही नवे उपाय सुचवले. त्यात विद्यार्थ्यांनी कॉपीविरोधातील शपथ घेणे तसेच कॉपी करणार्यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. पण, या उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यावरच कॉपीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल.
..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !
बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली …..
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, …..
द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.
केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग. काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच. सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.
शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे, रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.
या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती. श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते. कचर्याने भरलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली. पण प्रत्यक्ष राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).
शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल. असो.
सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित …
Copyright © 2025 | Marathisrushti