हावीपर्यंतच्या गणिताची ओळख असणा-या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. आज २२ जुलै! म्हणजेच वेगळ्या स्वरूपात ही तारीख लिहायची झाली तर २२/७ अशी लिहितात. या संख्येला गणिती भाषेत ‘पाय्’ असे म्हणतात.
२ मे १८७२ रोजी मुंबईत व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्यूझियम चे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन करण्यात आले.
डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय १८७५ साली जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले. त्याआधी मुंबईत एखादे वस्तुसंग्रहालय असावे अशी कल्पना १८५० साली जन्मास आली. आणि त्याच्या बांधकामाला सुरुवात होऊन ‘व्हिक्टोरिया अॅ्ण्ड अल्बर्ट’ म्युझियम उभे राहिले. त्यानंतर १ नोव्हेंबर १९७५ साली मुंबईचे पहिले भारतीय शेरीफ आणि संग्रहालयाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावाने संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. आज मुंबईमधील सर्वात पहिले आणि जुने वस्तुसंग्रहालय म्हणून या वास्तूची ओळख आहे. त्याकाळी या वास्तूच्या उभारणीसाठी बराच अवधी लागला. कारण एकच होते निधीची टंचाई. मात्र हार न मानता डॉ. भाऊ दाजी लाड यांनी जंग जंग पछाडून मुंबईतील देणगीदारांकडून १ लाख १६ हजार १४१ रुपयांचा निधी गोळा केला. याशिवाय एक लाख रुपयांचा निधी सरकारकडून मिळवून त्यांनी ही वास्तू उभी केली, परंतु १९ शतकाच्या उत्तरार्धात देखरेखीअभावी ही वास्तू भग्नावस्थेत गेली. आणि तिच्या जीर्णोद्धाराची गरज जाणवू लागली. २००३ साली मुंबई महानगरपालिकेने जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इनटॅकसोबत हातमिळवणी करून वास्तूच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे भग्नावस्थेत गेलेल्या वास्तूचे पुनरु ज्जीवन होऊन २००८ साली ती पुन्हा रसिकांकरिता खुली झाली. याच कालावधीत २००५ साली वास्तूला युनेस्कोकडून पुरातन वारसाचा दर्जा प्राप्त झाला. वास्तूच्या दुरुस्तीनंतर इथे विविध प्रकारची प्रदर्शने भरू लागली आहे. ऐतिहासिक , समकालीन अशा विविध प्रकारच्या कला आणि संस्कृती प्रदर्शनांना इथे प्राधान्य दिले जाते.
संग्रहालयाच्या माध्यमातून स्थानिकच नव्हे तर जागतिक कलाकारांचाही आविष्कार रसिकांना अनुभवता यावा यासाठी प्रशासनाने अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये व्हिक्टोरिया अॅठण्ड अल्बर्ट म्युझियम, ब्रिटिश कौन्सिल, ब्रिटिश लायब्ररी, ड्रेस्डेन स्टेट आर्ट कलेक्शन, सोलोमन आर गुग्नेहॅम संग्रहालय, म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट, एरमेन्गेल्डो झेन्या ग्रुप आणि गिल्ड ऑफ द डोम असोसिएशन या संस्थांचा समावेश आहे. यांच्या सहयोगातून आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक आणि कलात्मक देवाणघेवाण व्हावी असा संग्रहालय प्रशासनाचा हेतू आहे. संग्रहालयात सध्या असलेल्या कलाकृती, संग्रह यांना अनुसरून प्रदर्शने भरविली जात आहेत. याशिवाय लोकांच्या अभिरुचीमध्ये वाढ करण्याकरिता विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजनही संस्था करते.
या वस्तुसंग्रहालयाच्या स्थायी संग्रहामध्ये चार गट आहेत. मुंबईचा इतिहास, व्यापार- संस्कृती देवाणघेवाण, आधुनिक- समकालीन कलासंस्कृती आणि आधुनिक काळ या विषयांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. अठराव्या ते विसाव्या शतकापर्यंत मुंबई शहराचा विकास कशा पद्धतीने झाला, येथील संस्कृती आणि लोकजीवन कसे होते, याची मांडणी ‘मुंबईचा इतिहास’ या संग्रहामध्ये करण्यात आला आहे. १९१८ साली खुले करण्यात आलेल्या या संग्रहामध्ये काळानुसार बदल करण्यात आले आहेत. शिल्प, प्रतिकृती, नकाशे, शिलामुद्रण, छायाचित्रे आणि दुर्मीळ पुस्तकाच्या आधारे हा संग्रह साकारण्यात आला आहे. यामध्ये वरळीतील पहिल्या कापड गिरणीची आणि मुंबई किल्ल्याची प्रतिकृती पाहता येते. तर व्यापाराच्या माध्यमातून संस्कृतीच्या झालेल्या देवाणघेवाणीचा परिचय वस्तूरूपाने ‘व्यापार- संस्कृती देवाणघेवाण’ या संग्रहाच्या माध्यमातून होतो. भारतीय हस्तकला, शिल्पकला यांची परदेशात व्यापाराच्या दृष्टीने कशी मागणी होती, कोणत्या वस्तू यामध्ये महत्त्वाच्या होत्या, हे संग्रहात पाहायला मिळते. आधुनिक आणि समकालीन कलेची सांगड घालणारे प्रदर्शन ‘आधुनिक आणि समकालीन कलासंस्कृती’ यामध्ये करण्यात आले आहे. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट आणि भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाचे जुने नाते आहे. त्यामुळे जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या कलाकारांनी साकारलेली चित्रे, शिल्पे, प्रतिकृती या संग्रहामध्ये मांडण्यात आल्या आहेत.
तसेच ‘मॉडर्न पीरियड’ या संग्रहामध्ये गेल्या काही दशकांमध्ये साकारण्यात आलेल्या कलाकृती मांडल्या गेल्या आहेत. याशिवाय नवीन कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तात्पुरत्या प्रदर्शनाची मांडणी करण्यात येते. मुख्य म्हणजे कला आणि संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रदर्शन, सादरीकरण यांचे आयोजन वस्तुसंग्रहालय प्रशासन करत असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आश्चर्य वाटेल, परंतु पुणे शहर एकेकाळी भारताचे नेतृत्व करीत होते. दिल्लीचा बादशाह कोण होणार, हे पुणे शहर ठरवीत होते. या शहराला प्राचीन आणि मध्ययुगीन असा मोठा वारसा आहे.
पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था पुण्याची नगरपालिका १ जुन १८५७ रोजी स्थापन झाली, तर पुणे महानगरपालिका १५ फेब्रुवारी १९५० रोजी स्थापन झाली. या सुमारे शतकभराच्या कालखंडात पुण्याच्या नागरी जीवनाला आधुनिक वळण प्राप्त होत गेले. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
विसाव्या शतकात पुणे आधुनिक शहर म्हणून ओळखले जावू लागले. ते एक औद्योगिक केंद्र बनले. केवळ पेनिसिलीन कारखान्यासाठी ओळखली जाणारी पिंपरी आणि मोरया गोसावी देवस्थानासाठी ओळखले जाणारे चिंचवड यांची जोडनगरी आज आधुनिक उद्योगनगरी म्हणून गजबजली आहे. पुण्यातल्या अनेक जुन्या वाड्यांची जागा नव्या ओनरशिपने घेतली आहे. एकेकाळी हे शहर म्हणजे पेन्शनरांचे शहर होते. लोकांच्या स्थलांतराला वेग आला आहे. ‘सदाशिव-शनिवार-नारायण’ यांच्या कोथरूड-पौड रोड कडील ‘स्थलांतरच निर्देश उदाहरणादाखल पुरेसा आहे. टांगा आणि सायकलींचे शहर आता स्कूटर व मोटारीचे शहर बनले आहे.. पुण्यातील रस्ते, पूल व उड्डाणपुलांची संख्या वाढत आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले एक अग्रगण्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाऊ लागले आहे. कलानगरी क्रीडानगरीची जोड मिळाली आहे. परप्रांतीय व परदेशी विद्यार्थी असोत, रोजगार शोधणारे तरुण असोत व सुखाचा विसावा शोधणारे जागोजागचे पेन्शनर असोत, सर्वाना हि पुण्यनगरी आकर्षित करत आहे. तिचे रंगरूप झपाट्याने पालटत आहे; पण बदल कितीही झाले तरी ‘पुणे शहर अमोलिक, रचना अशी दुसरी नाही’, हे शाहीर राम जोशींचे उदगार सदेव खरे ठरतील, यात शंका नाही!
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
हरवलेले पुणे हे डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकात पुण्यातील सुमारे ५५ ऐतिहासिक ठिकाणांचे वर्णन आहे.हे पुस्तक उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकात पुण्यातील ऐतिहासिक कालातील लकडी पूल, पर्वती,सारसबाग,हिराबाग,कोथरुडबाग इत्यादी नानासाहेब पेशव्यांनी निर्मिलेल्या गोष्टींचे वर्णन केले आहे.पुण्यातील स्वारगेट,हुजूरपागा, रामोशी गेट इत्यादी ठिकाणांची नावे कशी पडली याचेही वर्णन या पुस्तकात केले आहे.पुण्यातील मंदिरांची सन १८१० साली केलेली यादी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली. खुनी खंजीरच्या छायाचित्रणाची त्यावेळी बरीच तारीफ झाली होती.
कालांतराने १९५२ मध्ये प्रभात कंपनी पुण्याला स्थलांतरित झाली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कोकिळेचा आवाज ऐकणे चांगले असते. प्रत्येक जण आपापल्या परीने व्रत करीत असते. निज आषाढ पौर्णिमेला व्रत सुरू होऊन श्रावण शुद्ध पौर्णिमेला समाप्ती होते.
प्रथमपासून संघ राजकीय नाही असेच सतत सांगत राहिला. अश्या प्रकारे संघाने स्वतःची एक ‘विशिष्ठ प्रतिमा’, ‘खास चारित्र’ निर्माण केले आहे.
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.
दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी जागतिक पास्ता दिवस साजरा केला गेला. जागतिक पास्ता दिवस सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातोय.
चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti