(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

  • भारत छोडो चा ठराव पास – ८ ऑगस्ट १९४२

    आजच्या दिवशी १९४२ साली भारत छोडो चा ठराव पास करण्यात आला.
    ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे गवालिया टँक (क्रांती मदान) येथे राष्ट्रीय सभेच्या महासमितीचे अधिवेशन सुरू झाले. ८ ऑगस्ट १९४२ ला भारत छोडोचा ठराव या अधिवेशनात सहमत करण्यात आला व आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि प्रत्यक्षात सुरूवात ९ ऑगस्ट १९४२ ला सुरू झाली.

    चले जाव आंदोलनाचा कार्यक्रम हा १२ कलमी होता. ८ ऑगस्ट, १९४२ च्या रात्री महात्मा गांधी, मिराबेन, कस्तुरबा गांधी यांना अटक करून आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले, तसेच पंडित नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, गोिवद वल्लभपंत यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांना अहमदनगरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. मुस्लिम लीगने सरकारशी हातमिळवणी केली होती. चळवळीच्या काळात राष्ट्रसभा बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. राष्ट्रसभेचे बँक खाते गोठविण्यात आले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नौकाशर्यत दिवस

    ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे “National Regatta Day” म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन.

  • टाटाचे कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांच्या विमानाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल उड्डाण केले.

    एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस या नावाने झाली होती, भारतीय व्यावसायिक जे आर डी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटा यांनी इंपिरियल एअरवेज साठी मेल घेऊन जाण्याचा करार मिळवला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला.

    १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटाने कराचीहून मुंबईला पहीले हवाई मेल विमान उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट Neville Vincent यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रास दरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालवली. पुढील वर्षात विमान कंपनीने २,६०,००० किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी १५५ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९.७२ टन मेल आणि ६०,००० रुपयांचा नफा मिळवला.

    टाटा एअर सर्व्हिसेसने मुंबईहून त्रिवेंद्रमला सहा आसनी माईल मर्लिनसह आपले पहिले घरगुती उड्डाण सुरू केले. १९३८ मध्ये त्याचे नाव बदलून टाटा एअरलाईन्स असे करण्यात आले. १९३८ मध्ये कोलंबो आणि दिल्ली जोडले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एअरलाईनने रॉयल एअर फोर्सला त्यांच्या सैन्याच्या हालचाली, पुरवठा वाहून नेणे, निर्वासितांची सुटका करणे आणि विमानांची देखभाल करण्यास मदत केली.

    भारत सरकारने १९५३ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा पास करून आणि टाटा सन्सकडून विमान कंपनीची मालकी खरेदी केली.कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड करण्यात आले. जे आर डी टाटा १९७७ पर्यंत अध्यक्ष म्हणून राहिले.

    २१ फेब्रुवारी १९६० रोजी एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. या विमान कंपनीने १४ मे १९६० रोजी मुंबई न्यूयॉर्क सेवा सुरू केली. ८ जून १९६२ मध्ये एअरलाईनचे नाव अधिकृतपणे एअर इंडिया असे बदलण्यात आले. २००० मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली.

    २३ मे २००१ रोजी नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मास्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स २००७ मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन झाली. नुकतीच एअर इंडिया परत टाटांच्या कडे आली आहे.

  • महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन

    संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्म्यांना वंदन करण्याचा दिवस.. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

  • संयुक्त अरब अमिरातीचा ५० वा राष्ट्रीय दिवस

    २ डिसेंबर १९७१ या दिवशी, संयुक्त अरब अमिराती ची स्थापना करण्यात आली व अबु धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम अल-कुवैन, रस अल-खैमा व फुजैरा या सात अमिरातींनी संयुक्त अरब अमिराती या नावाने एक संघराज्य बनवले.

  • आज नवरात्रीचा रंग पिवळा (पिवळ्या रंगाची हळद)

    आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

  • जागतिक कुस्ती दिवस

    कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातील मल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते.

  • आणि नायगारा ठणठणीत कोरडा पडला…

    निसर्गराजाने एकदाच… फक्त एकदाच…. असा चमत्कार केला होता, जो पाहून -ऐकून लाखो लोक आश्चर्यचकित झाले होते ! अमेरिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अमेरिका-कॅनडा देशांच्या सरहद्दीवर हजारो वर्षे अष्टौप्रहर कोसळत असलेल्या अतिप्रचंड जलप्रपाताचे, नायगारा धबधब्याचे कोसळणे २९ मार्च १८४८ रोजी अचानक थांबले आणि तब्बल तीस तास त्यातून पाणी आलेच नाही. नायगारा ठणठणीत कोरडा पडला होता !

  • जागतिक टपाल दिन

    भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.

  • जागतिक सॅन्डविच दिवस

    सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. हे सॅन्डविच काकडी,कांदा तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात.