आत्म्याचे मिलन परमात्म्याशी,
हेच जीवनाचे ध्येय असे,
आत्मा ईश्वरी अंश असूनी,
त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।
देह पिंजऱ्यांत अडकता,
बाहेर येण्या झेप घेई तो,
अवचित साधूनी वेळ ती,
कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।
कार्य आत्म्याचे अपूरे होता,
पुनरपी पडते बंधन,
चक्र आत्म्याचे चालत राही,
मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Author
Post Views: 10