जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली
चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली
जीवन मार्ग सरळ असता, फेरे पडती नशीबाचे
अनेक वाटा दिसून येता, भटकणे मग होई जीवाचे
विसरूनी जातो मार्ग आपला, तंद्रीमध्ये भटकत असता
बोलफूकाचे देत राही, नशीब दैव म्हणता म्हणता
असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी
नशीबाला परी दोष न देता, चालत राहा एकाग्रतेनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Author
Post Views: 14