विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।

जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।

जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।

नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।

मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।

मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।

पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।

मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।

विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।

बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत ।

जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।

जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी ।

नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।

मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी ।

मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।

पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही संकटे ।

मानव निर्मित युद्ध दंगली, सूड भावना तेथे पेटे ।।

विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे ।

बिघडले घर देईल बांधूनी, विश्वास बाळगी ईश्वराकडे ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author