दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर
इ-पुस्तके

दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.

ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.

मोरया माझा
इ-पुस्तके

मोरया माझा

Category:

 

श्री गणेशाविषयी ११ प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दिली आहेत विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी या पुस्तकातून. त्यांच्या लेखणीतून साकारलेली इतरही अनेक ई-पुस्तके… आता वाचा मराठीसृष्टीवर… इ-पुस्तक स्वरुपात.

बाबासाहेबांची पत्रकारिता
इ-पुस्तके

बाबासाहेबांची पत्रकारिता

Category:

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.

या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.

महाराष्ट्राच्या अरण्यातील महत्त्वाचे वृक्ष
इ-पुस्तके

महाराष्ट्राच्या अरण्यातील महत्त्वाचे वृक्ष

Category:

 

महाराष्ट्राच्या विविध अरण्यांमध्ये पसरलेल्या विविध वृक्षांची संपूर्ण माहिती देणारे हे एकमेव असे पुस्तक.

सुमारे ३२ वर्षे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन करुन १२ राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय जर्नल मध्ये संशोधन पेपर प्रसिद्ध करणारे अति वरिष्ठ संशोधक डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी या वृक्षांचा परिचय करुन दिला आहे.

आय. सी. ८१४
इ-पुस्तके

आय. सी. ८१४

Category:

 

आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?

अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.

त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?

या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.

अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी