मृत्यु नक्षलवादींचा का गरीब निष्पाप आदिवासींचा ? (कथा ३)

(Gold)
बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात नक्षलवादी तर खरे कोणीच नव्हते,असा गावकऱ्यांचा ठाम दावा, काहीं मृत शरीरावर कुऱ्हाडीचे घाव होते ही सत्यस्थिती होती, आमचे पोलीस असले निर्घृण कृत्य कधीच करणार नाहीत, असा सरकार कडून फतवा काढण्यात आला. गावातील नागेश, महेश आणी सोमळू ही १५ ते १९ वर्षाची तरुण मुले कट्टर नक्षलवादी होती, हेही तितकेच खरे होते. नक्षलवादी अशा तरुण मुलांना हाताशी धरून त्यांचा ढाली सारखा उपयोग करीत असून ही त्यांची नवीन चाल आहे, अशा अनेक तरुण मुला मुलीना आमिष दाखवून गनिमी युद्धाचे शिक्षण देऊन परत खेड्यात पाठवितात खंडणी वसूल करण्यासाठी.