गेले ज्यांचे जीव तडफडून
कशी होईल याची भरपाई
जीव जपला जो जीव लावून
गेला निघून तो ऑक्सिजनपाई
किती होणार अशा दुर्दैवी घटना
कधी थांबणार मृत्यूचे तांडव
कुठे गेली मुले आटवून पाना
तर इथे सर्वत्र गळती आसवं
दुःख झेलण्या मजबूत माती
विसरण्या सारे खुले आकाश
दूर राहिली ती नाती गोती
दिवस व रात्र झाले भकास
वेळ कोणावर नको यायला
आता कंपते सारे शरीर
काळानेच जर घातला घाला
तर मग कुठे मिळेल आधार
रा. ना. जाधव, परळी वैजनाथ
Author
Post Views: 16