Please Login to view Prime Content.
एक भारतीय नागरिक

(Gold)
मी, प्रिया उपासनी, एक भारतीय नागरिक. भारत एक विकसनशील देश आहे. भारतात सद्ध्या खूप बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. रोज आपण पुढे पुढे जात आहोत. दररोज आपण प्रगती करत आहोत. पण खरच आपण प्रगती करत आहोत का? आपला देश कृषिप्रधान देश आहे आणि त्यापासून आपण दूर जात आहोत असे चित्र दिसत आहे. प्रगती, विकास जरूर व्हावा पण प्रकृतीकडे, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाले नाही पाहीजे. दुर्दैवाने आज परिस्थिती बरोबर विरुद्ध दिसत आहे.
सुपिक शेतजमिनी विकल्या जात आहेत. त्यावर मोठमोठ्या इमारती बांधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याची, सांडपाण्याची, रस्त्यांची, विजेची व्यवस्था या संबधीत कोणताही विचार केला जात नाही. हे शहरी भागांपूरते मर्यादित नसून गावागावात सुद्धा हे चित्र दिसायला लागले आहे.