सहज फेसबुक चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राने ‘ठकठक’ पाक्षिका विषयी केलेली पोस्ट दिसली. ‘दिपू दि ग्रेट’, ‘बन्या’, ‘एश – अभी’ ही सदरे पुन्हा पाहून एखादा खूप जुना मित्र भेटल्या सारखा आनंद झाला. आठवणींच्या घोड्यावर दौडत दौडत मन कधी लहानपणी जाऊन पोहोचले कळलेच नाही.
त्याचं बोलणं अगदी ओघवतं, आवाजात मृदुता, अॅक्टींग तसंच मॉडेलिंगसाठी अगदी परफेक्ट यष्टी, अगदी एखाद्या कलाकाराला पाहिजे तशी. मनोरंजन क्षेत्राच्या कोणत्याही प्रांगणात सहज वावरेल असं व्यक्तिमत्व असल्यामुळे आत्तापर्यंत जाहिराती, चित्रपट आणि संगीतविश्वातही आपला अनोखा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कलेच्या विविध क्षेत्राचा अनुभव घेतलेल्या अंकुश पाटील सोबत खास गप्पा फक्त मराठीसृष्टी.कॉम वर…
जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.
इस्लामी जगाची चित्रे
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर
ISBN : 978-93-80232-53-9,
मूल्य : रू.२२०/- फक्त
स्पर्श तुझा
गणेशोत्सव जल्लोषात सुरू असताना त्यातून उभे राहणारे मोठे अर्थकारण स्पष्टपणे जाणवत आहे. लोकांच्या श्रद्धेचा विषय असलेला हा उत्सव राजकारणात जाणार्यांसाठी महामार्ग ठरतो आहे. त्यात अर्थकारण आल्याबद्दल आक्षेप नाही. परंतु, गणेशोत्सवाचे ‘मार्केटिंग’ होत असताना ‘सेल्स’लाच प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सवावर जाणवत असलेला अर्थकारणाचा हा प्रभाव नेमके काय सांगतो ?
दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.
संध्याकाळची साडेसात, आठ ची वेळ. आज शाळेत एकही ऑफ पीरियड नव्हता. त्यामुळे घरी आल्यावर खरतर, डोकं जाम कलकलत होतं. पण सासर्यांना रोज रात्री चारी ठाव स्वयंपाक लागत असल्याने, भराभर पोळ्या करत होते, आणि फोन वाजला. पोळी भाजणे सुरू ठेवून, डोकावून फोन मध्ये पाहिले, तर नीता फोन करत होती. मनात आले, "आता ही का फोन करत असेल?" पण मग ठरवले, जेवणे झाल्यावर निवांतपणे बोलूया. म्हणून नऊ नंतर फोन केला, तर म्हणाली, "अगं! आपल्या बहिणींचं गेट टुगेदर येत्या रविवारी दुपारी, शुभदा कडे करायचे ठरले आहे, तेव्हा तू यायचे आहेस." खूप आनंदाने तिला येते म्हटले आणि कधी एकदा रविवार येतो, असे झाले.
घरातील सगळ्यांची जेवण्या खाण्याची सोय करून अकरा वाजता, शुभदा कडे पोहोचले. आम्ही मावस, मामे अशा आठ बहिणी जमलो होतो. हास्याचे गडगडाट, आणि संवादाच्या फैरी झडत होत्या. त्यात शुभाच्या हातची कडक कॉफी, गप्पांना रंगत आणत होती. लहानपणीचे किस्से, कुणा कुणाची फजिती आठवून, पुनः पुनः हसत होतो. त्याच नादात, खेळी मेळीत जेवणे झाली. आणि शुभा मला म्हणाली, "विभाताई तुला मी गॅलरीत फुलवलेली बाग दाखवते". म्हणून आम्ही दोघी बेडरूमच्या गॅलरीत आलो. शुभाने खूप मेहेनत घेऊन त्या येवढ्याशा जागेत सुद्धा अनंत, पारिजातक यांची छान निगा घेतली होती. फुलांनी डवरलेली ती गॅलरी बघून आणि अनंताच्या सुवासाने मन प्रसन्न झाले.
तेवढयात हॉल मधून भांडणाचे आवाज येऊ लागले, म्हणून आम्ही दोघी पटकन तिथे आलो, आणि बघतो तर काय? नीता आणि वीणाची खडाजंगी जुंपली होती, आणि बाकीच्या त्यांना आवरण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. झाले होते असे की, बेताची बुद्धिमत्ता असलेल्या नीताची, वीणाकडून विनाकारण मस्करी केली गेली आणि त्याची कुस्करी झाली. ते शब्द तिच्या मनाला झोंबल्याने, वाद सुरू होऊन, भांडण विकोपास गेले. आता वीणाने कितीही वेळा क्षमा मागितली, तरी नीताने सर्व विसरून तिला माफ केले, तरच त्यांच्यातले संबंध सुधारले असते. झाल्या प्रकारामुळे, एक चांगले जमून आलेले गेट टुगेदर फिसकटले.
घरी परतताना मनात आले, खरंच! आयुष्यात झालेल्या अशा अपमान, अवहेलना, दुःखद घटनांना, जोपर्यंत आपण जाणीवपूर्वक डिलीट करत नाही, तोवर आपले पुढचे आयुष्य आपल्याला सुखाने जगता येत नाही. कुठली गोष्ट किती धरून ठेवायची? हे शेवटी आपल्या हातात असते. नीता आणि वीणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, दोघींनीही झाली गोष्ट डिलीट करून, एकमेकींना आणि स्वतःला सुद्धा, माफ केले पाहिजे. कारण कधी कधी, आपण केलेल्या शाब्दिक, कायिक, मानसिक चुकांचा आपण फक्त पश्चात्ताप करत बसलो, तर त्याची बोच आयुष्यभर मनाला वेदना देत रहाते. अशा वेळी मोठ्या माणसांचे धीर देणारे शब्द आठवायचे, "चुका माणसांच्या हातूनच होतात". तेव्हा लवकर त्यांचा सल मनातून डिलीट करून, पुढे मार्गक्रमणा करायची. त्रास देणारे असे प्रसंग, इतकेच काय! तर अशा काही व्यक्तींना सुद्धा, आयुष्यातून डिलीट करून अदृश्य केले, की पुढचा प्रवास सुखाचा होतो.
आजकालच्या नवीन तंत्रज्ञानात, व्हॉट्स ॲप ने सुद्धा, आपली ही सोय पाहिली आहे ☺️ चॅट करताना उगाच किंवा चुकून नको ते टाईप झाले आणि असे वाटले की डिलीट करावे, तर छानपैकी "डिलीट फॉर ऑल" चा पर्याय देऊन ठेवलेला आहे. तेव्हा कुणालाही न दुखवता तो वापरायचा आणि
शांताबाई शेळके यांचे गाणे गुणगुणायचे,
"जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे...
जीवनगाणे गातच रहावे !"
सौ. अमृता विजय शेंडे.
amu.shende4@gmail.com
- सौ. अमृता विजय शेंडे.
आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.
कोणताहि सजीव मरण पावला म्हणजे त्याचे शरीर कुजू लागते, सडू लागते. मानवी अचेतन शरीरावर, रुढी आणि परंपरांनुसार, अत्यंत आदराने, भावनाविवशतेने, जगातील सर्व धर्मात, त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात. खोलवर विचार केल्यास लक्षात येअील की, या रुढी आणि परंपरा, मूलतः, विज्ञानाधिष्ठीत आहेत.
पुर्वी जहाजं पोर्ट मध्ये गेली की दहा दहा दिवस थांबायची परंतु आता टाईम इज मनी, जहाज पोर्ट मध्ये कार्गो लोड किंवा डिस्चार्ज करण्यासाठी गेल्यावर चोवीस तासात बाहेर पडून पुढल्या सफरीवर निघतात. वेळेचे आणि त्याहीपेक्षा नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते.
Copyright © 2025 | Marathisrushti