(User Level: User is not logged in.)

सामान्यज्ञान

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक बुद्धिबळ दिवस

    साहित्यामध्ये बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इ.स. पूर्व ५००मध्ये भारतात दिघ निकय मध्ये ब्रह्मजल सुत्त या ग्रंथात आढळतो. पर्शियामधील पहिला संदर्भ इ.स. ६०० च्या दरम्यान आढळतो, येथे त्याला शतरंज असे म्हटले आहे. सातव्या शतकात मोहर्‍यांचे वर्णन केलेले आढळते. इ.स. ८०० पर्यंत खेळ चीनमध्ये शिआंकी नावाने पोहोचला होता. इ.स. १००० पर्यंत हा खेळ सर्व युरोपभर पसरला. पहिली आधुनीक बुद्धिबळ स्पर्धा लंडनमध्ये १८५१ ला घेण्यात आली.

  • जागतिक चिमणी दिन

    जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परसात जर त्यांच्या खाद्याची व्यवस्था केली तर आपल्याला चिमण्या दिसू लागतील. याचा अर्थ असा नाही की, आज आपण ‘बर्ड फिड’ ठेवले आणि उद्या लगेच १०-१२ चिमण्या दिसतील लागल्या. चिमणीलाही ती सवय होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मात्र, यासाठी गरज आहे ती आपल्या इच्छाशक्तीची.

  • दख्खनची राणी म्हणजेच डेक्कनक्वीनचा वाढदिवस

    दख्खनच्या राणीच्या प्रवाशांना सुद्धा तिचे फार कौतुक असते आणि दरवर्षी हे प्रवासी हिचा वाढदिवस साजरा करतात. दख्खनच्या राणी ही भारतातली अशी एकमेव जुनी गाडी आहे की, जिला कधीही कोळशाचे इंजिन लावले गेलेले नाही. ती शक्यतो विजेवरच धावते, पण कधी अडचण आलीच तर तिला डिझेल इंजिन जोडले गेलेले आहे.

  • ओळख मूलांकाची – मूलांक ५

    अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो.

  • तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग

    फिरत्या रंगमंचाचा वापर करणारे तो मी नव्हेच हे मराठीमधील पहिले नाटक होते. तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी लखोबा लोखंडे ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित होती.

  • दैनिक लोकसत्ताचा वाढदिवस

    अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत.

  • सार्क परिषद स्थापना दिन

    जागतिकीकरण तोंडावर आलं असताना आपलं प्रादेशिक वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने सार्कची ८ डिसेंबर १९८५ ला ढाका येथे स्थापना झाली. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सार्कच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचा उद्देश परस्पर सहकार्यातून भारतीय उपखंडाला शांतता आणि समृद्धी मिळवून देणं, हा आहे.

    प्रारंभी सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे सात देश सदस्य होते. २००७ मध्ये अफगाणिस्तानचा आठवा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह ९ देश व संघटनांना सार्कमध्ये ‘निरीक्षक दर्जा’ दिला आहे. दक्षिण आशियामध्ये सामूहिक बाजारपेठ निर्माण करणे या प्रमुख उद्देशाने सार्कची निर्मिती करण्यात आली. सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे.

    सार्क देशांच्या राष्ट्रप्रमूखांनी दरवर्षी शिखर संमेलनात भाग घेऊन आपल्या अडीअडचणींविषयी चर्चा करावी, अशी कल्पना होती. पण सध्या आपापसातील इगो प्रॉब्लेममुळे काही देश या संमेलनावर बहिष्कार टाकतायत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचा सार्कला मोठा फटका बसतोय.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • ताश्कंद करार

    लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या.

  • ज्वेलथीफ सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट

    देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे.

  • जागतिक कागदी पिशवी दिवस

    हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत करण्यासाठी प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरण्याविषयी जनजागृती करणे. दीडशे हून अधिक वर्षे पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरत आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे.