नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.
सौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो मोठ्याने गाणे बडबडू लागला. “सौरभ, अरे काय चालले आहे?” आईने विचारले. “तू काय आता लहान आहेस? काय हा पसारा मांडून ठेवला आहेस. अरे, नववीत आहेस. जरा नीट वाग.” सौरभ म्हणाला, “अगं आई, मी आज शाळेत गायन परीक्षेत पहिला आलो.” ‘अरे वा! उत्तम! अभिनंदन! म्हणून तुला कसंही वागायला परवानगी नाही मिळाली.” आई म्हणाली. ‘आधी बूट जाग्यावर ठेव, दप्तर कपाटात जाऊ दे आणि युनिफॉर्म धुवायला जाऊ देत. आधी हातपाय धुवून घे. आधी खाऊन घे आणि खाऊन झाल्यावर खेळायला जा.’ “हो. तु टीचरसारखी छडी घेऊन मागे लाग माझ्या. नाहीतरी तु टीचर आहेसच.” “हो. आहेच मी शिक्षिका.” आई म्हणाली. “आणि मी जे काही सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे.” “हो कळलं.’ सौरभ म्हणाला, “सारखे लेक्चर नकोय मला. मी गायनाच्या परीक्षेत पहिला आलो त्याचे कौतुक राहिले दूर.” “तसं नाही रे राजा,” आई म्हणाली, “कौतुक तर आहेच पण तू चांगलं वागावंस हीच माझी इच्छा आहे रे. मी कोणी तुझी शत्रू का आहे?” हे चालू असताना सौरभची आजी बेडरूममधून बाहेर आली. ती सगळे “आत ऐकत होती. ती म्हणाली, “अगं, राहू देत. आज तो इतक्या खुशीत आहे तर त्याच्या आनंदात विरजण घालू नकोस.’ अलका म्हणाली, “अहो आई, पण म्हणून त्याने बेशिस्तीने वागावे असे नव्हे ना. मी काय त्याची वैरीण आहे का? त्याने स्वत:चे स्वत: आवरावे, खाऊन घ्यावे आणि खेळायला जावे यात कसले आले विरजण! अहो, आजकालची मुले मैदानी खेळ खेळत नाहीत त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होत नाही. शारीरिक हालचालींमुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते मानसिक विकास होतो आणि मुख्य म्हणजे सांघिक खेळामुळे हार पचविण्याची मानसिक ताकद मिळते. मी सुद्धा शाळेत खेळाची शिक्षिका असल्यामुळे मला हे जास्त ठाऊक आहे.” आजी म्हणाली, “असू दे. आजचा दिवस त्याला जास्त काही बोलू नकोस. एवढा आनंदात आहे तर आजच्या दिवस नाही खेळायला गेला तर काही बिघडत नाही.’

प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो.
माझे मूळ गाव खामगाव तालुक्यामधील आंबेटाकळी आहे. प्राथमिक शिक्षण गावातच झालेले असून गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे, नावाप्रमाणे आंबेटाकळी शिवारात आमराई होत्या. त्या लोप पावल्या असल्या तरी आठवणी मात्र कायम आहेत. याविषयी…
” कुठे आहेस आत्ता ? ”
” Whatsapp चा असा दुरुपयोग नाही करायचा . ”
” दुरुपयोग कसला ? तू सेशन घ्यायला पुण्याला गेला आहेस आणि पाऊस खूप आहे म्हणून काळजीने विचारले . ”
” काळजीने की प्रेमाने ? ”
” प्रेम आहे म्हणून काळजी आहे , महाराज ” .
” वेडाबाई , मी इतका सतत फिरत असतो की आता खरंच अशी काही काळजी करावी असं काही उरलंय का ? आणि अशी इतकी माझी काळजी करायला लागलीस तर कसं व्हायचं ? ” .
अत्यंत मोजक्या शब्दात सांगितलेली पण अत्यंत अर्थपूर्ण अति लघुकथा..
भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते स्मितहास्य करून त्याला म्हणाले की, तुझा प्रश्र अगदी योग्य आहे. मात्र त्या प्रश्र्नाचे उत्तर मिळण्यासाठी तूच एक काम कर. या गावातील अनेक लोकांना तू भेट व त्यापैकी किती लोकांना शांती हवी अहे, किती लोकांना सत्याचा मार्ग हवा आहे व किती लोकांना मोक्ष हवा आहे याची तू यादी तयार कर वती घेऊन माझ्याकडे ये म्हणजे मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.गौतम बुद्धानी सांगितल्याप्रमाणे तो माणूस त्या गावातील लोकांना भेटला च त्याने अनेकांना याबाबत तुम्हाला नेमके काय हवे आहे, असा प्रश्र विचारला. कोणी म्हणाले, आम्हाला भरपूर पैसा हवा आहे. त्याच्यामुळेच सुख-शांती मिळू शकेल. कोणी म्हणाले, आम्हाला सुपीक जमीन हवी आहे, तरक्केणी म्हणाले, आम्हाला सत्ता हवी आहे, - कोणाला राजवाडा हवा होता, तर कोणाला चांगली नोकरी हवी होती. एकानेही मला मोक्ष हवा आहे, असे पटकन संगितले नव्हते. काही दिवसांनी तो माणूस गौतम बुद्धांना भेटला व त्याने तयार केलेली यादी बुद्धांना सादर केली व बुद्धांना तो म्हणाला, लोकांना सत्य, शांती आणि मोक्ष सोडून बाकीचे सर्व काही हवे आहे. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्राचे उत्तर तुला आता मिळालेच आहे. लोकांना जे काही हवे आहे त्यामुळे त्यांना सुख-शांती किंवा मोक्ष मिळणार नाही.उलट सुखाच्या प्राप्तीसाठी ते दुःखाच्या मार्गाने चालले आहेत. गौतम बुद्धांच्या या उत्तराने स्वा माणसाचे समाधान झाले व तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला.
ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .
ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती .
पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते .
सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो .
आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले .
मेनका दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .
पण त्याचा आनंद मानायचा , की हे भयंकर विश्व अजूनही त्याच पद्धतीने चालत आहे , याचे वैषम्य वाटून घ्यायचे , या संभ्रमात मी आहे .

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.
ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.
Copyright © 2025 | Marathisrushti