प्रेम – आज किती तकलादू झालय हे मांडण्याचा छोटासा प्रयत्न
-- स्वाती ठोंबरे.
आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी.
आज साठीच्या जवळपासच्या मुंबईकरांना ट्रामचा प्रवास नक्कीच आठवत असेल.
मुंबईत घोड्यांची पहिली ट्राम ९ मे १८७४ रोजी आली. तीन आण्यात कुलाबा ते पायधुणी आणि अर्ध्या आण्यात पायधुणी ते बोरीबंदर असा प्रवास करता येत असे. १८९९ सालच्या प्रारंभी ट्रामने एका आण्यात मुंबईत कुठेही जाता येत असे. सहा ते ८ घोड्यांनी ओढली जाणारी ही ट्राम एका तासात सुमारे ५ मैल अंतर कापत असे.
मुंबईतली ट्राम सुरुवातीला व्यापारी विभागांमध्ये सुरु केली गेली. कुलाबा - क्रॉफर्ड मार्केट - पायधुणी आणि बोरीबंदर - काळबादेवी - पायधुणी अशा २ मार्गांवरून ती सुरु झाली. यामध्ये ग्रॅंट रोड, पायधूनी, गिरगाव, भायखळा आणि ससून डॉक या भागांचा समावश होता.
१९०७ मध्ये ट्रामचे विद्युतीकरण झाले आणि ती किंग्ज सर्कल पर्यंत धावू लागली. तोपर्यंत ट्रामचे शेवटचे स्थानक होते दादरचे खोदादाद सर्कल. शेवटच्या स्टेशनला टर्मिनस म्हणून संबोधतात. त्यामुळेच खोदादाद सर्कललाही दादर ट्राम टर्मिनस म्हणजेच दादर टीटी याच नावाने ओळखले जाऊ लागले. ट्रामची वाहतूक बंद झाल्यानंतर इतकी वर्षे लोटली तरी खोदादाद सर्कलचे दादर टी.टी. हे नावं आजही प्रचलित आहे. कधीतरी टॅक्सीवाल्याला सांगून बघा की खोदादाद सर्कलला जायचेय.. कदाचित त्याला कळणारही नाही.
१९०७ मध्ये BEST ने ट्रामवाहतूक आपल्याकडे घेतली. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम सुरु झाली आणि १९२० मध्ये डबल डेकर म्हणजेच दुमजली ट्राम सुरु झाली.
३१ मार्च १९६४ पासून मुंबईतली ट्राम कायमची बंद करण्यात आली त्यानंतर मुंबईत जलद वाहतुकीसाठी BEST च्या बसगाड्यांना सर्वत्र रस्ते मोकळे झाले.
फेब्रुवारी २०१६ मध्ये दक्षिण मुंबईतल्या काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरु असताना अचानकपणे जुन्या काळातल्या ट्रामच्या रुळांचे अवशेष सापडले आणि मुंबईतली ट्राम पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
-- निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग ३
(क्रमश:)
१९९६ साला पासून मी व सौ अमेरिकेस भेट देत आहोत. त्या वेळेची अमेरिका व २०१० ची अमेरिका ह्यात बराच बदल झालेला आहे. अमेरिका हा देश जगातल्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकानी बनलेला देश आहे. प्रत्येकानी येताना आपली संस्कृती, परंपरा घेऊन आले आणि तो जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जसाजसा काळ जात होता तस तसा ह्या समाजाचे स्थित्यंतर होत गेले.
मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि
मुंबई शहराबद्दल बरंच काही लिहिलं-बोललं गेलेलं आहे. त्यात आता ही नवी भर कशाला असं वाटणं सहाजिकच आहे. मात्र या लेखमालेत मुंबईच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या टप्प्यांकडे नजर टाकण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुंबईतली दळणवळण साधने, रस्तावाहतूक, ट्राम, रेल्वे, टॅक्सी-रिक्शा यापासून थेट आत्ताच्या मेट्रोच्या होऊ घातलेल्या जाळ्याकडे एक नजर टाकलेय. मुंबईतली घरबांधणी आणि त्यातील स्थित्यंतरे, म्हाडा, मुंबईतली “चाळ”संस्कृती, सहकारी गृहनिर्माण संस्था, एसआरए, क्लस्टर कॉक्रिट टॉवर्स आणि इतर बरंच काही..... याबद्दल वाचा या लेखमालेत...
मुंबईच्या इतिहासातील रंजक गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात मुंबईचा इतिहास बघायलाच हवा.
शिलाहार राजवटीतील बिंब नावाच्या राजाने महिकावती (माहीम) शहर वसवले आणि तेथे किल्ला बांधून आपली राजधानी वसवली. त्याची कुटुंब देवता 'प्रभादेवी' ही होती असे म्हणतात. या राजाच्या राजवटीत लोक सुखी होते. जमीन, महसूल, न्याय वगैरेच्या बाबतीत बिंब राजा न्यायी व आदर्श होता.
नंतर अनेक राजसत्तांनी मुंबईवर राज्य केले. १७३९ साली ब्रिटीशानी मराठी राजेशाही कमकुवत झाल्याचा फायदा घेऊन साष्टी बेटावर आपला कब्जा केला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याच्या अतिमहत्त्वाकांक्षेने आणि अतिउत्साहाने इथल्या लोकांचा अनेक प्रकारे छळ केला. त्यांनी हिंदूंची अनेक देवळेही भ्रष्ट केली. वान्द्रयापासून वसई पर्यंत अनेक ठिकाणांचे ख्रिस्तीकरण झाले होते.
पोर्तुगीजांकडून साष्टी बेटे इंग्रजांकडे गेल्यामुळे मुंबईचे गोवा झाले नाही हे आपले नशीब. ब्रिटीशांचा ख्रिस्तीकारणापेक्षा राजकारण करण्याकडे विशेष मुत्सद्दी दृष्टीकोन होता. त्यांना केवळ व्यापार करायचा नव्हता तर येथे राज्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी त्याचदृष्टीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती.
माझगाव, परळ, वरळी हा भाग म्हणजे त्यावेळची मुख्य मुंबई. येथे कोळी, भंडारी समाज राहत होता. परळ व शिव येथे कुणबी राहत. माहीम भागात बरेचसे मुसलमान, थोडे प्रभू आणि साष्टीमधून आलेले काही ब्राह्मण अशी वस्ती होती. १६७० मध्ये सुरतेहून व्यापाराच्या निमित्ताने गुजराती बनियावर्ग येथे आला. तेंव्हापासून गुजराती वस्ती वाढू लागली.
इंग्रजांच्या ताब्यात मुंबई आली त्यावेळची मुंबईची लोकसंख्या जेमतेम दहा हजारांच्या आसपास होती. १८७५ मध्ये ती ६० हजारांवर गेली. यामध्ये ब्राह्मण, पाठारे प्रभू, पाचकळशी, माळी, ठाकूर, भोई, आगरी इत्यादि जमातीची मंडळी होती.
मुंबईत कापडाच्या गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आणि मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. १९२० ते १९३० च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या १० लाखांच्या वर गेली.
किल्ल्याबाहेरच्या आधुनिक मुंबईचा जन्म :
१८२० ते १८३० च्या दरम्यान टुमदार मुंबई शहर ४५०० चौरस मैल परिघाच्या किल्ल्याच्या आतल्या बाजूला वसलेले होते. निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या मुंबईची लोकसंख्या केवळ अडीच लाखाच्या आसपास होती. किल्ल्याच्या तटबंदीबाहेर १००० यार्डापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास कुणाला परवानगी नव्हती.
१८२९ साली गव्हर्नरने आपले राहण्याचे ठिकाण किल्ल्याबाहेर हलवण्याचे ठरवले. त्याआधी जवळजवळ ७० वर्षे मुंबईचा गव्हर्नर अपोलो स्ट्रीटवर वास्तव्याला असे आणि तेथूनच मुंबईचा कारभार बघत असे. गव्हर्नर किल्ल्याबाहेर रहायला गेला म्हटल्यावर अनेक श्रीमंत लोकांनीही परळ, माझगाव, भायखळा, मलबार हिल वगैरे भागात वस्ती करायला सुरुवात केली.
एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आज आकंठपणे बिअरबार संस्कृतीमध्ये बुडालेल्या मुंबईत पहिल्यांदा प्यायचा सोडा मिळू लागला तो १८३५ मध्ये. बर्फ मिळायला मुंबईकरांना आणखी २ वर्ष वाट बघायला लागली.
१८३८ साली मुंबई आणि लंडन यामधील नियमित टपाल सेवा सुरु झाली. ही आणि अशीच रंजक माहितीही बघूया कालांतराने येणार्या काही लेखांमध्ये.....
-- निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संपादक, मराठीसृष्टी
www.marathisrushti.com
मुंबईच्या रंजक इतिहासातील टप्पे - भाग १
(क्रमशः)
“फेवर ब्लोक”चे पेवच फुटले,
सगळीकडे हे लावत सुटले,
म्हणून सगळ्या मुंबईभर,
पेवर आणि फेवर ब्लोकच दिसले………
काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो.
आरं आरं आबा …..!!! काय झालं बाबा …..!!! ही वात्रटिका नसून मयुर टिका आहे……!!! वास्तविका आहे……!!!
Copyright © 2025 | Marathisrushti