शून्य कचरा परिसर !
Category:
लेखसंग्रहसध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण करतांना मुंबई महानगर पालिकेचा त्यावरील खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे.