अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.



निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे.

मुंबईपासून दक्षिणेस केवळ ७८ किलोमीटर आणि पेणपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागला आता मुंबईहून थेट समुद्रमा्गे जेमतेम अर्ध्या तासात जाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या गर्दीपासून दूर पण तरीही येण्या-जाण्यासाठी सोपे म्हणून अलिबागला सेकंड होम घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

हे शहर येथील समुद्र किनारा आणि सीफूडसाठी प्रसिध्द आहे. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही अष्टागरे म्हणून ओळखली जाणारी गावे अलिबागच्या आसपास आहेत.

Author