उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या जुन्या भागातील ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यास्तेतून वेळ काढता आला नव्हता. एकदा तरी वाड्यात राहणा-या सर्वांना भेटायला पाहिजे, असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून गेलीत आणि ‘देखावे बघण्याचे वय निघून गेले’ या ओळी ओठाबाहेर पडण्याचं वय गाठण्याच्या आत तो वाडा ज्या गल्लीत होता तिच्यात अखेर मी प्रवेश केला.
अनेक जुन्या वाड्यांनी आपली कात टाकून धारण केलेल्या त्यांच्या नव्या रूपाकडे मी एखाद्या छोट्याशा गावातून आलेल्या मुलागत बावचळून बघू लागलो. हे वाडे जर एवढे बदललेत तर त्यांच्यात वास्तव्य करणारी माणसं किती बदलली असतील या विचाराने मी उगीचच काळजीत पडलो. वाडा पूर्णत: नामशेष होऊन त्याच्या जागी एक टुमदार इमारत दिमाखात उभी होती. कौलारू घर, सारवलेलं अंगण, त्या अंगणातलं तुळशी वृंदावन यापैकी कशाचाही आता तिथे मागमूस उरला नव्हता. सारवलेल्या अंगणात फिरण्याची सवय असलेली माझी पावलं इमारतीच्या पार्किंगमध्ये काही क्षण रेंगाळली. तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात ठेवलेली पणती पूर्ण अंगणात मंद प्रकाश पसरवायची. आज त्याच जागेत अनेक निर्जीव वाहनं स्वत:चा तोरा सांभाळत उभी होती.
वाड्यातील जुन्या मित्रांनी त्यांचे नवीन ब्लॉक्स उत्साहाने दाखवायला सुरुवात केली. एकेकाळी अंधारलेल्या खोल्यांची जागा आता गुळगुळीत टाइल्स व फॉल्स सीलिंगने सजलेल्या प्रशस्त रूम्सने घेतली होती. त्या दुमजली इमारतीतील ब्लॉक्सवर इंटेरिअर डेकोरेटरचा हात फिरला होता. पूर्वी ‘आजी’ नावाच्या संस्थेच्या अखत्यारित असलेल्या स्वयंपाकघरातील मातीची चूल, घडवंची, माठ, ओगराळं इत्यादी बहुपयोगी वस्तूंनी सक्तीची रिटायरमेंट घेतल्यामुळे त्यांची जागा आता मॉड्यूलर किचनमधील स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत भांड्यांनी घेतली होती. आधुनिकतेचे सगळे अलंकार अंगाखांद्यावर कौतुकाने मिरवणा-या त्या घरांमधील मंडळींना आधुनिकतेचा स्पर्श नक्कीच झाला असणार, असा विचार करत असतानाच मोबाइल पिढीच्या प्रतिनिधींनी मला वाकून नमस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी उडालोच! ‘हॅलो अंकल’च्या ऐवजी चक्क वाकून नमस्कार? या मुलांना झालंय तरी काय? मी चांगलाच चक्रावलो. ज्यामध्ये अनैतिक संबंधांशिवाय दुसरं काहीही दाखवलं जात नाही अशा सीरियल्स सतत बघूनही ही मुलं बिघडायला तयार नाहीत म्हणजे काय? मी अवाक् झालो असतानाच एका मित्राच्या बायकोने माझ्यावर आणखी एक बॉम्ब टाकला. ‘दर रविवारी तीनपैकी एका घरी एकत्र जमून आम्ही जेवणाचा उत्सव मनवतो!’ आता मात्र हद्द झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:ला फ्लॅट नावाच्या चौकोनी डब्यात बंदिस्त करून घेतलेली व शेजा-याचा खून पडला तरी त्याबद्दल अनेक दिवस अनभिज्ञ असलेली माणसं ज्या कलियुगात राहतात तिथे सर्वांनी एकत्र जमून जेवणाचा आनंद लुटणं हे एक आक्रितच होतं.
वाडा अस्तित्वात नसला तरी त्याचा आत्मा मात्र प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करत होता हे बघून मी विलक्षण सुखावलो आणि पुन्हा सर्वांना आवर्जून भेटण्याचं आश्वासन देऊन अत्यंत समाधानाने मित्रांचा निरोप घेतला.
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
अमेरिकेत इतिहास घडला. अमेरिकन जनतेने तो घडविला. बराक ओबामा त्या इतिहासाचे महानायक ठरले.
आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.
भारत इंठाजांच्या गुलामगिरीतून मुत्त* झाला; स्वतंत्र झाला. बघताबघता या घटनेला 59 वर्षे उलटली. या 59 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.
जनतेच्या सर्वाधिक आशा ज्या न्यायसंस्थेवर केंद्रीत असतात तिथेही भ्रष्टाचार चालतो. मागे सर्वोच्च न्यायालयानेच तशी कबूली दिली होती. तस्करीच्या आरोपाखाली अडकलेल्या अविनाश भोसलेला रात्रीतून जामिन कसा मिळू शकतो?
प्रकाशन दिनांक :- 29/02/2004
ब्रह्यदेवाने ही सृष्टी निर्माण केली असे आम्ही मानतो. वृक्ष-वेली, पशु-पक्षी, वैविध्यपूर्ण जीवसृष्टी त्यानेच निर्माण केली. असे म्हणतात की, ही संपूर्ण जीवसृष्टी निर्माण केल्यावरही सर्वोत्तम निर्मितीचे समाधान ब्रह्यदेवाला झाले नाही.
आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं.
“नकारात्मक विचारांची माणसं मला आवडतात” हे वाक्य वाचून जर तुम्हाला मी विचित्र/विक्षिप्त वाटलो तर थोडं थांबा…… आता असा विचार करा, नकारात्मक विचारांचा सुद्धा कित्ती सकारात्मक पद्धतीने विचार केलाय या अवलीयाने…..
सृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.
आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.
माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप आनंदात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतो, त्या वेळेस आकाशवाणी होते कि देवकीचा आठवा पुत्र तुझ्या मृत्यूस कारणीभूत होईल. तत्काळ मिरवणूक थांबऊन कंस देवकी- वासुदेवाला काळ कोठडीत बंद करतो तिथून त्यांचा यातनामय प्रवास सुरु होतो. कदाचित कंसाला भास झाला असावा, त्याला त्याने आकाशवाणी समजली असावी, यातून तो मनोरुग्ण असावा अशी शंका येते. बरेच एकहाती सत्ता असलेले राज्यकर्ते असाच काहीसा विचार करून जनतेची पिळवणूक करतात हे आपण विसाव्या शतकातही अनुभवले आहे.
देवकी-वासुदेवाला कालकोठडीत ठेऊन येणाऱ्या काही वर्षात त्यांची पहिली सात मुले मारल्यामुळे दोघेही खूप व्यथित झाले होते, अश्या परिस्थितीत आठव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांच्या मनात अजुनच कोलाहल सुरु झाले, कारण सात जणांना मारल्याच्या दहशतीमुळे देवकी मानसिक तणावाखाली होती, आणि कंस आठवे मुलही मरणार यात शंका न्हवती अश्या परिस्थितीत तिला अन्न गोड लागत न्हवते, या मुळे ती अतिशय कृश झाली होती, तसेच सात मुलांना जन्म दिल्यामुळे सहजिकच शरीर खूप खंगले होते. कालकोठडीत जिथे सुर्य किरण सुद्धा पोहोचत नाहीत तिथे जवळपास १० वर्ष (कमीतकमी) काढल्यामुळे तिच्यात ड जीवनसत्वाची कमतरता झाली होती. या सर्व कारणामुळे देवकीने आठव्या महिन्यात मुलास जन्म दिला. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर (premature delivery) झाली. सर्वसाधारणपणे बालके जन्मानंतर रडतात, जर रडले नाही तर त्याला रडवण्यात येते, याचे प्रमुख कारण मुलाला आईच्या गर्भात नाळेतून (placenta) प्राणवायू मिळतो, बाळ बाहेर आल्यावर नाळ कापल्यामुळे बाळाला नाकाने श्वास घ्यावा लागतो. जर बाळ रडले नाही तर फुफ्फुसे (lungs) आपले काम सुरु करत नाहीत, म्हणून डॉक्टर वेळ पडली तर चिमटा काढून बाळाला रडवतात, नाहीतर डॉक्टरवर रडण्याची पाळी येते. श्रीकृष्ण जन्मानंतर रडला नाही हे पुस्तकात लिहिलेले आहे, याचा अर्थ ते मुल मृत (still baby) अवस्थेत जन्माला आले असे म्हणू शकतो.
वरील सर्व कारणामुळे गर्भात व्यवस्थित पोषण झाले नसल्यामुळे, आणि प्राणवायू कमी मिळाल्यामुळे बाळ निळा रंग (cyanosis) घेऊन जन्माला आले. आठव्या महिन्यात जन्म झालेली अशी बरीच मूले मी पहिली आहेत ज्यांच्यात ही लक्षणे दिसतात. साधारण अश्यामुलांच्यात कमरेखालचा (कुल्ले, मांड्या) तसेच पाठीचा भाग निळा दिसतो. या बाळातही असेच झाले असणार, अर्थात त्या काळात विज्ञान फार प्रगत नसल्यामुळे प्राणवायू कमतरतेमुळे निळे मूल जन्माला आले हे समजले नाही. लोकांनी त्याला दैवी देणगी समजली. पुढे चित्रकारांनी संपूर्ण शरीर निळे दाखऊन दैवी चमत्कार भासवला. आजही लोक गणपती दुध पितो म्हणून देवळात रांगा लावतात, तर त्या काळाबद्दल न बोललेलेच बरे. म्हणूनच बाळकृष्ण निळा दाखवला जातो, तसेच मोठेपणीचा कृष्ण निळा दाखवला जात नाही, याचे कारण या मुलांच्यात वाढत्या वयासोबत भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळाल्यामुळे चामडीचा हा निळा रंग निघून जाऊन नैसर्गिक रंग येतो.
वर सांगितल्याप्रमाणे हे मृत बाळ जन्माला आल्यामुळे रडले नाही आणि त्याचा जन्म झाला हे देवकी आणि वासुदेव शिवाय कुणालाही समजले नाही. वसुदेवाने हि गोष्ट जेव्हा जेलरला सांगितली, तेव्हा जेलर प्रचंड तणावाखाली आला. त्याला काय करायचे हे प्रथम दर्शनी सुचले नाही, परंतु त्वरित निर्णय घेणे जरुरी होते. मेलेलं मुल जन्माला आले आहे हे कंस कधीही मान्य करणार नाही, हे नक्की, उलटा कंस जेलर व वसुदेवानी संगनमत करून जिवंत मुल बाहेर पाठवून मेलेलं मुल त्याला दाखवले हे समजून सर्वाना मृत्यूदंडाची शिक्षा देणार यात शंका न्हवती. याच कारणामुळे जेलरने व वसुदेवाने संगनमत करून मेलेलं मुल बाहेर नेऊन जिवंत मुल त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतला. हि गोष्ट अत्यंत गुप्तपणे ठरवल्यामुळे पहारेकऱ्याना समजूद्यावयाचे न्हवते, यासाठी एकच उपाय होता, त्या प्रमाणे सर्व पहारेकऱ्याना रात्रीच्या पेयात झोपेचे औषध मिसळून दिले, ज्यामुळे सर्व शिपाईवर्ग झोपी गेला, व जेलरने सर्व दारे उघडून वासुदेवाला मुक्त केले, अट हि कि त्याने ताबडतोब नदी पार करून गोकुळात जाऊन हे मुल टाकून त्या जागी दुसरे मुल आणायचे. ठरल्या प्रमाणे वासुदेव नदी ओलांडून गोकुळात गेला, व तिथे चांगला वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे हे मुल जिवंत झाले, पुढे हेच मुल कृष्ण म्हणून प्रसिद्ध झाले, असो, अश्या गोष्टी आजही आपण पेपर मध्ये वाचतो. मीही बरेच वेळेस वाचले आहे कि मृत मुलाला पुरण्यासाठी घेऊन जातात व अचानक स्मशानात मुल रडू लागते.
कथेत सांगितल्या प्रमाणे वसुदेवाने गावातील एका मुलीला सोबत आणून कंसासमोर पेश केले. त्याला एखादा मुलगा मिळाला असता, परंतु कुणीही आपला मुलगा त्याला दिला नाही म्हणून मुलीवर समाधान मानून तो तिला घेऊन आला. जेलरने परत वासुदेवाला बंदी करून सर्व दरवाजांना कुलुपे घातली, या नंतर सर्व पहारेकऱ्याना जागे करण्यात आले. पुढे जेव्हा कंसाला हे समजले तेव्हा जेलर व सर्व पहारेकऱ्यानी झोप लागल्याची कबुली देऊन व हा दैवी चमत्कार भासवून स्वतःची मृत्यूदंडातून सुटका करून घेतली.
बऱ्याच वेळेस लेखकाला दोन गोष्टींची सांगड घालता आली नाही कि तो काहीतरी चमत्कार दाखवुन आपली कहाणी पूर्ण करतो, इथेही त्याला हे समजले नाही म्हणून चमत्कार दर्शवून कथा पूर्ण केली असे जाणवते.
-- विजय लिमये
Copyright © 2025 | Marathisrushti