नियतीचा फटका

भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...

एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।

मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।

तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।

कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।

भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र…

एक भयानक रात्र अशी,
सहस्त्रावधींचा घेई बळी ।
नियतीच्या खेळामधली,
कुणा न समजे ही खेळी ।।१।।

मध्यरात्र होऊन गेली,
वातावरण शांत होते ।
गादीवरती पडून सारे,
स्वप्ने रंगवीत होते ।।२।।

तोच अचानक विषारी वायू,
पसरला त्या वातावरणी ।
हालचालींना वाव न देता,
श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।

कित्येक जनांचे बळी घेतले,
काळ्या काळाने ।
शांत निद्रेची महा निद्रा,
करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।

भरडून गेले सारे परि,
पापी वा पुण्यवान ते ।
कळला नाही हिशोब त्याचा,
मोजमाप काय असते ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author