(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • फोर्टमध्ये फिरताना – भाग ३

    टाऊन हॉल ते फाऊंटनचा परिसर हा इथला एक टप्पा. हा “टाऊन हॉल” म्हणजेच सध्या आपण बघतो ती “एशियाटिक लायब्ररी”ची सुंदर इमारत. ही इमारत “दोरिक” या जुन्या ग्रीक शैलीत बांधली असून तीला ३० पायर्‍या आहेत.

  • सहकारी संस्थेत सदस्य होण्याबाबत पात्रता आणि शर्ती

    अनेक संस्था पदाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांत सातत्याने विचारलेला प्रश्न म्हणजे अधिमंडळाच्या सभेस उपस्थिती किंवा संस्थेच्या इलेक्शन वेळी सदस्य कोणाला म्हणावे? कायदा सर्वसामान्यांना माहित असतोच असे नाही. तेव्हा काही पदाधिकारी गोंधळून जातो. त्यामुळे सभेतील विषयांचे वाचन होण्याआधीच वातावरण तापलेले असते. काही कुटुंबातील व्यक्ती मूळ सदस्याचे पत्र घेऊन किंवा कुलमुखत्यार घेऊन येतात. जे पूर्णपणे चुकीचे असते. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की, संस्थेचा सदस्य म्हणून कोण पात्र असतात आणि कोणत्या शर्ती त्या व्यक्तींना पूर्ण कराव्या लागतात.

  • बाई बाई मनमोराचा

    बाई बाई मनमोराचा

    १९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..

  • व्हॅलेन्टाईन डे आणि मराठी मन…

    आपल्या देशात फेब्रुवारी महिना जवळ आला की तरूणाईला वेध लागतात ते व्हॅलेन्टाईन डेचे अर्थात जागतिक प्रेम दिनाचे. ह्ल्ली प्रेमात पडलेल्यांना, प्रेमात पडू इच्छिणार्‍यांना आणि प्रेमात पडून लग्न झालेल्यांसाठी व्हॅलेन्टाईन डेच महत्व इतरांपेक्षा थोड अधिक असल्याच जाणवत. प्रेमभंग झालेल्यांसाठी, प्रेमात धोका खाल्लेल्यांसाठी, प्रेमावर विश्वासच नसलेल्यांसाठी आणि प्रेमाकडे अधिक डोळ्सपणे अथवा बुध्दीपूर्वक पाहणार्‍यांसाठी या दिवसाच महत्व तितकस नसत. जगभरात व्हॅलेन्टाईन डे सर्वांचा सर्वांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्ह्णून साजरा केला जातो आणि आपल्या देशात तो प्रेमाचा दिवस कमी आणि प्रेमिकांचा दिवस म्ह्णूनच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्याला काही संस्कृती रक्षकांचा विरोध असतो तो त्यांच्या दृष्टीने विचार करता योग्यच म्ह्णावा लागेल. आपल्या देशात प्रेमविवाहांच भविष्य काही ठिक दिसत नाही त्याला सर्वाधिक हा व्हॅलेन्टाईन डेच कारणीभूत असावा की काय अशी शंका ही कधी कधी मनात आल्यावाचून राहात नाही कारण आपलं एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरूणाईला अशा एखाद्या दिवसाची माध्यम म्ह्णून जर गरज भासत असेल तर त्यांच प्रेम किती तकलादू आहे याची सहज कल्पना करता येते.

    व्हॅलेन्टाईन डे जवळ आला की नवोदित साहित्यिकांमधील साहित्य प्रतिभेला अचानक मोहोर येतो असा गैरसमज ही आपल्या देशात पसरलेला दिसतो कारण फेब्रुवारी महिन्याच्या आसपास प्रेम या विषयावरील साहित्याची मागणी अचानक वाढलेली दिसते. या काळात बर्‍याच नवोदित कविंना आणि लेखकांना त्यांचे साहित्य प्रकाशित करण्याची संधी लाभत असते. या दिवसात प्रेमकवितांना सुगीचे दिवसच आलेले असतात असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. प्रेम कविता हा कवी आणि वाचकांसाठीही या दिवसात जिव्हाळ्याचा विषय असतो. मराठी कवितांचा विचार करता मराठी प्रेमकवितांना मिळणार्‍या वा ! वा ! समोर इतर सामाजिक विषयावरील कवितांना मिळणारी वा ! वा ! नगन्यच असते. आजच्या मराठी साहित्यात सामाजिक विषयांवरील कवितांच्या तुरळक गारा पडताना दिसतात त्याविरूध्द प्रेम कवितांचा धो-धो पाऊस कोसळ्ताना दिसतो. प्रेम या विषयावर कविता लिहायची म्ह्टली की प्रत्येकात दडलेला कवी अचानक जागा होत. त्याला हे व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस प्रोत्साहनच ठरत असतात.

    माझा व्हॅलेन्टाईन डेला विरोध आहे असं मी म्ह्णूच शकणार नाही कारण माझी पहिली कविता एका वर्तमानपत्रात व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशीच प्रकाशित झाली होती, ती का ? कशी ? वगैरे विषयावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी मी ही प्रेमात पडल्यावर जे कवी होतात त्यांच्यापैकीच एक कवी होतो कदाचित असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. पुढे माझी कविता प्रेमाची धुंदी उतरल्यावर प्रगल्ब झाली आणि मग माझ्यातील कवी खर्‍या अर्थाने घडत गेला असावा. व्हॅलेन्टाईन डे वर एखादी कविता आणि एखाद लेख लिहण्या पलिकडे माझी मजल कधीच गेली नाही. व्हॅलेन्टाईन डे हा माझा फर आवडीचा विषय असा कधीच नव्हता आणि नाही. सुरूवातीला आपल्या देशात व्हॅलेन्टाईन डे ला होणारा विरोध आता बर्‍यापैकी मावळलेला दिसतोय. कोणत्याही गोष्टीचे होणारे संभाव्य परिणाम त्या गोष्टीच महत्व ठरवत असतात. आता आपला समाज प्रेमाच्या बाबतीत इतका मोकळा होत चाललाय की हळू हळू व्हॅलेन्टाईन डे सारखे दिवस साजरे करण्याचे स्वरूपही बदललेल दिसेल . पूर्वी व्हॅलेन्टाईन डे ला भेट म्ह्णून दिल्या जाणार्‍या गुलाबाची जागा आता हिर्‍याच्या दगिण्यांनी घेतलेली दिसतेय. आता काही वर्षांनी व्हॅलेन्टाईन डे ही आपल्या देशात रक्षाबंधन आणि भाऊबिजेसारखा साजरा केला गेला नाही म्ह्णजे मिळविली. व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने कोसळणारा मराठी प्रेमकवितांचा पाऊस रंग बदलून इंग्रजीत कोसळायला लागला तर ? विचार करूनच माझ्या मराठी मनात धडकी भरतेय...

    -- निलेश बामणे

  • धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

    `धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता.

  • भारतमातेच्या वीरांगना – ३४ – मावशी केळकर

    नमामो वयं मातृभूः पुण्यभूस्त्वाम्
    त्वया वर्धिताः संस्कृतास्त्वत्सुताः
    अये वत्सले मग्डले हिन्दुभूमे
    स्वयं जीवितान्यर्पयामस्त्वयि ||

    हे मातृभूमी, हे पुण्यभूमी, आम्ही तुझ्या मुली ज्यांचे तू पालन-पोषण केले, संवर्धन केले तुला नमस्कार करतो. हे वत्सले, मंगले, हिंदुभूमे तुझ्यासाठी आम्ही आपले जीवन समर्पण करतो.

    प्रार्थने मध्ये शक्ती असते हे आपण जाणतोच, त्याचे फळ अजूनच उच्च होते जेव्हा प्रार्थना सामूहिक केली जाते. राष्ट्र सेविका समितीची ही प्रार्थना आजही देशातील काना-कोपऱ्यातून सामूहिक पद्धतीने गायली जाते आणि प्रत्येक सेविकेच्या मनात अनन्य समर्पण भाव जागृत करते.

    कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व ह्याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी अनुभवायला मिळाला त्या भारतमातेच्या वीरांगना वंदनीय लक्ष्मीबाई केळकर अर्थात साऱ्या देशाच्या मावशी केळकर.

    ०६ जुलै १९०५ साली त्यांचा जन्म नागपूर येथे दाते कुटुंबात झाला. त्यांचे वडील भास्करराव दाते पुढारलेल्या विचारांचे होते, तसेच आई यशोदाबाई सुद्धा. दोघेही टिळकांचे भक्त होते. त्यांच्या घरात केसरी चे सामूहिक वाचन चाले. त्यांच्या आई दुपारच्या वेळी आजूबाजूच्या महिलांना एकत्रित करून केसरी चे वाचन,त्यावरील लेखांवर विचार मंथन करीत. कमलताईंवर संघटनात्मक रचनेचे संस्कार अगदी लहानपणीच झाले. इंग्रजी शाळेत रुजवला जाणारा विचार आणि घरात घडणाऱ्या गोष्टी हा विरोधाभास कमलताईंना सतत खटकत होता, त्यांनी शाळेला राम राम ठोकला.

    १४ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री पुरुषोत्तम केळकर ह्यांच्याशी झाला आणि त्या लक्ष्मीबाई पुरुषोत्तम केळकर झाल्या. केळकरांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून मुलं होती, त्यांची एक बहीण बाल विधवा होती, लक्ष्मीबाईंच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावामुळे एवढ्या लहान वयात त्यांनी सगळं घर आपलंसं केलं. सांसारिक बंधनात अडकल्या तरी मनातून सामाजिक विचार कधीच दूर झाले नाही. अवकाळी वैधव्य आलं आणि सगळ्यांची जवाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. लक्ष्मीबाईंनी मुलांची, नणंदेची आणि शेतीची जवाबदारी घेतली आणि अतिशय उत्तमरीत्या पार पाडली. एकदा डॉ केशव हेडगेवार ह्यांचा प्रवास वर्ध्याला असतांना लक्ष्मीबाई त्यांना जाऊन भेटल्या आणि संघाबरोबर काम करण्याची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हे शक्य नाही,पण महिला संघटन होऊ शकते, ते तुम्ही करावं.

    "स्त्री आणि पुरुष हे धर्मरूपी गरुडाचे दोन पंख आहेत. त्यामुळे स्त्रीची उन्नती व्हायलाच हवी.पंख असमान असतील तर गरुड झेप कशी घेणार?" हे स्वामी विवेकानंदांचे विचार लक्ष्मीबाईंचे प्रेरणा स्थान बनले. डॉ च्या प्रत्यक्ष सल्ल्याने आणि विवेकानंदाच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी २५ ऑक्टोबर १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. महिलांनी केलेले, महिलांचे संघटन, महिलांसाठी, ज्यातून समाज बांधणी, घरा-घरातून देशप्रेम, स्वातंत्र्य चळवळीची माहिती, असे सगळे साधणार होते. राष्ट्र निर्माण हे एक दिवसात शक्य नाही, त्यासाठी प्रत्येक घरात हा विचार पोहचणे आवश्यक आहे, आणि कुठलीही गोष्ट रुजविण्याचे काम एक स्त्री अतिशय उत्तम पद्धतीने करू शकते म्हणून महिलांचे संघटन.

    "जवाबदारी आणि कर्तव्य ह्यांची गल्लत करू नये. स्त्री म्हणून कुटुंब, समाज, आणि राष्ट्र याबद्दल प्रत्येक स्त्रीने आपले कर्तव्य आनंदाने निभवावे."
    "व्यक्ती-व्यक्तीवर राजकीय व सामाजिक संस्कार करून तिला एक अनुशासित सूत्रबद्ध शक्तीचे अंग म्हणून सिद्ध करायचे आहे व अशा सर्व व्यक्तींमध्ये कर्तव्यभावना, परस्पर जिव्हाळा, व सहकार्य निर्माण करणे, तसेच स्त्री हीच राष्ट्राची आधारशक्ती आहे त्यामुळे तिच्या उन्नती आणि संघटनेतून हिंदुराष्ट्र उभे राहणार, म्हणून समिती." लक्ष्मीबाईंची समिती मागची ही भूमिका फक्त भाषणात बोलण्यापुरती नव्हती तर स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून आणि कार्यातून प्रत्यक्ष आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात त्यांनी सतत उत्तमरीत्या निभावली म्हणूनच त्या कदाचित सगळ्यांच्या 'मावशी' झाल्या.

    १९४७ ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात त्या स्वतः कराचीत गेल्या, जेव्हा हिंदूंची भर दिवसा कत्तल सुरू होती. कराची विमानतळावर 'खून से लिया है पाकिस्तान, लढ के लेंगे हिंदुस्थान' अशा घोषणा सुरू होत्या, तेव्हा केवळ आपल्या सेविकांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सगळ्या सेविकांना स्वतः जातीने भेटल्या, त्यांच्याशी बोलल्या, त्यांना धीर दिला कारण तिथल्या एका सेविकेने त्यांना पत्र पाठवून बोलवलं होते. काराचीतील हिंदू परिवारांना भारतात परत आणण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.

    भारत पाकिस्तान, भारत-चायना युद्ध काळातसुद्धा मावशींच्या सेविका सगळ्यांच्या मदतीला धावून येत होत्या.
    स्त्री सुलभ गुणांचा वापर राष्ट्र निर्माणासाठी करणाऱ्या, स्त्रियांच्या संघटनेतून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला घरा-घरात पोहचवणाऱ्या, स्त्री म्हणजे केवळ एक कुटुंब नाही तर राष्ट्र निर्माण करायची ताकद तिच्या ठायी आहे हे स्वतःच्या कार्यतून आदर्श ठेवणाऱ्या या भारतमातेच्या वीरांगनेला आमचे शत शत नमन.

    || वंदे मातरम् ||

    -- सोनाली तेलंग.

    ०७/०७/२०२२.

    संदर्भ :

    १. कर्मयोगिनी वंदनीय मौसीजी

    २. दिपज्योति नमोस्तुते : सुशीला महाजन

    ३. स्त्रीशक्ती आणि स्वातंत्र्यलढा : डॉ अर्चना कुळकर्णी, स्मिता कुळकर्णी

    ४. http://xn--h4b.indusscrolls.com/

  • रस्त्यावरचा गोंधळ

    भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.

    न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.

    ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.

    RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !

    नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.

    काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?

    जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.

    -- चिंतामणी कारखानीस

  • स्पॉट लाईट

    जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते.

  • बिंग फुटले… (बेवड्याची डायरी – भाग ४१ वा)

    रात्री पाणी प्यायला म्हणून उठलो ..पाण्याच्या कुलरजवळ पाणी पीत असताना ..बाथरूमच्या पॅसेज मध्ये दोन तीन जण उभे दिसले ..मला पाहताच ते जरा चपापल्या सारखे झाले असे मला जाणवले ..इतक्या रात्री यांचे काय सुरु असावे याचा विचार करत होतो ..त्या तिघांपैकी दोन जण मध्यप्रदेशातून उपचारांसाठी आणलेले ब्राऊन शुगरचे व्यसनी होते ..तर तिसरा नागपूर मधलाच दारूचा व्यसनी ..तिघेही साधारण पंचाविशीचे ..मी बिछान्यावर आल्यानंतर देखील बराच वेळ ते तिकडेच होते ..त्यांची काहीतरी खलबते चालली होती असा संशय आला मला ..सकाळी मी चहा घेताना सहज शेरकर काकांजवळ त्याचा उल्लेख केला ..शेरकर काकांचे डोळे चमकलेले दिसले ..म्हणाले ...बहुतेक त्यांचे इथून पळून जाण्याचे प्लान चालले असतील ..हे तिघेही श्रीमंत घरचे आणि खूप लाडावलेले आहेत ..आपण हे माॅनीटरला सांगितले पाहिजे ..मला शेरकर काकांना आपण हे उगाच सांगितले असे झाले ..कारण प्रकरण आता माॅनिटर पर्यंत गेले असते ..मला उगाचच कशात अडकण्याची इच्छा नव्हती ..मी तसे शेरकर काकांना बोलून दाखवले ..' अहो तुम्ही कशाला घाबरता ..तुम्हाला काही होणार नाही ..उलट एक सावध नागरिक म्हणून तुमचे कर्तव्यच आहे वार्डात काही चुकीचे घडत असेल तर माॅनीटरला सांगणे ' ..शेरकर काका डोळे मिचकावत म्हणाले ..

    नाश्ता झाल्यानंतर माॅनीटरने मला ते तिघे कोण कोण होते हे विचारले ..मी नावे सांगितली ..मला ते नक्की काय बोलत होते ते माहित नाही ..त्यांना मी नाव सांगितले हे कळले तर ते उगाचच मला त्रास देतील असे माॅनीटरला म्हणालो ..त्याने तुमचे नाव कोणाला समजणार नाही अशी खात्री दिली मला ..तुम्ही घाबरू नका असा धीर देखील दिला ..दिवसभर माझ्या डोक्यात तोच विचार सुरु होता ..पुढे काय होणार उत्सुकता देखील होतीच मनात ..तसे येथून पळून जाणे अजिबात सोपे नव्हते ..कारण बाहेर जाण्याचा एकच दरवाजा होता ..तो दरवाजा ऑफिसात उघडत असे ..ऑफिसमध्ये नेहमी एकदोन तगडे कार्यकर्ते बसलेले असत ..बाकी वार्डात सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..म्हणजे पळून जायचे तर आधी ऑफिसमध्ये जायला लागले असते .. जेव्हा केव्हा महिन्याभराचे किराणा समान येई किवा आठवड्याचा भाजीपाला आणला जाई तेव्हा काही लोकांना ते सामान टेम्पो मधून उचलून आणण्यासाठी म्हणून बाहेर नेले जाई ..मात्र त्यावेळी तेथे एकदोन कार्यकर्ते हजर असत..हे लोक कसे काय पळून जातील याचा विचार करून डोके शिणले माझे ..

    संध्याकाळी समूह उपचारांच्या वेळी सरांनी त्या तिघांना उभे केले ..म्हणाले .." घाबरू नका सगळे खरे खरे सांगा ..रात्री काय खलबते सुरु होती तुमची ..तुम्ही तिघे काय करत होतात बाथरूमच्या भागात ? ..तुम्हाला काहीही शिक्षा होणार नाही " यावर नागपूरचा असलेला गौरव म्हणाला " सर मेको हग्गी लगी थी..इसलिये मै वहा गया था " त्याच्या या बोलण्यावर सगळे हसले ..हा गौरव खूप लहान वयात बिघडल्याने तसा चेहऱ्याने खूप भोळाभाबडा वाटे ..तो नेमका काय म्हणत आहे ते सरांना बहुतेक समजले नाही ..' हग्गी लगी थी मधील ' हग्गी ' शब्द मलाही नवा होता ..सरांनी पुन्हा त्याला विचारले ...नीट सांग मराठीत काय झाले होते तुला ? तर म्हणाला मला ' हागरी ' लागली होती ..पुन्हा सगळे हसू लागले ..मग समजले की त्याला ' हगवण ' लागली होती असे तो सांगत होता ..पुढे काय झाले ते सांग मला ..तू ' हग्गी लागली म्हणून तिथे गेला होतास .तर आत संडासात न जाता बाहेर काय बोलत बसला होतास या दोघांसोबत ? काय रे तुम्हाला दोघांना पण ' हग्गी ' लागली होती का ?

    सरांनी थोडे दरडावून विचारले ..गौरव तसा लेचापेचा निघाला ..तो पोपटा सारखा बोलू लागला ..म्हणाला मी तेथे गेलो तेव्हा हे दोघे पळून कसे जायचे याचा प्लान करत होते .मलाही यांनी थांबवले ..म्हणाले जेव्हा केव्हा आता भाजी आणायला बाहेर नेले जाईल तेव्हा आपण तिघेही जाऊ ..आणि बाहेरच्या अंगणात गेलो की संधी साधून पळून जाऊ ..' सरांनी त्यांना खाली बसायला सांगितले अन म्हणाले ' हे बघा इथून पळून जाण्याचे विचार मनात येणे साहजिक आहे ..कारण आपल्याला इथे असणारी शिस्तबद्धता आवडत नाही ..सकाळी लवकर उठण्यापासून सुरु होणारा इथला दिनक्रम पार पाडणे जीवावर येते बहुतेकांच्या कारण घरी आपल्याला स्वताच्या मर्जीने जगण्याची सवय लागलेली असते वाट्टेल तेव्हा उठणे -झोपणे , हवे तसे खाणे पिणे , आळसात पडून राहणे वगैरे ..त्यामुळे तुम्हाला इथली शिस्तबद्धता आवडणे कठीणच आहे ..परंतु मित्रांनो जीवन आपण सगळे समजत होतो तितके सोपे अन आरामदायी नसते ..माणसाला शिस्त असली तरच तो काहीतरी प्रगती करू शकतो ..हे सगळे आपल्याच भल्यासाठी आहे हे विसरता कामा नये ..पळून गेलात तरी तुम्ही शेवटी घरीच जाणार ..घरचे लोक आम्हाला कळवतील तसे ..पुन्हा आमची गाडी येईल तुम्हाला न्यायला ..पूर्वी अनेकांनी असे प्रयत्न केले आहेत ..शिवाय तुमच्या सोबत बाहेर लक्ष द्यायला उभे असणारे कार्यकर्ते इतके लेचेपेचे समजू नका ..ते देखील पूर्वी तुमच्यासारखेच होते ..ते अतिशय सावध असतात ..ते लगेचच पाठलाग करून पकडतील तुम्हाला ..तुम्ही ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्राच्या कैदेत नसून व्यसनाधीनतेच्या कैदेत आहात ..तेव्हा ' मैत्री ' मधून कसे बाहेर पडता येईल याचा विचार न करता व्यसनांच्या गुलामीतून कसे बाहेर पडता येईल याचा विचार कराल तर अधिक फायदा होईल ..

    " व्यसनाधीनता हा नकाराचा आजार असल्याने आपले काहीच चुकत नाहीय असे प्रत्येक व्यसनीला वाटणे स्वाभाविक आहे ..तो सहजासहजी उपचारांना तयार होत नाही म्हणून अनेकदा त्याला खोटे बोलून किवा जबरदस्तीने उपचारांना आणावे लागते ..पालकांचा तो नाईलाज असतो ..परंतु इथे दाखल झाल्यावर जर तुम्ही मनापासून उपचारात सहभाग घेतलात तर आपले काय चुकले ते नक्की ध्यानात येईल तुमच्या ..तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या पालकांनी तुम्हाला इथे दाखल करण्याचा निर्णय घेतला ते उगाच नाही ..त्यांना तुमच्या आयुष्याची काळजी आहे म्हणूनच काही पैसे खर्च करून ते तुम्हाला उपचारांना आणतात ..इथेही जर तुम्ही पूर्वीसारखाच नकारात्मक विचार केलात तर ..पुढे खूप नुकसानाला सामोरे जावे लागेल ..आम्ही सगळे या यातना भोगल्या आहेत ..तुम्हाला त्या भोगाव्या लागू नयेत म्हणून आमची तळमळ असते ." .सर अगदी तळमळीने समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटले ..शेवटी त्या तिघांनी सरांची माफी मागितली ..आमचे चुकले अशी कबुली दिली ..प्रकरणावर एकदाचा पडदा पडला ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे

    ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला एका अमेरिकन महिलेवर बलात्कार होतो आणि ५ पैकी एका महिलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महिला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत, त्या अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिनी – ८ मार्च २०१३ रोजी – दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीला आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले..