जगुनीया झाले सारे काही
आता मागणे काहीच नाही…
कसले सुख, कसले दुःख
संवेदना काहीच उरली नाही…
प्रारब्ध संचिती जन्म लाभला
भोगायचे काही राहिले नाही…
उरलेले क्षण आनंदात जगावे
आता कुणाला दुःखवू नाही…
लौकिक , भौतिक नश्वर सारे
सोबत कधीच काही येत नाही…
आत्मानंद ! केवळ मन:शांती
याविण दूजे सुंदर सत्य नाही…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २३४
१४/९/२०२२
Author
Post Views: 12