(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • निर्लज्ज

    भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...

    आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...

    माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!

    त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...

    आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...

    त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!

    रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...

    तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली

    तरीही मला लाज नाही वाटली ....

    लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!

    बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

    बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!

    एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

    फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

    मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

    त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!

    समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...

    पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...

    शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...

    प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!

    गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

    आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...

    डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!

    २६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...

    पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

    त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...

    माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले

    तरीही मला लाज नाही वाटली....

    लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

    आणि अजूनही मला लाज नाही वाटत....

    माझ्या निर्लज्जपणाची...!!!

  • विधिमंडळ की आखाडा?

    लोकांनी आधी आपली अभिरूची बदलणे गरजेचे आहे. आपण कुणाला आणि कशासाठी निवडून देत आहोत याचे भान लोकांमध्ये यायला हवे. लोकच बेभान असतील, तर त्यांचे प्रतिनिधी तरी जबाबदार कसे असू शकतात? अधिवेशनाचा आखाडा होण्यामागे हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे.

  • जगण्यासाठी पिकवा!

    हिरव्या बोंडातून फुलणारा पांढरा शुभ्र कापूस लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्याची आठवण करून देतो; परंतु दैव विसंगती बघा, हाच कापूस शेकडो शेतकऱ्यांच्या घरात मृत्यूची काळी छाया बनून वावरतो आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य,त्यांच्या जीवनातला आनंद या पांढऱ्या कापसाच्या काळ्या छायेत पार वितळून गेला आहे. काल झाले ते आज होणार नाही,या वेड्या आशत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या बरबाद झाल्या.

  • श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा……

    सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते.

  • जादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें

    जादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार घेतच आहेत.जादूटोणा विरोधी कायद्याने काही प्रमाणात नियंत्रण आले असेल, पण रोज अंधश्रध्देचे तण वाढतच आहे.प्रसारमाध्यमांची जादू ओसरली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तरच जादूटोणाविरोधी कायदा सक्षम होईल.

  • परनिंदा माणसाला भगवंतापासून दूर नेते

    परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.

    दुसर्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो ? म्हणजे मग आपण यात काय साधले ?
    निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.

    ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.

    तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.

    भगवंताच्या मार्गाने जाणार्याने, दुसर्याच्या ठिकाणी दिसणार्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.

    पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोषदेखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे.

    मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसर्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही.

    विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक 'विठ्ठल विठ्ठल' म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत.

    घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली, तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामांसात जाऊन रक्तांत मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे, पुस्तकीज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते.

    भगवंताकरिता कुणीही कष्ट करून नका; कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे. ती वस्तू सात्त्विक प्रेमाने साध्य होणारी आहे; आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो.

    तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा, आपापसांत प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय, प्रेममय दिसू लागेल, आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल.

    निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

    -- सुमंत आचार्य

  • आंदोलनांमधील फरक

    "एकदा जरूर वाचा"

    जाट आंदोलन, हरियाणा:
    जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान,
    सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला,
    शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल.

    पटेल आंदोलन, गुजरात:
    २५० कोटींच शासकीय नुकसान,
    ८००० कोटींचा महसूल बुडाला,
    १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी,
    ६५० च्या वर अटक.

    गुज्जर आंदोलन, राजस्थान:
    ४०० कोटींच शासकीय नुकसान,
    ६००० कोटींचा महसूल बुडाला,
    ४० च्या वर मृत्यू,
    लष्कर पाचारण.

    आणि मग, आमचा

    मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र:
    एकही रुपयाचं नुकसान नाही,
    बहुसंख्य असूनसुद्धा, अन्याय सहन करूनसुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचे आहे.
    पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही,
    दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही.

    कारण शिकवण आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची.."रयतेच्या काडीला पण धक्का लागला नाही पाहिजे"...

  • उफराटा प्रवास!

    ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’, अशी वेदातील प्रार्थना आहे. असत्याकडून सत्याकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे आम्हाला घेऊन चल असा त्या प्रार्थनेचा ढोबळ अर्थ. वेदातील प्रार्थना असो, उपनिषदातील तत्त्वज्ञान असो, पुराणाचे सार असो किंवा परंपरेने चालत आलेले विचारप्रवाह असो, आमच्या पूर्वसुरींचे समस्त चिंतन मनुष्याच्या उन्नतीला एक निश्चित दिशा देणारे होते.

  • बालविवाह ; विकासातील अडथळा

    बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य वयाचे देखील कायदे आहेत .वयाचे मुलासाठी एकवीस आणि मुलीचे अठरा वर्षे वय योग्य असते . मुलांमुलींची शारीरिक वाढ या वयात पुर्ण होते असे समजले जाते . शहरी , सुशिक्षीत समाजात, उच्च वर्गात हे घडतही असेल. ग्रामीण भागात , झोपडपट्टी , अशिक्षीत समाजात , दुर्लक्षित भागात उलट घडत असते .बालविवाह लावला जातो.त्याची वाच्यताही कुठे होत नाही .सारे काही अलबेल आणि गोपनिय असते .शाळेत पाचवी ते दहावी - बारावीपर्यंतच मुलींचे लग्न उरकले जातात. कोणतेही सबळ कारण त्यामागे नसते .त्या लेकराला नीट कळतही नसते .बैठक बसते.लग्न ठरते . बोभाटा होत नाही .सारे काही चुपचाप . कुणाचं वाटोळं नको म्हणून प्रशासकिय यंत्रणा याकडे रितसर डोळेझाक करते .गावातील कर्तीधर्ती मंडळी मूग गिळून गप्प असते . समाजप्रबोधन करण्याची भाषा ज्या सेवाभावी संस्था करतात. त्यासुद्धा या प्रश्नापर्यंत पोहचू शकत नाही .अशा घटना उघडकीस आल्या की त्या चक्रव्यूहात पालक , कर्मचारी सापडतात.त्यामुळे ' सपादलं तर सपादल ' अशी भावना वाढीस लागते . अनेक शिकलेली माणसं बालविवाहाच तोटे समजत असूनही न समजल्यासारखे करतात आणि शिंगे मोडून वासरात ... अशी गत होते .आजकाल संकरित अन्नधान्य यासारख्या इतर कारणांनीदेखील मुले वयात यायची प्रक्रीया लवकरच घडते .त्यामुळे पालक चिंताक्रांत होतो आणि सामाजिक भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे बालविवाहास प्रवृत्त होतो. अमुक एका व्यक्तीने असा बालविवाह केला त्याचे कुठे काय झाले म्हणून आपले काय होणार आहे अशी प्रवृत्ती बळावते .खेळण्याच्या , शिक्षण घेण्याच्या बालवयातच असा आघात बालकांच्या माथी मारला जातो . कित्येक समाजात आता मुलीची वानवा जाणवू लागली आहे . पाशाची आमिष दाखवून सर्रास बालविवाह लावले जातात. मुलगा तीस वर्षाच्या पुढील आणि मुलगी अल्पवयीन ! ही मानसिकता बदलायला हवी .कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंधाचे सर्व अधिकार असतात. याची जाणीव असायला हवी .
    आता तर मालिका , चित्रपटांतूनदेखील अल्पवयीन बालविवाह दाखविले जातात .प्रेमप्रकरण दाखवितात. एवढेच नाही तर बालनायिकेला आंतरजातीय विवाहाचा ब्रँड अँबेसिटर बनविण्याची तयारी करताहेत . कला आणि वास्तव यात कुठेतरी गल्लत होते. मुलांच्या कलेचे कौतुक आहे . ते असायला पाहिजे. दुनिया त्यास डोक्यावर घेते . यातून काय बोध घ्यायचाय तो घ्यावा पण बालविवाह हे समर्थनिय मुळीच नाहीत . कोणतीही शारीरिक , मानसिक परीपक्वता नसताना विवाह लावणे योग्य नाही . लगीनसराईच्या धामधुमीत काही गुपचूप बालविवाह लावून दिले जाता. त्यातून भविष्यातील अनेक जटील समस्या निर्माण होतात.बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जाणीवजागृती , जनजागृती मोठ्या प्रमाणात होणेही तितकेच गरजेचे आहे. पालकाचे प्रबोधन केले पाहिजे .बालविवाहाचे तोटे सर्वसामान्यापर्यंत पोहचले तरच ते विचार करणार आहेत . आजही कितीतरी बालविवाह होत आहेत . यापुढील बालविवाह जरी थांबले तरी सशक्त भारत निर्मीतीसाठी ती मदतच ठरणार आहेत .एकीकडे आपण खूप प्रगती केली असे म्हणतो दुसरीकडे बालविवाहाकडे दुर्लक्ष करतो हे कितपत योग्य आहे . या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.आवश्यक आहे . काही समजात जातपंचायती बालविवाहास संमती देतात . तेथे प्रबोधनाची गरज आहे. नाट्य, कला, जनजागरण यातून हे शक्य आहे . समाजहितासाठी प्रशासन , सेवाभावी संस्था , समाजसेवक , सुजान नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ती काळाची गरज आहे बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.
    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो. ९४२१४४२९९५

  • अत्र तत्र सर्वत्र

    मायणातील एक गोष्ट सर्वविदित आहे. वाटमारी करून लोकांना त्रस्त करणाऱ्या वाल्याला तुझ्या या कामाला तुझ्या कुटुंबीयांचे समर्थन आहे का, तुझ्या पापात ते वाटेकरी आहेत का, असे नारदाने विचारले. वाल्याने आपल्या कुटुंबीयना यासंदर्भात विचारले असता त्याच्या पापात आपण सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले.